मंगळवार, १६ जून, २०१५

माझा सह्याद्री ..आपला सह्याद्री ..

ह्या सह्याद्रीने खूप काही दिलंय ...

त्यात सगळ्यात अनमोल अस काही म्हणायचं असेल तर मी म्हणेन  ..
कि हि जोडली गेलेली रत्नमाणिकांसारखे .....एक एक  माणसं.  
मग ती सह्याद्रीतल्या  नंद्वनात म्हणजेच ,  खेड्या पाड्यातून  ...साधसं  जीवन  जगणारी ,
साधीशीच पण मनाचं  मोठेपण जपणारी  प्रेमळ माणसं  असतील किंव्हा
शहराकडून खऱ्या अर्थाने आपल्या  ह्या सह्याद्रीत मनसोक्त भटकणारी वा सह्याद्रीवर नितांत प्रेम करणारी ,
इथल्या जना मनांसाठी झटणारी , दुर्ग संवर्धनासाठी सतत कार्य करणारी ..हि  शहरी माणसं असतील.
दोन्ही हि तितकीच अनमोल प्रिय अन  जिव्हाळ्याची ..रत्नमाणिकं....
जी जोडली जातात. सह्याद्रीच्या प्रत्येक पाऊल वाटेवर ....

- संकेत पाटेकर 

१४..०६.२०१५ 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: