शुक्रवार, २० डिसेंबर, २०१३

स्वप्नं ...... जेव्हा सत्यात उतरते


सफर वनदुर्ग वासोट्याची अन मकरंदगड-प्रतापगडाची.....
















जीवन हे अनेक स्वप्नांनी, इच्छा आकांक्षांनी रंगलं आहे ,सजलं आहे . अन त्यामुळेच जीवन जगण्याला एक अर्थ आहे .
तसं प्रत्येकाच एक स्वप्न असतं. अंतरंगात उमटलेले , मनी साठलेलं...

त्या स्वप्नांना अनुसरूनच जो तो हे जीवन रंगवत असतो. 
निरनिराळ्या रंगानी . ते स्वप्न सत्यात उतरावं , ते पूर्णत्वाला जावं ह्यासाठी सतत धडपडत असतो . 
 सामोरी येणारी जड अवघड आव्हाने हि तो पेलण्यास सदा तत्पर असतो. तसं पहायला गेल्यास प्रत्येकाचं स्वप्न ' निराळं' , अन त्याप्रमाणे येणारी आव्हाने हि त्या प्रमाणे निरनिराळी . 
यशाची उत्तुंग शिखरे पदो पदी गाठावी . स्वप्न साकार व्हावं अस प्रत्येकाला वाटत .
तसे मला हि ..वाटतं. 

माझ हि आयुष्य अशा अनेक स्वप्नांनी रंगल आहे. त्यात हे '' गड - कोट किल्ले'' एक.
महाराष्ट्रातील एकूण एक किल्ले पहावे, तिथला इतिहास जाणून घ्यावा , 
तिथल्या वास्तू बारकाइने निरखून  घ्याव्यात ...
तिथल्या निसर्गाशी गुज गोष्टी करत त्या वातावरणाशी अगदी संलग्न होवून जावे असे सतत वाटत राहते . 
आणि हे वाटनेच मला दर शनिवार रविवार माझ्या पाउल वाटेने माझ्या स्वप्नाच्या दिशेने घेऊन जाते. .

असंच , एक कित्येक दिवसापासूनच स्वप्न होतं. मनी साठलेले , वनदुर्ग वासोटा ची सफर करायची -
निबिड अरण्य , वन्यश्वापदांचा मुक्त वावर, एकीकडे शिवसागराचा मनाला थक्क करणारा अथांग जलाशय , हरिश्चंद्रगडाच्या कोकण कड्याची आठवण करून देणारा बाबू कडा, त्याच भव्य दिव्य रूप , नवीन वासोटा , जुना वासोटा , नागेश्वराची गुहा . 
वासोट्याबद्दल वाचनात आलेले अनेकानेक ब्लॉग तिथला थरार , तिथला इतिहास इतकं सार वाचून ऐकून तिथे जाण्याची उत्सुकता तर शिगेला पोहोचली होती.

म्हणून कधी एकदा वासोटा करतोय , कधी एकदा तो योग जुळतोय ह्याचीच अति आतुरतेने वाट पाहत होतो , अन काही हि म्हणा जर मनापासून इच्छा असेल , आणि त्या उपरवाल्याचा वरदहस्त असेल तर मनातली ती सुप्त इच्छा पूर्ण होण्यास वेळ लागत नाही .

एके दिवशी असंच बहिणीला फोन आला पुण्यावरून ...पुण्यातले पराडकर काका बोलत होते,
वासोटा करायचा आहे , नोव्हेंबर किंवा डिसेंबर मध्ये ? तयार आहात ना ? काय ते ठरवा अन सांगा ?

बस्स इथपासून आमची सुरवात झाली ........आमच्यातल्या ' क ' ह्या प्रश्नसंचाची. 
कोण कुठे ?काय नि कस ?किती ? वगैरे वगैरे ....एकमेकांना विचारन सुरु झालं. 

त्यात भेटी गाठी होऊ लागल्या . अन सर्वतोपरी एकमताने डिसेंबर ची ६-७-८ ह्या तारखेवर शिक्का मोर्तब झाले.
आमच्यातला पुढारी ' यतीन' ने ह्यात पुढाकार घेत ट्रेक चे व्यवस्थित नियोजन केले .

९ जणांचा आमचा चमू वासोटा (सातारा) ट्रेक साठी तयार झाला. त्यात यतीन , रश्मी , संपदा , सुशील , सुशांत , मयुर , लक्ष्मन , हेमंत नि मी होतो. 

गुरवार दिनांक ५ डिसेंबर ला रात्री ९:२५ ची कल्याण हून महालक्ष्मी एक्स्प्रेस ने सातारा गाठायचे ठरले होते. 
त्याप्रमाणे आम्ही सर्व ९:१५ पर्यंत कल्याण स्थानकात पोहचते झालो. ( एक मित्र वगळता, त्याला येण्यास उशीर झाल्याने , ९:२० ला कल्याण हून सुटणारी ट्रेन सुटली नि त्याला खाजगी वाहनाने सातारा गाठावे लागले .)















पहाटे ३ वाजून १७ मिनिटाला आम्ही सातारा स्थानकात पाउल ठेवले , तेंव्हा थंडीने अगोदरच आपले बाहू सर्वत्र पसरले होते . तिच्या मगर मिठीत सारेच आले होते . त्यामुळे कुणाची कुडकुड हूडहूड चालूच होती.

सातारा रेल्वे स्थानकात तशी फारशी वर्दळ न्हवती. मोजता येतील इतकीच माणसे होती
नाही म्हटले तरी पहाटे ३:२० ला इतक्या लवकर कुठे वर्दळ असणार हो .
असो , तसा अजून बराच वेळ होता म्हणा . पहाटे ५ वाजून ३० मिनिटाची ची ,सातारा एसटी डेपो मधून बामणोलीसाठी एसटी होती. त्या एसटी तून आमचा पुढचा प्रवास होणार होता.
काही वेळ आमचा असाच इकडच्या तिकडच्या गप्पात निघून गेला अन क्षणभरात एक चार चाकी वाहन (क्रुझर ) आम्हाला घ्यायला आली.


