शुक्रवार, २९ जून, २०१८

कोथळी गड : पावसाळी जत्रा


 जवळ जवळ पाच सहा वर्षाच्या.. मोठ्या अश्या गॅप नंतर , कर्जत पासून जवळच ठामपणे उभा असलेला उत्तुंग असा पेठचा किल्ला म्हणजेच कोथळीगड, ह्या किल्ल्याला भेट देण्याचं भाग्य , मला पुन्हा एकदा मिळालं. म्हणजेच ते नव्यानं जुळुन घेता आलं.
माझे मित्र, बंधू आणि माझ्या भाच्यांमुळे... 


तसं रानवाटा सोबत , काही वर्षांपूर्वी इथं येणं झालं होतंच. म्हणूनच त्यावेळेसच्या आठवणी ही पुन्हा एकदा जागत्या आल्या.पण त्यावेळेस सारखा तो निवांतपण अनुभवता आला नाही. 

पेठ ला ...जत्रेचं स्वरूपच प्राप्त झालं होतं. 
सह्याद्रीच्या भेटीला हौशी पर्यटकांची झुंबड उडाली होती. निव्वळ आणि निव्वळ मौज आणि मस्तीसाठी.

खरं तर कलावंतीण, लोहगड विसापूर, सिंहगड, पेब , पेठ.. ह्यासारखी ठिकाणं , ही आपली स्वराज्याची बेलाग बुलंद ठाणी (भावबंद गर्दीने सध्या घुसमटत असलेली... )ह्याचा इतिहास भूगोल, निसर्ग नि जनजीवन...हे निवांतपणे.. 
आठवड्यातल्या मधल्या कुठल्याश्या वारी...
कधी भेट देऊन अभ्यासवेत वा कुतूहलाने स्वराज्य नजरेनं ते एकाकी पाहून घ्यावेत.
( तुम्ही जर खरंच सहयाद्री वेडे असाल, स्वराज्याच्या ह्या वास्तूंशीशी एक निष्ठेने असाल तर आणि तरच ...उगाच कल्ला नि गोंगाटा करण्यास इथवर येण्याचे कष्ट घेऊ नयेत. )

इतर वेळेस सर्वच ठिकाणी इथे जत्रेच स्वरूप आलेलं असतं.
हौसे नौशे सगळीच उधाणलेली असतात.
निव्वळ मौजमस्ती साठी.

त्यांना इतिहासचं कौतुक नसतं. भूगोलाशी सख्य नसतं.
निसर्गातल्या कलात्मक बाबींची नि इथल्या लहान सहान घटकातल्या सौन्दर्याचा आणि त्याच्या अस्तित्वाबद्दल रुची नसते. तशी दृष्टी नसते. 
आणि महत्वाचं म्हणजे शिस्त... नसते.आणि म्हणूनच..
जिथे तिथे..
मोठमोठ्याने सुरू असलेला कल्ला 
हिंदी गाण्याचा बाज..शिव्या व्याप...आणि ऐतिहासिक वास्तूंची सुरू असलेली ओढताण...नको ते उद्योग,
ह्यांन मन अस्वस्थ होऊन जातं. 

काल परवा हे असंच काही अनुभवलं.
जत्रेत रेटारेटीत जावं. गोंगाट करावा आणि परतावं तसंच काहीसं..

सकाळी साडे आठची कर्जत हुन आंबिवली मार्गे जाणाऱ्या एसटीने,
तास सव्वा - तासाच्या प्रवासघडी नंतर, आम्ही आंबिवलीत दाखल झालो. पाय उतार होताच, नजर वर उंचावून पाहिलं. 
जागोजाग वाहनांची (ट्रॅव्हलर, बसेस, इतर ) रीघ 
दिसत होती. परिसर त्यानंच गर्द झाला होता. 
त्यावरूनच संख्याच गणित कळत होतं. 
आधीच एसटी तील भरगच्च संख्या आणि त्यात ही ... ,
नजरेसमोर , एकूणच पुढचं चित्रं उभं होत गेलं.

