शनिवार, १२ एप्रिल, २०१४

आपलं ' शिववैभव' पद्मदुर्ग उर्फ कासा किल्ला

पद्‌मदूर्ग (कासा किल्ला)
किल्ल्याचा प्रकार : जलदुर्ग
जिल्हा : रायगड

ना , हो , करता करता शेवटी ..आपलं शिववैभव " पद्मदुर्ग (कासा किल्ला ) काल , अगदी जवळून पाहता आला .
अगदी धन्य जाहलो . इथल्या चिरा , इथल्या वास्तू , इथली भक्कमता. अजूनही इतिहासाचे तेज अंगी भिनवते.
इतिहासाची साक्ष देत हा आपला किल्ला अजूनही सुव्यवस्थितपने उभा आहे.
गरज आहे ती आपली पाउलं इथपर्यंत नेण्याची . तिथे जाऊन नतमस्तक होण्याची .
नजरेत सार सामावून घेण्याची ..
वर्षानुवर्ष तटबंदीला धडाडणार्या लहरी लाटा अजूनही नाराज मनाने पुन्हा माघार घेतात.
इथली भक्कमता अजूनही त्या लहरी लाटेला जुमानत नाही .
जंजिरा पाहायला सर्वच जातात . पण आपला हा शिवरायांचा किल्ला अजूनही दुर्लक्षित आहे .
सर्वांनी एकदा जरूर पाहून यावे .
थोडी खटपट जरूर करावी लागते तिथवर जाण्यासाठी हे खर आहे. पण तरीही जावून यावेच .

संकेत पाटेकर
०७.०४.२०१४

__________________________________________________________________________________
ट्रेकक्षितीज ह्या संकेत स्थळावरून घेतलेली पुढील माहिती :-

मुरुडच्या सागर किनार्‍यावरुन पश्चिमेला समुद्रात एक किल्ला दिसतो तोच पद्‌मदूर्ग उर्फ कासा किल्ला. मुरुड - जंजिरा पहाण्यासाठी आलेले पर्यटक सहसा पद्‌मदूर्ग पहाण्यासाठी जात नाहीत. कारण जंजिर्‍याला जाण्यासाठी ज्याप्रमाणे बोटी सहज उपलब्ध आहेत, त्याप्रमाणे पद्‌मदूर्गला जाण्यासाठी बोटी सहज मिळत नाहीत. त्यासाठी मुरुडहून खाजगी होडी करुन या किल्ल्यावर जावे लागते.

छत्रपती शिवाजी राजांनी बांधलेला हा किल्ला आजही सुस्थितीत उभा आहे. शिवरायांच्या शब्दात सांगायचे तर ‘पद्‌मदूर्ग वसवून राजापूरीच्या (जंजिरा) उरावरी दुसरी राजापूरी केली आहे’. असा हा सुंदर किल्ला एकदा तरी वाकडी वाट करुन पाहावा असा आहे.

इतिहास :
जंजिर्‍याच्या सिद्दीचा कोकणपट्टीला उपद्रव होत होता. त्याला आळा घालणे आवश्यक होते. त्यासाठी शिवरायांनी मुरुड जवळ सामराजगड बांधून सिद्दीच्या जमिनीवरील हालचालीवर नियंत्रण आणले, तर सिद्दीच्या समुद्रावरील हालचालींना जरब बसविण्यासाठी महाराजांनी मुरुडजवळ समुद्रात असलेल्या कासा बेटावर किल्ला बांधण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर पाथरवट, गवंडी, लोहार, सुतार यांची रवानगी कासा बेटावर करण्यात आली.

ही बातमी सिद्दीला कळल्यावर तो अस्वस्थ झाला, कारण या किल्ल्यामुळे त्याच्या समुद्रावरील हालचालींवर मर्यादा येणार होत्या. त्याने आरमार घेऊन चढाईची तयारी केली होती, परंतू महाराजांनी सिद्दीचा बंदोबस्त करण्यासाठी दर्यासारंग दौलतखानाची आधीच नेमणूक केली होती. किल्ल्याची रसद पुरवण्याचे काम प्रभावळीचा सुभेदार जिवाजी विनायक यांच्यावर सोपवली होती. या कामात हयगय झाल्याचे कळताच महाराजांनी १८ जानेवारी १६७५ ला जिवाजी विनायक यांना खरमरीत पत्र लिहून त्यांची कान उघडणी केली. शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी रात्रं दिवस एक करुन, सिद्दीशी लढत-लढतच किल्ल्याची उभारणी केली. पद्‌मदूर्गचे पहिले हवालदार म्हणून शिवरायांनी सुभानजी मोहीते यांची निवड केली.

इ.स १६७६ मध्ये मोरोपंत पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली फौज देऊन महाराजांनी जंजिर्‍याची मोहिम काढली. या मोहिमेत मचव्यांवरुन तोफांचा मारा जंजिर्‍यावर केला, पण अपेक्षित परिणाम साधला नाही. मग मोरोपंतांनी जंजिर्‍याला शिड्या लावण्याची धाडसी योजना आखली. पद्‌मदूर्गवर काम करणार्‍या अष्टागारातील सोनकोळ्यांच्या प्रमुखाने, लाय पाटलाने हे जबरदस्त आव्हान स्विकारले. एका रात्री लाय पाटील आपल्या ८ १० सहकार्‍यांसह पद्‌मदूर्गतून बाहेर पडले अंधाराचा फायदा घेत जंजिर्‍याच्या पिछाडीला जाऊन तटाला दोरखंडाच्या शिड्या लावल्या व मोरोपंतांच्या धारकर्‍यांची वाट पाहात राहीला. पहाट फुटायची वेळ झाली तरी सैन्य आले नाही. हे पाहून निराश मनाने लाय पाटलाने पद्‌मदूर्ग गाठला.