तसे ठाण्याचे आम्ही ९ ट्रेकर्स आणि पुण्यावरून काही जण येणार होते , थांबा किती ते आकडेमोड करतो , एक पराडकर काका (गुरुजी) , ते दिघे भाऊ , ती छोटी , राहुल , अक्षय , सागर , आणि ते दोघे असे , हा असे दहाजण. म्हणजे आम्ही सर्वमिळून १९ जण होतो .

दिलीप पराडकर (काका) -
आणि त्यांचा ग्रुप , खर तर पराडकर काका आज आम्हाला दोन वर्षांनी भेटणार होते. 
दोन वर्षापूर्वीची त्यांची आमची भेट ती हि काही अवधीचीच , सिद्धगड - भीमशंकर ट्रेक दरम्यानची .पण त्या भेटीत त्यांचा प्रभाव आम्हावर (विशेषता माझ्यवर ) न पडो म्हणजे झाले.

जवळ जवळ पाउने तिनसे किल्ले त्यांनी सर केले आहे . आणि त्यामुळे त्यांच्याकडे माहितीचा साठा हि तितकाच .आणि ते आम्ही सिद्धगड - भीमाशंकर ट्रेक दरम्यान अनुभवल होत . ऐकल होत.
पेशाने ते तसे शिक्षक ,अन सह्याद्री वर त्याचं मनापासून प्रेम . म्हणून रानं वन पायदळी तुडवत त्यांची भटकंती सतत चालू असते . सर्व जण त्यांना गुरुजी म्हणतात . आम्ही मात्र काका . :)

आज त्यांच्यामुळेच खर तर वासोटा करायची संधी मिळाली होती.
आमच्या आधीच ते पुण्याहून साताऱ्याला त्यांच्या एका ओळखीच्या ठिकाणी (घरी) येउन पोहचले होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्यासोबत आलेली क्रुझर (चार चाकी वाहन ) आम्हाला आणण्यास पाठवली.

साधारण ४ दरम्यान आम्ही सातारा रेल्वे स्थानक सोडले . आणि चार चाकी वाहनाने (त्या क्रुझरने ) पुढे एसटी डेपो कडे सरकायला लागलो . आमचा एक मित्र हेमंत (ज्याची ट्रेन सुटली होती ) काही मिनिटातच सातारा एसटी डेपोत पोहचता झाला . त्याला सोबत घेऊन आम्ही ते (ते सर्व पुणेकर )जिथे मुक्कामी होते त्या घरी पोहचलो. खर तर एसटीने सिधा बामणोलीला जायचा आमचा प्रस्ताव होता .पण नंतर तो प्रस्ताव मोडला नि एकत्रित कसे बसे जागा करत एकमेकांना सांभाळत आम्ही त्या क्रुझरनेच त्या पाहुण्या घरी पोहोचलो.

तिथे थोडी विश्रांती घेऊन अन गरमा गरम चहाचा घोट घशात ओतून नि त्याबरोबर गप्पांचा ओघ तिथेच ठप्प करत आम्ही ६ दरम्यान तिथून बामणोली कडे प्रस्थान केले.
जाता जाता अजिंक्य ताराची नजरभेट घेऊनच ..

पुढे हळूहळू गाडीने जसा वेग धरला अन वेड्या वाकड्या वळणावरून घाट वाटावरून जशी ती पुढे धावू लागली.
तसं तसे दूरवरचे डोंगर दर्याचे विहिंगमय दर्शन मनाला साद घालू लागली .
त्यातच उगवत्या सूर्य नारायणाचे ते सप्तरंगी छटा मनास अधिक झुलवू लागले आनंदाच्या मुक्त लहरीत .

हा निसर्ग ..किती अद्भुत आहे बघा ! त्याच रूप त्याच सौंदर्य ,त्याच रहस्य कशा कशालाच तोड नाही .
किती बर घ्यावं त्या कडून ,
किती तरी शिकावं त्या कडून
नुसतंच टकमक पाहावं कधी ,
नुसतंच कान टवकारून ऐकावं कधी
शिकवेल तो रंग जीवनाचा
दरवळेल स्नेह हर्षाचा !
- संकु



निसर्गाची ती किमिया , ती नवलाई मनात साठवून ठीक ७:३० वाजता आमची गाडी बामणोली ला पोहोचली.
जवळ जवळ तास दीड तासाच्या त्या प्रवासात निसर्गा च्या सौंदर्या सोबत गाडीत सुरु असलेल्या उलट्यांचा गंधाचा देखील आस्वाद लुटता आला .(आता 'आस्वाद लुटता आला' ह्या शब्दापलीकडे दुसरा 'शब्द' काही सुचला नाही हो , तुम्हाला काही सुचतय का ? सुचलं तर सांगा )

गाडीच्या उजव्या डाव्या बाजूच्या खिडकीत एक सागर नि एक अक्षय आपल शीर बाहेर काढून ओकन्याचा कार्यक्रम अधे मध्ये चालू ठेवतं.:P :-) त्यामुळे इतर काही म्हणजेच मी नि मयुर आम्हाला सुद्धा पोटात मळमळायला सुरवात झाली .
(कस असतं , कधी कधी दुसर्यांच्या उलट्या पाहूनही आपल्याला उलट्या होऊ शकतात नाही का ? )पण अधे मधे ब्रेक घेतल्या कारणाने आमची विकेट पडायची राहिली .