गर्दीने वेढलेला कोथळीगड मुक्याने साद घालू लागला..
''अरे कुणी तरी थांबवा हे..''
त्याची ती अवस्था मनाला अस्वस्थ करून जात होती.
काय करावं...? कुणा सांगावं ? 
मन एकीकडे असं विचारांत गुंतलं असता..
हिरवाईचा हा स्पर्श आणि नटाटलेली ही जीवसृष्टी.. देहमन आनंदून नेत होती. 
वर्षाऋतूच्या सहवासात ..सृष्टीनं ही आपलं रूपडं पालटलं होतं. 
हिरवाईचा शाल पांघरूण... ही धरणीमाय आनंदाने हिंदळत होती. उत्साह त्यानंच दुणाणला होता. दुपट्टीने वाढला होता,





                                                                                 
पण तो काहीच वेळ.. 
जस जसं पुढे होत गेलो. 
आणि पेठ वाडीत पोहचलो. आणि चढाईला सुरुवात केली. तेंव्हा घोळक्या घोळक्याने सुरू असलेला कल्ला नजरेत खूपु लागला.

तरुणाई होश हरपून होती. पाऊला माग पावलांचा ठसा उमटला जात होता. एकेरी दीर्घ अशी रीघ लागली होती. 
त्यात कोणी गात होतं. कोणी गाण्यावर ताल धरून होतं. हिंदी पंजाबी गाण्यानं तर डोकं वर खुपसलं होतं. सृष्टीतल्या स्वरील सुरावटीचा गुंजनांद त्यानं लुप्त होत होता.
कुठेशी शिव्यांची भाषा सुरू होती. 
नको ते शब्द मुलींदेखत वटले जात होते. तीन चार जणांच्या त्या घोळक्यात ती मुलगी ही बिनधास्त मिसळून होती. नवल ह्याचच होतं.

अवघ्या काही वेळातच उंच सखल पाय वाटेतून, निसरड्या वाटेतून, बेचकीतून..बुरुजाजवळ येऊन पोहचलो. 
तेंव्हा समोरच्या दृश्यानं देहमनाचा राग अजून उफाळला गेला.
कधी काळी शत्रूवर नजर रोखून असलेली , काळीज धस्स करणारी तोफ, त्यावर दोघीजणी निवांत बसून गप्पा मारत...होत्या. 
त्याचं त्यांना काहीच वाटत न्हवतं.
मान अभिमान नावाची गोष्टच शिल्लक न्हवती.
'' इतिहास ठाऊक नाही, पण निदान अपमान तर करू नका रे..'' 
आमच्या पैकी 'रोहन अन मी ' दोघे पुढे होऊन दोघींना फटकारलं, तेंव्हा 'सॉरी' म्हणत त्या माघारी फिरल्या..

आता इथून आणि ह्या पुढे काय काय पाहावं लागेल. ह्यांने धास्तीच भरली होती...
किल्ले भटकंतीला जत्रेचं स्वरूप आलं होतं.
त्यात श्वास कोंडला जात होता, तो ह्या बेलाग बुलंद सह्याद्रीचा...
स्वराज्यातील देदीप्यमान ह्या तोरण माळेचा..
वीरमरण पत्करलेल्या त्या शूरवीर नरवीरांचा..
त्या असंख्य मावळ्यांचा...अन माझ्या सारख्या एका सह्य वेड्या भटक्याचा ही...

यावे ....आणि अवघे यावे , पण ती शिवदृष्टी घेऊन...
स्वराज्य ध्वज होऊन...मावळा होऊन..,
हा बलदंड राकट सहयाद्री आणि इथला रम्य हसरा निसर्ग आणि माणूस ह्यातील दुवा साधत, स्वतःला त्यात सामावून घेत....

जय शिवराय।।।
@संकेत पाटेकर..
२८.०६.२०१८


























वेबसाईट लिंक : कोथळी गड : पावसाळी जत्रा


शनिवार, ५ मे, २०१८

दुर्गराज राजगड आणि होळीचा मुहूर्त


''तुम्ही ना मागच उतरायला हवं व्हुत....मार्गसानिला तिथून साखरमार्गे  तुम्हाला जवळ पडलं असतं.  आता इथून लय चालावं लागेल. एसटी वगैरे बी काही मिळणार नाही'' ना कुठलं वाहन ..''
एखाद उनाड कार्ट्याला थोरा मोठ्यांनी , मोलाच्या एखाद दोन गोष्टी प्रेमानं समजून द्याव्यात आणि  ते सगळं ऐकूनही त्या कार्ट्याने ,  आपल्याच अकलेचा आलेख उभा करावा , ' असं काहीस आज माझ्याबाबतीत झालं. 