लाय पाटलांचे हे धाडस पाहून शिवाजी महाराजांनी त्र्‍यांना पालखीचा मान दिला. पण दर्यात फिरणार्‍या सोनकोळ्र्‍यांना पालखीचा काय उपयोग म्हणून लाय पाटलांने नम्रपणे पालखी नाकारली. यावरुन महाराज काय ते समजले त्यांनी मोरोपंतांना एक नवे गलबत बांधून त्याचे नाव ‘पालखी’ ठेऊन लाय पाटलांच्या स्वाधीन करण्यास सांगितले. याशिवाय राजांनी लाय पाटलास छत्री, वस्त्रे, निशाण व दर्या किनारीची ‘सरपाटीलकी’ दिली.

संभाजी महाराजांच्या कारकीर्दीत पद्‌मदूर्ग स्वराज्यात होता. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ही १६८९ मध्ये हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात असल्याचा उल्लेख इंग्रजांच्या पत्रात आहे. त्यानंतर पद्‌मदूर्ग सिद्दीच्या ताब्यात गेला. मराठ्यांनी पेशवेकाळात परत तो जिंकून घेतला पण त्याविषयी माहिती उपलब्ध नाही.
___________________________________________________________________________________________

क्षण चित्रे .....
प्रचि १
पद्मदुर्ग कडे जाताना ..सागरी मार्ग


प्रचि 2
आपलं ' शिववैभव' पद्मदुर्ग उर्फ कासा किल्ला
प्रचि 3
इतके वर्ष सागराच्या लहरी लाटेला न जुमानता अजूनही भक्कमपणे उभा राहणारा आपलं हा दुर्ग
प्रचि 4
आपलं ' शिववैभव' पद्मदुर्ग उर्फ कासा किल्ला
प्रचि 5
जंजिरा ला जाणे सोयीचे आहे . पण आपल्या ह्या शिव दुर्गावर ' पद्मदुर्ग' ला जायचं म्हटलं कि बरीच खटपट करावी लागते .इथले काही नेमकेच स्थायिक आपल्याला तिथपर्यंत घेऊन जातात
प्रचि 6
आमचा ग्रुप ...फोटो , शिखरवेध सोबत
प्रचि 7
इथला दगड झिजला ..पण त्या चीरांमधला चुना अजूनही तसाच आहे.
प्रचि 8


प्रचि 9
आतला परिसर ...पडझड झालेल्या वास्तू


प्रचि 10


प्रचि 11 गडावर अजूनही बर्याच तोफा आहेत , त्यातलीच हि एक ....अजूनही शत्रूवर नजर ठेवणारी


प्रचि 12

प्रचि 13
प्रचि 14
कडाडणारी तोफ ..जणू अजूनही शत्रूवर नजर ठेवून आहे.
प्रचि 15
तटबंदी
प्रचि 16
कमळाच्या आकाराचा बुरुज ...
प्रचि 17
काही अवशेष
प्रचि 18
अजूनही मनाशी खवळनारा....जंजिरा

प्रचि 19
पद्मदुर्ग - मागील दरवाजा

प्रचि 20
शत्रूवर नजर ठेवून असणार्या तोफा ....समोर दिसतोय तो जंजिरा
प्रचि 21
अजूनही ऊतम स्थितीत असलेला शौचकूप

प्रचि 22

प्रचि 23
प्रचि 24
मागील दरवाजा ,,,
प्रचि 25
प्रचि 26
पडझड झालेल्या तटबंदीचे काही अवशेष
प्रचि 27
पडझड झालेल्या तटबंदीचे काही अवशेष
प्रचि 28
प्रचि 29
पडकोट
प्रचि 30
दरवाजा
प्रचि 31
प्रचि 32
प्रचि 33
मुख्य दरवाजा
प्रचि 34
परतीच्या मार्गावर ...
प्रचि 35
प्रचि 36
प्रचि 37
जेट्टी
प्रचि 38
भगवा ...........आमची शान आमचा अभिमान
प्रचि 39
शेवटी जंजीरयावर विजयी शान फडकवत निघालेली आपली मर्हाटी नौका... :);)
प्रचि 40
प्रचि 41 दूरवर दिसणारा ....आपला पद्मदुर्ग
प्रचि 42
काशीद सागरी किनारा
प्रचि 43

आपलाच ,
संकेत य पाटेकर

३ टिप्पण्या:

Rahul Shah म्हणाले...

Khup chan re dosta.....mla kadhi gheun jatos....?

Sanket Patekar म्हणाले...

धन्यवाद मित्रा ....
जाऊया ...लवकरच ... :)

Mahesh Naik म्हणाले...

फारच छान मोहीम , शिवरायांनी बांधलेल्या या किल्ल्याला भेट देणारे खरंच भाग्यवान