असो ...
वासोट्याला जाताना बामनोलीत उतरून वन अधिकाऱ्यांची रीतसर परवानगी घेऊन मग पुढे जावे लागते. आमची गाडी बामणोलीला पोचताच यतीन आणि फिरोज काका परवानगी घेण्यासाठी तिथेच थांबले. आणि इतर आम्ही पुन्हा वळणावळनाचा घाटरस्ता उतरत पुढे तापोळ साठी मार्गीस्थ झालो.

बामणोली वरून खर तर वासोट्या साठी लौंचची सोय असते . पण ह्या वेळेस त्याचं काहीतरी संप वगैरे चालू असल्यामुळे आम्हला २ तासाची वळणा वळणाची रपेट करावी लागली.

तशी तापोळ वरून आमच्यासाठी २ नौकेची सोय झाली होती. अगोदरच त्यांच्याशी बोलणं वगैरे करून . साधारण सव्वा नऊ साडे नऊ दरम्यान आम्ही तापोळला येउन पोहचलो . ते कोयानाचे विशाल पात्र डोळ्यात साठवूनच.

पुढे तापोळला गाडी एका ठिकाणी पार्क करून ...आम्ही नौका सफर साठी तयार झालो.
ह्या पुढचा प्रवास आमचा शिवसागराच्या अथांग जलाशयातून होता.





साधारण दहा वाजता आधे ईधर आधे उधर करत आम्ही नौकेत पाउल ठेवले.

अन काही वेळेतच इंजिनाचा आवाज गरजू लागला . अन हवेत धुरांचे लोळ उसळत , अन खाली पाण्याचे वलय उमटत आमचा त्या नौकेतून वासोट्या कडे तरंगमय प्रवास सुरु झाला.
------------------------------------------------------------------------------------------------------

वासोटा - इतिहासाकडे एक नजर फिरवल्यास ...

कोल्हापूरच्या शिलाहारवंशीय दुसऱ्या भोज राजाकडे ह्या किल्ल्याच्या निर्मितीचे श्रेय जाते . 
नंतर प्रथम शिर्के व मग मोरे यांच्याकडे त्याचे स्वामित्व गेले.
शिवरायांनी जावळीच्या चंद्रराव मोर्यांची चंदाराई बुडवून जी काही अमोलिक दुर्गरत्ने प्राप्त करून घेतली , त्यात रायगड , वासोटा हि प्रमुख होती.

वासोटा किल्ल्याच्या प्राचीनत्वाचा शोध घेता आपल्याला वसिष्ठ ऋषींच्या काळापर्यंत मागे जावे लागेल. असे मानले जाते की, वसिष्ठ ऋषींचा एक शिष्य, अगस्ती ऋषी यांनी विंध्य पर्वत ओलांडून दक्षिणेकडचा मार्ग शोधला, सह्याद्रीच्या कोयना काठच्या त्या शिखरावर राहण्यास आला व त्याने आपल्या निवासी डोंगराला आपल्या गुरूंचे नाव दिले. कालांतराने या देशीच्या क्षत्रियांनी त्या डोंगराला तटाबुरूजाचे साज चढवून लष्करी ठाणे केले. त्या डोंगराचे परंपरागत ’वसिष्ठ’ हे नाव अपभ्रंश होऊन ‘वासोटा’ झाले.

त्याच वासोट्याचे रूप न्ह्याहाळत ...मनी उमललेल्या स्वप्नाच्या दिशेने आमचा खराखुरा प्रवास सुरु झाला .
एक आगळीक हुरहूर , एक आगळीक मजा अन नवा उत्साह संचारला होता ..तना मनात !
डोळे भिरभिरत ..चूहु दिशेने .
कुठे पाहू कुठे नको ..., सर्वत्र आनंदाचा स्वर '' किती अनोखं , किती विलोभनीय !
सृष्टीचं च इतकं मनोवेधक दृश्य मनाला स्वर्ग सुखाचा आनंद देत .

सूर्य नारायणाचे तेज लहरी हि शिवसागराच्या मुखपटलावरती एखाद्या अलौकिक मोतीवाने झळाळत .
तेंव्हा असे भासे कि , जणू सागराच्या पोटी वर्षानुवर्षाच्या तपानंतर मिळणारा एखादा मोती आज ह्या जलाशयाच्या मुख पटलावरती कितीएक संख्न्यान एकत्रितरित्या झळाळत आहे . अन सृष्टीच्या सौंदर्यात अधिक्तेने भर घालत आहे .

तिन्ही बाजूस घनदाट झाडी , वर मोकळा आकाश ,नजरेत सामावणारा अन क्षणाक्षणात समीप येऊ पाहणारा , गर्द झाडीत स्वतःला लपेटून घेतलेला अन जमिनीपासून साधारण २ हजार फुट उंचीवर वसलेला वासोटा , त्याच रांगड रूप ...अन शिवसागराचं वाहत्या
(धावत्या )नौकेतून होणार अथांग दर्शन ..! काय म्हणावं....
निसर्ग 'खरंच. वेड' लावतं अक्षरशा वेडं !

साधारण २ तासाच्या नौकाविहारातून आम्ही वासोट्याच्या पायथ्याशी येउन पोहोचलो.
अन खांद्यावरून उतरवलेली पाठ्पिशावी पुन्हा खांद्यावर घेत. नौकेतून पायउतार झालो .


कोयना अभयारण्याच्या स्वागत कक्षेत आमचा आता प्रवेश झाला होता . प्रवेश दरम्यानच वाघाची छबी अन त्याची दिलेली माहिती आम्हाला ..सावधतेचा इशारा देत होती .
' वन्य श्वापदांचा मुक्त संचार असलेल्या अभयारण्यत आता तुमचा प्रवेश होत आहेत' . तेंव्हा जरा सांभाळून असा जणू इशाराच होता तो.