गाडीने नसरापूर फाटा ओलांडला , गुंजवणे कडे नेणारा मार्गसानि  हि मागे सरला ..आणि पाबे मार्गे एसटी वेल्हेल्याकडे धावू  लागली.  गावोगावाला  जणू एक सांगावा धाडत .  
''कुणीतरी आलंय हं  ...कुणीतरी आलंय , आपलं ..आपलं   माणूस ''  

गावोगाव जोडणारी आणि माणसं बांधून ठेवणारी  हि एसटी ...मानवी भावनांचा बांध अजूनही तसाच जपून आहे. 
असो, 

दिवस  एव्हाना  वर येऊन  स्थिरावला होता .  क्षितीज  नव्या इच्छा आकांक्षाने सजलं मोहरलं होतं.   
स्वप्नं पूर्ततेच्या ध्यासाने मनाची उत्कंठा हि केंव्हाच शिगेस  पोचली होती. राजमार्ग  खुणावू लागलेला, 
रस्ते , झाडी मी माणसं , घरे,  दारे , वास्तू , सरसर मागे पडत  होती. एसटी तिच्या आवेशात गुर्मीनच  जणू   धावत होती . 

हळू-हळुवार  दूरवर उभी असलेली ती डोंगररांग नजरेच्या कप्प्यात  येऊ लागली. 
आणि एसटीच्या खुल्या चौकटीतनं , राजगडाचं ते   विस्तृत , देखणं आणि भारदस्त असं  रूप स्पष्ट दिसू लागलं . आनंद ओसंडून जाऊ लागला. 
'' राजमार्ग असलेल्या पाली मार्गाची धूळ , आपण आता  मस्तकी मिरणवणार''  ..अहा..., काय भाग्य ..काय योगायोग.. म्ह्णून हृदयाची स्पंदन जोर घेऊ लागली. 

सलग दोन वेळा...  हा तीर्थरूपी राजगड , गुंजवणेच्या  चोर दरवाजातून सर केला होता .  ह्यावेळेस तसं न्हवतं. 
होळीचा मुहूर्त साधत  ..'राजमार्ग प्रवेश दाखल होंऊ'  असा  दृढ निश्चय करूनच , आम्ही इथं दाखल झालो होतो .आणि त्यावरच पूर्णपणे ठाम होतो .  

 ''तुम्ही, मागच उतरायला हवं  व्हुत, शेजारीच आसनस्थ झालेला आजोबा पुन्हा बोलते झाले. 
शेजारी बसल्यापासून त्यांचं ...तेच सांगणं सुरु  होतं . 
राजगडला जायचं आहे ना , मग मार्गसानि ला उतरा आणि साखरमार्गे पुढे व्हा......ते जवळ पडेल.  पाबे वरून लय चालावं लागेल. एसटी वगैरे बी काही मिळणार नाही'' ना कुठलं वाहन ..,

मार्गसनी मागे सरलं  पण आम्ही उतरलो नाही. 
मूळचे , आसपासच्या गावातलेच असलेले ते आजोबा , आम्ही काही ऐकेनात म्हणून पुन्हा शांत  झाले. 
''मागे दोन वेळा तिथून जाऊन आलोय आजोबा, 'आता वाजेघर मार्गे जायचे आहे'' पायवाटेलाच येणाऱ्या एकेका  गावांची आणि तोरणा रायगडच्या आमच्या त्या मोहिमेची,  सांगड घालत मी  त्यांच्यापुढे  बोलता झालो. त्यावर,  तुम्ही इथलेच वाटताय ' असा  शेरा उमटवला.  
हा , अधून मधून फेऱ्या होतात आमच्या ...