तिथून एक दोन एक पाऊल पुढे टाकत आम्ही वन अधिकाऱ्यांच रेस्ट हाउस जवळ आलो. वनअधिकारी आमच्या स्वागताला तयार होतेच. 











स्वागत कस तर इथे हि क ' ह्या बाराखडी पासूनच .....,
कुठून आलात ,किती जण आहात ? काय नि कस वगैरे वगैरे ...!

हे सर्व सांगून झाल्यावर नंतर हि ...प्रत्येकाकडे किती बॉटल्स आहेत , प्लास्टिक पिशव्या किती आहेत ? ह्याची तपासणी अन मोजणी...
खर तर हे एक बर झालं . प्लास्टिक अन कचरा मुक्त जंगल वर्षो न वर्षी तरी टिकून राहील .
नाहीतर जिथे जातो तिथे असतोच प्लास्टिक अन कचर्याचा ढीग इकडे तिकडे पसरलेला .
शिस्त नाहीच .....
अशाने चला शिस्त तरी लागेल. जे फक्त दारू ढोसायला अन पिकनिक म्हणून गडवारया करतात त्यांना काही अंशी तरी ..!

असो ,तर मूळपदावर येतो
दुपारचे बारा वाजून गेले होते. पाठीवरल्या पिशव्यांच ओझं नको म्हणून फक्त काही पाठ पिशव्याच सोबत घेत (त्यात द्पारच जेवण अन पाण्याच्या काही बॉटल्स मोजून घेतलेल्या ) इतर पाठपिशव्या वन अधीकारयाच्या देख्रेखाली ठेवून दिल्या.

अन रानावनातून पायवाटा तुडवत वासोट्याच्या दिशेने वाटचाल करू लागलो.
जाता जाता काही एक अंतर सोडून , इतर वन्यप्राणी पक्षांचे वन अधिकारांनी लावलेले माहिती फलक त्याचं इथलं असणारया वास्तव्याची जाणं करून देत होते.

काही वेळेतेच म्हणजे जवळ जवळ १५- २० मिनिटाने एक खळखळता ओढा ओलांडून आम्ही हनुमान अन गणेश मूर्ती एकत्रित असलेल्या बिना छपराच्या मंदिरा जवळ आलो.




तिथे थोडा विसावलो ते दर्शन घेत उभ्या उभ्याच ..!
 
चहूकडे पसरलेली घनदाट झाडी ,अन शांत लहरीत विसावलेला थंडावा मन अगदी प्रसन्न करी.
मंदिरासमोरून वाहणारा खळखळता ओढा मनाचे तरंग उठवी. त्याचं पाणी इतक गोड अन शीतल कि असलेली तृष्णा सहज भागे.
इथून पुढे दीड तासाच्या प्रवासात पिण्याच पाणी मिळणार न्हवत. त्यामुळे रिकाम्या झालेल्या बॉटल्स इथल्या इथेच भरल्या अन
'' वासोट्याकडे '' असा बाण दर्शवणार्या पाटी कडे एक वार पाहत आम्ही पुढचा रस्ता धरला. 

साधारण दीड तासाच्या सुखद चढनी नंतर , आम्ही गडाच्या ढासलेल्या दरवाज्यापाशी ' ढासळंलेल्या तर काही शाबूत ' अश्या पायऱ्यानिशी गडावर पोहोचलो.


दरवाज्या जवळच एक दगडी जोथा त्याच अस्तित्व दाखवत निपचित पडून होता. एक चाल पुढे गेल्यावर हनुमानाचं विनाछपराच मंदिर दिसलं . हनुमानाची ती सुंदर सुबक मूर्ती लक्ष वेधून घेत होती. त्यामुळे मन आवरेना ..नजरेच्या कैदेत ते क्षण सामवून, मनोमन वंदन करून कॅमेरात ती प्रतिमा बंदिस्त करू लागलो.

हनुमान मंदिरापासूनच डावीकडे जाणारी वाट आपल्याला पाण्याच्या टाक्या जवळ अन बाबू कड्यापाशी घेऊन जाते. हरिश्चंद्रगड गडाच्या कोकण कड्याशी साधर्म्य असणारा हा कडा तितकाच विलोभनीय आहे .
समोरच जुना वासोटा आपला दर्शन घडवत इतिहासाची पुनवृत्ती करतो
वासोट्याचा जुळाभाऊ जुना वासोटा हा उंचीनं अधिक असल्याने इथे घडलेल्या प्रत्येक लढाईत हा वासोट्याचा काल ठरला आहे. 
बापू गोखल्यांशी आठ दहा महिने प्रखर झुंज देऊन ताई तेलीनीने (ओंध पंत प्रतिनिधी ह्यांची स्त्री) हा किल्ला लढवला . पण शेवटी १७३० रोजी हा किल्ला बापू गोखले ह्यांच्या ताब्यात आला. तो जुना वासोट्या वरून तोफा डागल्यानेच .
१८१८ सालच्या शेवटच्या इंग्रज मराठे युद्धाततही जुन्या वासोट्या वरूनच मोर्चे बांधणी केल्याने .हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.

इतिहासाची अशी रक्तरंजित शौर्य कथा ऐकून वाचून अन प्रत्यक्ष ती तिथे अनुभवून,  मन प्रत्येक इथल्या बाबीला वास्तुला , त्यां शूर सेनानींना सलाम करतं त्यापुढे नतमस्तक होतं.
सह्याद्रीतल्या अशा प्रत्येक किल्ल्यावर जावून आपला माथा तिथे टेकवावा अस हे पवित्र स्थान म्हणजे आपले गड किल्ले ..खरचं..!

इतिहास संदर्भ -
१) ट्रेक क्षितीज वेबसाईट
२) साद सह्याद्री भटकंती किल्ल्यांची - प्र. के घाणेकर

क्रमश :- पुढचा भाग लवकरच ..
संकेत य. पाटेकर
२०.१२.२०१३
२७.१२.२०१३


मंगळवार, १९ नोव्हेंबर, २०१३

'' आमची रायगड वारी''


इंटरनेट माध्यमातून घेतलेला फोटो ..
आषाढी एकादशीला वारकरी जसे तहान भूख विसरून,विठू माउलीच्या नावाचं गजर करत अगदी तल्लीन होवून आपलं देहभान विसरत आपुल्या माउलीच्या दर्शनासाठी ,त्याच्या भेटीसाठी मैलो दूर प्रवास करत पंढरी वारी करतात.
तसेच माझ्या ह्या लाडक्या राजाच्या भेटी साठी , ह्या गड किल्ल्यान वरील पवित्र माती लल्लाटी लाविन्या साठी ,इथली प्रत्येक वास्तू अन चिरयान चिर्यातून घडलेला सारा इतिहास हृदयी सामावून त्यातून प्रेरणा घेऊन इथे नतमस्तक होण्यासाठी ..पाऊल आपुसकच दर शनिवार रविवारी ह्या प्रेरणादायी गड किल्ल्यांकडे वळली जातात .
मनाचा एकच गजर करून ....इथल्या मातीला प्रणाम करून ..
जय भवानी जय शिवाजी ..!!

त्यातल्या त्यात राजगड अन रायगड असेल तर तन मन अगदी शिवमय होवून जातं.
कारण हि तर आम्हला तीर्थक्षेत्र . इथला प्रत्येक चिरा ना चिरा आपल्या राजाची, त्यांच्या शौर्याची , पराक्रमाची , त्यांच्या सदहृदयी मनाची महती सांगतो.
इथल्या एक एक प्रसंगाची आठवण करून देतो. ते सार पाहताना, अनुभवताना मनाची कधी समाधी अवस्था लागते तर कधी तना मनात आत्म्विश्वाचे नवे बळ संचारते.

काल परवाच असंच रायगड वर जाण्याचा पुन्हा योग आला .
तशी हि माझी चौथी खेप , खेप म्हणण्यापेक्षा चौथी वारी ..रायगड ची !
तरी सुद्धा रायगड काही अजून पूर्ण पाहून झालाच नाही .
पण रायगड वर जे अनुभवलं , जे पाहिलं ते '' सुवर्ण क्षण '' कायम स्मरणात राहतील असेच आहे.
(तसं तुम्ही एकाच ठिकाणी कित्येक वाऱ्या केल्या तरीही तुम्हाला प्रत्येकवेळी नवं काही अनुभवयास मिळतंच मिळत .ह्या वेळेसही मला नवं काही पाहायला मिळाल ,अनुभवयास मिळाल . ) 
















इतिहासाचा अमुल्य साठा असणारे , आपल्या गड-किल्यांवर , शिवरायांवर नितांत प्रेम असणारे ,
वयाच्या पंच्यातरीतही गड किल्ले सर सर चढणारे उतरणारे , इतिहास संकलक अप्पा परब ह्यांची योगा योगाने भेट घडली ती रायगड वरच .
त्यांच्या ह्या आगमनाने मात्र इतिहासाची न उलगडलेली अमुल्य पाने आज आमच्या समोर पुनः उलगडू लागली .
राणी महाल पासून , राजवाड्यापर्यंत , टांकसाळ ते भवानीहुडा (देवघर )पर्यंत , राजदरबार ते
नगारखाना ह्यां मध्ये एका बाजूला असलेल्या त्या खडकाच (भूमी पूजनाचा खडक ) नक्की प्रयोजन काय ? इथ पर्यंतचा इतिहास त्या संबंधित कथा नव्यानेच ऐकण्यास मिळाल्या .
ते ऐकताना अंग अंग शहराल . 
पुढे दुपाच्या भोजनाची वेळ झाल्या कारनाने आम्ही आमच्या वाटेस लागलो. आमच्या मुक्कामी पोहचलो .
(जिथे आजची रात्र काढणार होतो ) तिथे थोडी पेट पूजा आटोपून काही वेळाने पुन्हा मार्गीस्थ लागलो . 
ते होळीच्या माळेवरून , बाजारपेठेतून , टकमक च्या दिशेने...


जिथे आज एक फर्मान निघाल होतं. 
आज एकाचा कडेलोट होणार होता , आणि त्या शिक्षेच पात्र ठरलो होतो तो ''मीच'' . (अर्थात हा गंमतीचा भाग ) 
कडेलोट करण्याचमागच कारण मात्र त्या दोन देवींनाच माहिती . 
एक तर गीतू अन स्नेहू , बहुतेक मी प्रवासात किंव्हा काही दिवसांपासून त्यांना थोडा अधिक त्रास दिला असावा 
इतकच . पण त्याची किती मोठी हि शिक्षा ..!!
अर्थात हा गंमतीचा भाग .
पुढे पाउल जशी टकमक टोका कडे सरसावू लागली . 
तसं तसे ह्या राकट कणखर सह्याद्री रांगांनी त्यांच्या नयनरम्य दर्शनाने मन अगदी मंत्रमुग्ध झालं.

एकीकडे दिसणारा कोकण दिवा पुढच्या मोहिमे साठी तयार रहा अस म्हणत मनाशी सांगड घालू पाहत होता . रायगडाच दर्शन इथुन हि किती सुंदर मोहक दिसत ते जरा पाहून घे ? 
ये कधी तरी आपल्या सवंगड्यांना घेऊन इथे हि माझ्या अंगा खांद्यावर ...
मी तुला रायगडच सोनेरी रूपाच दर्शन घडवेन .
आजोबा - नातवाचं जस खेळकर प्रेम असतं . तसं प्रेम ह्या क्षणी मनी दाटून आल होतं .