बोलता बोलता पाबे जवळ आलं . आणि त्या संर्वांचा निरोप घेत आम्ही  एसटीतून खाली उतरलो. 
गुगल ज्ञान भंडारातून  आणि पुस्तकीय दाखल्यातून   हवी असलेली  माहिती मिळवलीच  होती.  बस्स , आता  चढाई  आणि पायपीट चा श्री गणेश करायचा  होता. 
तत्पूर्वी आसपास , आपल्या मार्गाची खात्री करावी म्हणून,  कुणी दिसतंय का ते पाहू लागलो. पण आमच्या शिवाय तिथं कुणी एक दिसेना,  
ये ते बघ , त्या काकांना विचार ? 
आमच्यातल्याच कुणी एकाने ...रस्त्या कडेला असलेल्या दुकानातल्या त्या काकांकडे बोट ठेवलं.
काका , राजगड साठी कुठून वाट आहे? 
त्यांच्याशी  संवाद  साधताना एक गोष्ट   निदर्शनास आली कि आम्ही साधारण एक किमोमीटर पुढे आलो होतो. एसटीतून उतरलोच ते एक  किलोमीटर पुढे , मूळ मार्ग  सोडून , 
आता पुन्हा माघारी .... , चला इथूनच सुरवात ट्रेकला :  मनाशीच म्हटलं .  
काकांनी शेता बांधावरून  जाण्याचा योग्य तो सल्ला दिला. 
पुढे गेलं कि पूल लागेल . तिथून योग्य वाटेला लागाल. 
काकांना धन्यवाद म्हणत आणि त्यांचा  निरोप घेत आम्ही आमच्या पायपिटीला लागलो. आता  इथून पुढे किती वेळ  चालावे लागणार ह्याचा आलेख आता पुढेच ठरणार होता. 
क्रमश : 
संकेत पाटेकर 
५/५२०१८ 







रविवार, ४ फेब्रुवारी, २०१८

भटकंती एकदिवसाची- खोपोली पाली परिसरातली


प्रयोग दुसरा....
स्वतःला सगळ्या (त्या त्या संबंधीतल्या.. ) गोष्टीच , बाजूचं ज्ञान व्हावं ह्या हेतूने केलेला हा प्रयोग ,
प्रयोग दुसरा..
सहज म्हणून शूट केलेल्या हलत्या प्रतिमा , म्हणजे व्हिडीओस , स्वतः एडिट करून , स्वतःच त्याला संवाद वाक्य देऊन, स्वतःच्याच आवजात ते (कित्येकदा पुन्हा पुन्हा ) रेकॉर्ड करून .. , योग्य ते पार्शवसंगीत शोधून, योग्य त्या जागी चिटकवून , योग्य ती सारवासारव आणि जुळवणी करत , पूर्णरूप साधने म्हणजे किती अहो, ती तपश्चर्या , ह्याचा अनुभव हि इवलीशी व्हिडीओ करताना आला. अमाप असा वेळ खर्ची लावून ..
अर्थात ....खूप काही चुका आढळतीलच ...
कारण हि सुरवात आहे.
हळूहळू आपलं पुढे जायचं आहे , शिकत शिकत...
तर सांगा बरं कशी झालेय हि व्हिडीओ ....
पुढे अजून काही घेऊन येणार आहे.
युट्युब लिंक : इथे बघू शकता. ऐकू शकता
आपलाच,
- संकेत




सोमवार, १७ जुलै, २०१७

पावसाळी 'सोंडाई' दर्शन










कर्जत पासून अगदी हाकेच्या अंतरावरं,  साधारणता  अकरा  एक किलोमीटर वर असलेला सोंडाई किल्ला, आता बर्यापॆकी तसा   सर्वांना परिचयाचा आहे. असं  म्हणालो तरीही,  त्यात काही  चूक ठरणार नाही. काल  भेटीदरम्यान तो अनुभव घेता आला.

 हा किल्ला म्हणायला छोटेखानी.. विस्ताराने तसा  लहान... 
सोंडेवाडी ह्या वस्तीपासून पासून.. साधारण १ तासाच्या , वळणदार  उभ्या आडव्या चढणीचा  , माथ्याशी पाण्याचं टाकं ( जोड टाकं  आणि एक खांब टाकं) एवढे  अवषेश , विशेष पाह्ण्यातले, आणिक सोंडाई देवीचं ते  मंदिर,





मोकळ्या आभाळाखाली ,   उन्हं  वाऱ्याच्या भिंतींनी उभं असलेलं आणि  वृक्ष राजीचं कळस लाभलेलं ,  तसेच पक्षी पाखरं आणि प्राणी मात्रांच्या   चौकी पहाऱ्यात निगा राखून असलेलं आणि  गावकऱ्याचं विशेष श्रध्द्स्थान असलेलं . मंदिर...






