टकमक टोकावरील घुंगावनारा वारा अजूनही त्या क्षणाची आठवण करून देत होता . 
म्हणत होता बघ त्या दिशेला दिसतंय का ते गाव , छत्री निजामपूर .., हो , हो तेच ते ..छत्री निजामपूर !

''छत्रीचा दांडा सोडू नकोस घट्ट धर '' असे म्हणणारे शिवराय आणि तो वाऱ्याच्या लाटे समवेत हवेत तरंगत असलेला शूर मावळा '' येथूनच हा सारा प्रसंग घडला होता आणि मी त्याला प्रत्यक्ष साक्षी होतो .
कित्येक वर्ष होवूनही हा प्रसंग मी इथे येणारया प्रत्येकाच्या कानी मनी हळूच सांगत असतो . 
त्या प्रसंगाची आठवण करून देत असतो .

निसर्गाच्या अशा प्रत्येक बाबी आपल्या मनाशी काही ना काही गुजगोष्टी करतच असतात . त्यासाठी संवेदनशील मनाची अन निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीत समरस होण्याची सवय जोडावी लागते . मग मनासोबत निसर्र्गाच्या नितांत गप्पा सुरु होतात . मग वारा बोलू लागतो , नदी नाले , डोंगा दर्या , पक्षी पाखरे , वृक्ष वेली , निर्जीव दगड धोंडे हि आपल्याशी गुजगोष्टी करू लागतात .
-------------------------------------------------------------------------
मन अशाच गुजगोष्टीत हरवलं असता . '' चला निघूयात'' अशी आर्त हाक ऐकू आली .
अन पाउलं टकमक टोका कडून ..जगदीश्वराच्या प्रासादलया कडे हळूच वळू लागली .
...जगदंब जगदंब नामस्मरण करत !! 

 
आता सायंकाळचे ५ वाजत आले होते .
सूर्य नारायण हि मावळतीला त्याच्या रोजच्या दिन क्रमानुसार वाटचाल करू लागला होता .
त्याची तांबूस सुवर्ण किरणं मात्र अंगाखांद्यावर अजून लोळण घेत होती .
पाउलं हळूवार टप्प्या टप्याने जगदिश्वरच्या दिशेने ...मार्गीक्रमण करत होती .

पुढे काही मिनिटे अशीच चालत गेल्यावर ,
एका सपाटीवर ,वृक्ष वेलींच्या दाट सावलीखाली ,थकल्या भागल्या लोकांची तृष्णा भागविण्याकरिता एक १०- ११ वर्षाची गोड मुलगी( नाव गीता )
लिंबू पाणी, ताक, कोकम सरबत ह्यांनी भरलेलं भांड कुंड एका टेबलावर जमवून , आमच्या येणाऱ्या चेहऱ्याकडे कटाक्षाने पाहत उभी होती. आम्ही समोर येताच तिच्या गावरान बोलीत,
दादा ताक घेता का ? ताक अस म्हणत ? मनोमन आम्ही ते घ्याव प्यावं अस , नजरेन सांगत होती .

तशी आमची मनं हि तृष्णेने काहीसी व्याकूळ झालेली . त्यामुळे क्षणभर त्या वृक्ष वेलीच्या दाट छायेखाली विसावा घेत आम्ही घट्ट ताकाचे एक दोन पेले गटा गटा पीत आमची तृष्णा भागविली .
अन काही क्षणाच्या विसाव्या नंतर , थोड्या अधिक चढणीचा मार्ग पत्करत , काहीसे अंतर चालत आम्ही जगदिश्वराच्या प्रवेश द्वारातून प्रांगणात प्रवेश करते झालो.

मंदिर म्हटलं कि ते एक पवित्र स्थान . अन त्याला फार महत्वाच स्थान आहे आपल्या जीवनात .
कारण देव देवतांचा तिथे वास्तव्य असतं. आणि अशा जागी ईश्वरी पण एक अदृश्य शक्ती सदा वास करत असते .
अन हिच शक्ती आपल्या तना मनात , नव्या परीने सकारात्मक विचारंच बळ प्राप्त करून... चैतन्याच नव अंकुर  रुजवू लागते. अशा चैतन्यमय वातावरणात मी प्रवेश करता झालो . तन मन अगदि प्रसन्न झालं .
पण पाउल जशी पुढे पुढे सरकू लागली तसं ' मन' पुन्हा इतिहासाकडे वळू लागल .
इतिहासाची अमुल्य पाने पुन्हा उलगडू लागली.

अन भारवलेल्या त्या क्षणाची पुन्हा आठवण झाली. नजरेसमोर सारा क्षण पुन्हा जिवंत झाला .
इथेच ह्या प्रांगणात ...
गडावरील काही मंडळी आपल देहभान विसरून ...
त्या १३ वर्षाच्या त्याच्या पहाडी आवाजानं त्याच्या काव्यान अगदी ध्यान मग्न झाली होती .

एकच आवाज चारी बाजूने दुमदुमत होता .
सेर सिवराज है ! सेर सिवराज है !

मंदिराच्या त्या कच्छ मंडपात तो बालक अर्थात कवी भूषण ''
त्याने रचलेले काही छंद शिवरायांसमोर आपल्या वज्र बोलीत पहाडी आवजात गाउन दाखवत होता .
इंद्र जिमी जम्भ पर बाड्व सुअम्ब पर
रावण सदम्भ पर रघुकुलराज है ||१||
पौन बरिवाह पर | संभु रतिनाह पर |
ज्यो सहसबाह पर | राम द्विजराज है ||२||

दावा द्रुम दंड पर | चिता मृग झुंड पर |
भूषण बितुंड पर | जैसे मृगराज है ||३||
तेजतमअंस पर | कान्ह जिमी कंस पर |
त्यों म्लेंछ बंस पर| सेर सिवराज है ||४||

सेर सिवराज है ! सेर सिवराज है!