 पाह्ण्यातलं इतकंच जरी असलं,  तरी सृष्टी सौन्दर्याने आसपासचा परिसर अगदी नटाटलेला आहे.
दूर आकाशी डोकावलेला  इर्शाळ गड - वेडा वळणाने विस्तारलेला मोरबे धरण..वावरले धरण ,  माथेरानचे पठार आणि घनदाट हिरवाईने पांघुरलेलं अवतीभोवतालच रानवन...आणि डोंगर कैचीतून वाहणारे शुभ्र फेसाळ धबधबे ...
काल हे सगळं अनुभवता आलं ....




























 सोंडे वाडीतून सुरु केलेली  आमची वाटचाल ...गडमाथा फिरून घेत, पुढे वावरले गावाशी  .. घनदाट वृक्ष राजींच्या कमान वेढीतून मार्ग काढत काढत पुढे ..हायवेपर्यंत स्थिरावली गेली.  पावसाच्या रिमझिम सरीत न्हाऊन .. मौज मस्तीचे क्षण गाऊन ...परतीचा आमचा प्रवास फार हा आनंदाने उधळला गेला.
म्हणेजच आम्हीच उधळून दिला....
त्याच कथन .



















 ***********************************************************************
पावसाळा म्हटलं कि  सर्वत्र हिरवाईचा रंग उधळलेला दिसून येतो.  पावसाच्या उन्ह खेळीमध्ये ,  इंद्रधनूच मिळणार ते अवचित  दर्शन,  कड्या~कपारींतुनि  कोसळणारे अवघळ धबधबे ...., खळखळून वाहत झुलणारी  नदी , ओहळ आणि वृक्षराजींच्या  पानां फुलांत  गर्द मिठीत  विसावलेली ,  मोत्यावाणी  टपोर थेंब  ...हे  कसं सगळं मनाला सुखवणारं असतं. मोहित करणारं असतं. 
आणि अश्या ह्या आल्हादायक सुखकारक आणि आनंदायी वातावरणात आपुल्या सह्याद्रीची  साद आपल्याला न  खुणावेल तर नवलच म्हणायला हवं .  म्हणूनच तर आपली पाऊलं वळतात ती  आपल्या सह्य वाटेकडे ...ह्या दुर्ग किल्ल्यांशी ...! मनात शिवप्रेरणा जागी करत ...
आणि त्याने आखून दिलेल्या नियमांचे पालन करत... शिस्तीचं  बाळकडू  उगाळत . 

(हा सह्याद्री जसा सर्वांग सुंदर, तसा तो रौद्र भीषण हि आहे. हे ध्यानी ठेवूनच चालावे .  )


प्रति - १ 
कर्जत पूर्वेकडून  ३५० / - च्या भाडयावर टमटमने आम्ही सोंडाई वाडी साठी रवाना  झालो . 
बोर फाट्याशी वळण घेत , पुढे सोंडाईवाडी कडे चढाई करताना  ..टमटम मधून टिपलेला फोटो . 
विस्तारलेला  मोरबे धरण आणि मंदिर ..




                                                                                     
                                          प्रति - 2




                                                                 प्रति - 3
पावसाळा सुरु झाला नि शेत माळ्यातिल कामाला अशी सुरवात झाली. 
हिरवाईच्या रानझुल्यात सोनं  पिकवणारं ..शेतकरी 


















                                                                 प्रति - 4
साधारण  ९ च्या आसपास आम्ही सोंडेवाडीत पोहोचलो. 
(ह्या फलकापासून उजवीकडची वाट आपल्याला किल्ल्याशी घेऊन जाते .)



प्रति - 5
बरोबर ९:१० ला आम्ही ट्रेक ला सुरवात केली . तेंव्हा काळ्या  पांढुरक्या ढंगानी  गडाला  असा वेढा घातला होता . 





                                                                       प्रति - 6
सोंडेवाडीतूनच पुढे  ....

                                                           प्रति - 7
पावसाच्या रिमझिम आणि सरसर सरी अंगावर घेत आम्ही असं पुढे निघालो.  

























 
प्रति - 8
पावसाच्या  आगमनानं  रानोमाळ उधळलं गेलं  होतं . 
कातळ हि .. नितळ पाऊस सरींनी न्हाऊन ..लक्ख  तुकतुकीत झालेलं ,  त्यावर हळुवार पाय रोवत आम्ही पुढे निघालो . 


 
प्रति - 9

























 
प्रति - १0
एकीकडे मोरबे धरण आणि एकीकडे आकाशी उंचावलेला ईर्शाळचा सुळका नजरेच्या बरोबर टप्प्यात येत होता. त्यात गडाभोवती पसरलेली घनदाट वृक्ष राजींची हिरवाई मनाला सुखावून जात होती. .. 
























 प्रति - 11
शेतमळ्याच्या सहवासात गंधालेली हि खेडी पाडी ... 

























प्रति - 12
ढगांनी आच्छादलेला पठार ..


                                                           प्रति - 13
साधारण  तासाभरातच .. आम्ही गडाच्या माथ्याशी पोहोचलो . तेंव्हा टिपलेलं  सृष्टीचं हे  विहंगमय असं दृश्य ..



प्रति - 14


                                  प्रति - 15
 गडाशी पोहचताच  पाण्याचं जोड टाकं दिसलं ..पावसाच्या पाण्याने उतू जात असलेलं ..




.प्रति - 16
तिथूनच पुढे ... माथ्यावरच्या सोंडाई देवीशी घेऊन जाणारा हा डोंगर ...
इथेच लोखंडी  शिड्या बसविल्या आहेत ..

























 प्रति - 17
 गाव करयांच  विशेष  श्रध्द्स्थान..! गडाची देवता ...,! 

























                                         प्रति - 18
सोंडाई च्या माथ्याशी आम्ही क्षणभर विश्रांती घेतली आणि अवताल  भोवताल असा निरखू लागलो ..


                                                 प्रति - 19
अवती भोवतालचा  प्रदेश ...
  
                               प्रति - 20
येताना सोंडेवाडीतून कूच केले होते आता वावरले गावातून पुढे व्हायचे होते. 
समोर दिसत असलेल्या वावरले धरणापर्यंतचा टप्पा आता  गाठायचा होता.  घनदाट रानवनातून  .. त्यामुळे क्षणभर विश्रांती घेऊन  आम्ही लगेचच परतीच्या मार्गाला लागलो .  










                                                                    प्रति - 20
आल्या त्या वाटेने पुन्हा .....

























                            प्रति - 21

























                    प्रति - 22

























                     प्रति - 23

























            प्रति - 24
येताना सोंडेवाडी आणि जाताना वावरले  गाव हे आधीच  ठरलं असल्याने ..हि दुसरी वाट पकडली . 

घनदाट वृक्ष राजीनी व्यापलेली ...

प्रति - 25
काही अंतराच्या  पायपिटीने आपण  इथे येऊन पोहचतो .  डोंगराची हि  बेचकी लक्षात ठेवायची आणि  पुढे वळायचं ..



























 प्रति - 26
 वावरले  गावाशी जाताना , झुळझुळ वाहणारे असे लहान सहाण प्रवाह .. आपल्या आडवे येतात. किंव्हा आपणच  त्याच्या आडवे येतो. ...
त्यातही मनसोक्त आनंद लुटायचा ..वेळेचं भान ठेवून . 



























            प्रति - 27
जिथे आपण ..काही क्षण आधी होतो ...तोच 'माथा' पायथ्यापासून,  असा वेगळ्या अंगाने असा पाहणं. 
हा अनुभव सोहळा ज्ञानात भर टाकणारा असतो.   म्हणूनच वेगवेगळ्या वाटा जाणुनी घ्याव्यात . 

    
                                                           प्रति - 28
रानवनातून बागडलं  कि सृष्टीतल्या अश्या लहान सहाण गोष्टी आपलं लक्ष वेधून घेतात. त्यांच्या त्या आकर्षक , सर्वांग सुदंर... अश्या आकार रूपानं.  
