ह्या आवाजाने सारा आसमंत दणाणून गेला होता . जो तो तल्लीन झाला होता . त्या भावसमाधीतून बाहेर पडू इच्छित न्हवता. ह्या पंक्ती त्याने तब्बल अठरा वेळा म्हणून दाखवल्या होत्या .
शिवरायांनी त्याला योग्य ती बक्षिशी दिली होती .

हा सारा प्रसंग इथेच घडला होता . आणि त्याचा प्रत्यय, ' आता ह्या क्षणी हि येत होता . जणू हा प्रसंग नजरेसमोर घडतोय घडत आहे . आणि मी त्यास प्रत्यक्ष साक्षी आहे .

छत्रपति शिवराय अन कवी भूषण ह्यांची हि पहिली भेट .
अन हे इतिहास संकलक अप्पा परब ह्यांनी फारच सुंदरतेने वर्णन केल आहे . त्यांच्या पुस्तकात .
ते तुम्ही अवश्य वाचा.

इथे आल्यावर आपली हि भावसमाधी लागते. आपण हि त्या लयात अगदी नाचू डोलू लागतो .
तन मन गाऊ लागत.

सेर शिवराज है ..!!

क्रमश :-
संकेत य पाटेकर
३०.११.२०१३


मंगळवार, २ जुलै, २०१३

आजोबांच्या भेटीस ...... Trek to Ajobagad / Aja Parvat

हिरवे हिरवे गार गालिचे ,
हरित तृणाच्या मखमालीचे ..

पावसाळ्यात कुठे हि ट्रेक ला जा ,सह्याद्रीच्या कड्या कपारयातून फिरा, बालकवीं त्र्यंबक बापूजी ठोंबरे ह्यांच्या ह्या पंक्ती हमखास मुखी नाचू लागतात , आनंदाच्या स्वर लहरी मध्ये .., संगीताचे वलय निर्माण करून ..

हा निसर्ग अगदी भुलवून टाकतो आपल्याला , त्याच्या लावण्यमय सौंदर्याने ..., पण कधी कधी त्याच सौंदर्याला मानवी रूपाच एक डाग लागत . ती खंत मनास वाटू लागते . त्याचच वाईट वाटत खूप.

काल असच आजोबांच्या (आजोबा गड / आजा पर्वत ) भेटीस गेलो होतो ,जाता जाता निसर्गच ते भव्य , मोहक रूप नजरेत सामावून.

रस्त्याच्या दुर्तफा चहु कडे पसरलेली हिरवाई, अधे मध्ये पावसाची ओघळती सर , नद्या ओढ्यांचे , वाहते रूप , त्यातून होणारा खळखळाटी स्वर , नांगर घेऊन , बैलांस जुंपून जमिनीची मशागत करणारा शेतकरी , आणि दूर वरून एका ठिकाणी त्याच्या घराचे दिसणारे कौलारू छत ,
कुठे रस्त्या लगतच असणाऱ्या वसतीगृहातील , लहान मुलाचे, ' वेगळेवेगळे भाव दर्शवणारे निरागस चेहरे, असे अनेकानेक क्षण मनास भावतात , एक वेगळाच अनुभव घेत असतो आपण .

काल हि असाच काहीसा अनुभव आला . पण त्यात एक खंत हि मनी लागली .
कि मानवाने त्याच्या स्वार्था साठी निसर्गावर खूप घाव घातलेत , अजून हि तो घाव देतोयच आहे , त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागणार. हे एक कटू सत्य आहे .

वृक्षतोडी नंतर , जंगलच्या जंगल उध्वस्त केल्यांनतर आता मानव '' डोंगरफोडी कडे'' वळला आहे .
कुठे हि जा , एक दृश्य हमखास दिसतं , ते म्हणजे डोंगराला पडलेली खाच , त्यावर पडलेले मानवी मनाने घडवलेल्या क्रूर यंत्राचे हात .

काही काळा ने हे डोंगर दऱ्या हि नाहीसे होणार कि काय ? अस चित्र डोळ्यसमोर येऊ लागत .
सगळीकडे एक सपाटी दिसू लागते , आणि त्यावर इमारतींचे मजलेच मजलेच रचलेले दिसू लागतात . ,
पुढे कृतीम रित्या तयार केलेली डोंगर दरयांची सजावट पाहण्यास लोकं त्यांच्याच परिसरात जावू लागतील.
असो ..पुढच ते पुढच पण आत्ताच काय ? थांबवू शकणार का आपण हे ?

नजरेने टिपलेल्या क्षणांनी मनाच्या भावना हळूच कधी उचंबळून जातात . त्यात कधी हास्य असते तर कधी खोलवर विचारात मग्न करणारी एक प्रेरक शक्ती .
असो ,

ठाण्याहून पहाटे ५:४४ ची आसनगाव लोकल ने आमच्या दहा जणांचा समूह ठीक ५:५६ ला आसन गाव स्थानकात उतरता झाला . पुढे आसनगाव येथून रिक्षा ने शहापूर कडे . तिथून मग एक टमटम ठरवून थेट देहने गाव .
ह्या वर्षीचा पावसाळ्यातला हा माझा , राजमाची , असावा नंतर चा तिसरा पण माझ्या बहिणी सोबतचा पहिला ट्रेक , त्यामुळे आनंदातच होतो.