 पाऊस पाण्याने मुरलेल्या मातीतून आणि गर्द हिरव्या वृक्ष  वेलीतून असा मार्ग काढत जाणे. ...हा आनंद  काही  और असतो..... 
  


प्रति - 30
जवळ जवळ  दोन तासाची पायपीट करत..  आम्ही घनदाट अरण्यातून एका पठाराशी दाखल झालो.  तेंव्हा क्षणभर घेतलेली विश्रांती ..
 प्रति - 31

सोंडाई वेगळ्या अंगाने ...
 प्रति - 32
सोंडाई वेगळ्या अंगाने ..
























                   
पावसाळा असल्याने रानावनातील पायवाटांनी , आपलं अस्तित्वच  काही ठिकाणी पूर्णतः  मिटवलं होतं. त्यामुळे मार्ग काढत आम्ही योग्य ठिकाणी पोहचते झालो . आणि क्षणभर विश्रांती घेऊन असे विसावलो . सृष्टी सौन्दर्याचा नजारा डोळ्यात सामावून घेतं...

(समोर दिसतोय तो इर्शाळ सुळका ..)

  
               प्रति - 34
दोनच्या आसपास आम्ही  (वावरले )ठाकूरवाडी गावाशी होतो . तिथून पूढे अर्धा पाऊन  तास ..पावसाच्या संगीतानं ...ओलंचिंब होत ....काळ्या डांबरी रस्त्यावरंन हायवेशी स्थिरावलो. 

तिथून मग टमटम करत कर्जत .


















हा एकंदरीत आमचा प्रवास.. पावसाच्या संगीतानं त्याचं कृपेने  आनंदाने बागडत खेळत झाला.  
***************************************************************************88
सोंडेवाडीतून वर माथ्याशी जाईपर्यंत धो धो कोसळणारा हा वेडाळ पाऊस ..माथ्याशी  गेलो तेंव्हा अगदीच चिडीचूप म्हणजे शांत झाला होता. 
हि सारी सृष्टी हि जणू त्याच्या मोहरत्या स्पर्शाने धुंदमंद होंऊन डवरली गेली होती . मी हि आपला तो निवांत झाल्याने कॅमेरा च्या मोहात सृष्टीचे ते भाव चित्र सामावून घेतं होतो...
निसर्गाचीच हि उब मायेच्या ममत्वेसारखीच मायाळू असते बघा...

परतीच्या प्रवासातही वावरले ठाकूरवाडीपासून ते हायवेपर्यंत त्याने पुन्हा मुसंडी मारल्याने  आम्ही त्याच्याच मस्तीत दंग ओलेचिंब होतं आनंदात न्हाऊन गेलो.  सुखावलो . 



*************************************************************
एकूण खर्च प्रति व्यक्ती : २१० /- 
(अर्थात येताना ...व्हेज -नॉनव्हेज हे खाण्याचे प्रकार झाल्याने  खर्चात जरा वाढ झाली. )
टमटम (सात सीटर)  : कर्जत ते सोंडेवाडी - ३५०/- (एकूण प्रवाशी ७ ) 
लागणार वेळ : अर्धा पाऊण तास ..
सोंडेवाडी ते गडमाथा - १ तास 
गडमाथा ते पायवाट (सोंडेवाडी ते वावरले एकत्रित जुळणारी पायवाट  ) - पाऊण  एक तास 
पायवाट ते वावरले ( रानावनांतून  ) - २ तास 
वावरले (ठाकूरवाडी ) ते हायवे - पायपीट - एखाद तास 
वावरले (हायवेपासून ) - कर्जत ( टमटम ने ) 
प्रत्येकी १० रुपये ...

सहभागी मित्रावळीची नावे : यतीन 
कला 
रश्मी 
तेजा 
रोहन 
रुपेश 

आणि मी ....







(हा सह्याद्री जसा सर्वांग सुंदर, तसा तो रौद्र भीषण हि आहे. हे ध्यानी ठेवूनच चालावे .  नियमांचे आणि शिस्तीचे पालन करावे.  

वेबसाईट : पावसाळी ‘सोंडाई’ दर्शन