देहने गाव पासून , वाल्मिकी आश्रम कडे जाणाऱ्या रस्त्या ला , थोडा चढ चढून , आजोबा गडा कडे असा फलक दर्शविणाऱ्या पाटी जवळ रस्त्याच्या एका कडेला आम्ही गाडी पार्क केली (आमची टम टम ..)

संध्याकाळी ५ च्या आत तुम्ही परतणार ना ? ह्या अटीवर, टमटमचे चालक कैलास हे तयार झाले होते . त्यांना संध्याकाळी समर्थांच्या बैठकीस जायचं होत . आणि ते आम्हास तसं प्रत्येक वेळी बजावून सांगत होते . पण मनाच्या सदहृदयी भावेनेन .

गाडी इथेच लावतो ह , तुम्ही बघा , पाचच्या आधी या, जमलंच तर लवकर या ?
कैलाश ह्यांनी जाता जाता पुन्हा हे वाक्य उच्चारल, आम्ही खात्रीशीर येतो म्हणून सांगितल ,
अन बैलगाडीच्या त्या वाटेने धुक्याच्या राशीत लपलेल्या आजा पर्वताकडे पाहत त्या दिशेला आमची पाउलं पुढे पुढे टाकू लागलो .

आजोबागड
निसर्गसंपन्न अशी वनराई , इथेच वाल्मिकी ऋषि चं वास्तव्य होत . इथेच त्यांनी रामायण हा ग्रंथ लिहिला ,
इथेच सीता मायेन , लव कुश अशा दोन पुत्रांना जन्म दिला . हाच तो आजोबा गड , लव कुश त्यांना आजोबा म्हणत , म्हणून आजोबा गड / आजा पर्वत .



























एक , सव्वा एक तासात आम्ही वाल्मिकी आश्रमात पोहचते झालो.
आणि पोहचताच तिथल्या एका वट वृक्षानी , त्याच्या गोलाकार विस्तीर्ण पसरलेल्या असंख्य पारंब्यांनी लक्ष वेधून घेतलं. .
त्याच्याच शेजारी नव्याने बांधण्यात आलेल्या , धर्मशाळेच, ' आतलं काम हि चालू असल्याच कळल. 
चौकशी केली असता , तिथेच काम करत असलेल्या त्या काकांनी , आतले चालू असलेल काम दाखविले...
इथे बरेच जण येतात , त्यामुळे राहणायचा प्रश्न असतो , त्यामुळे हे बांध काम चालू आहे .

बरेच जणू इथे राहू शकतील . दूर वरून येणारे , ५- १० दिवस इथे राहून मग निघू शकतील .
त्याचं बोलन ऐकल्यावर , मी नि यतीन त्या धर्म शाळेतून बाहेर पडलो ,
फार वेळ इथे न थांबता , थेट सीतेचा पाळणा येथे जावून मग पुन्हा आश्रमात येण्याच आणि मग इथला आजू बाजूचा परिसर पाह्ण्याच निच्छित झालं होत . त्यानुसार फार वेळ न दवडता आम्ही १५ मिनिटात तिथून निघालो , पण जाता जाता जीवाच्या आकांताने ओरडणाऱ्या, केवीळवाण्या,त्या किंकाळीने मन सुन्न झाले होते .

मंदिराच्या थोड्या पुढे, काही अंतरावर एका ठिकाणी शेळीच्या त्या निष्पाप छोट्या पिल्लूचा बळी घेतला जात होता . देवाच्या नावाने, ते किंचाळत होतं, जीवाच्या आकांताने . पण ते किंचाळण काही क्षणाचाच होत .
जीव जाताच ते किंकालन हि त्या शांततेत ते विरून गेल .

मन त्यातच पुढे वाहू लागल .
आश्रमाच्या मागच्या बाजूने , धबधब्याच्य वाटेने पाउलं पटपट पडू लागली . घन दाट जंगलाच ते रूप आणि सोबत पक्षांचे सुरेल स्वरगीत आणि वाहते नितळ , शुभ्र धवल असे धबेधबे पाहण्यात मन एकरूप व्हाऊ लागल .

सव्वा तासाच्या, दगडांच्या त्या राशींवरून ती चढ चढून आम्ही दुपारी १२:३० ला सीतेच्या पाळणा ह्या ठिकाणी , त्या गुहेच्या पायथ्याशी येउन पोहोचलो. 




























एका बाजूला व्ही आकाराची खोल दरी , आणि त्या दरी ला रौद्र तसेच भव्य असे रूप बहाल करणारे धुक्याचे दाट थर 
आणि ओथंबून वाहणाऱ्या पावसाची सर ह्यांच्या एकत्रित मिलनाने तिथलं तेवातावरनच इतकं आल्हादायक झालं होत . काय सांगू .......विचारू नका ...


अर्धा तासाचे ते आनंदी क्षण आणि सीतेचा पाळणा , ती गुहा पाहून , नजरेत सामावून नि स्मृतीत ठेवून आम्ही आश्रमाकडे परतू लागलो .

दुपारी १ च्या सुमारास आम्ही खाली उतरण्यास सुरवात केली आणि २:३० च्या सुमारास आश्रमात दाखल हि झालो . 
मग नव्याने बांधण्यात आलेल्या धर्मशाळेत जेवण वगैरे उरकून आसपासचा परिसर पाहू लागलो .


पावसाची संततधार अजून हि तशी सुरुच होती. खाली येता येता त्या घनदाट जंगलातून पावसाने चांगलेच झोडपले होते , सर्वजण ओलेचिंब झालो होतो. 

त्यातच आम्ही जेवण उरकलं आणि आजूबाजूचा परिसर पाहण्यसाठी बाहेर पडलो.






वाल्मिकी आश्रम कडे जाताना समोरच एक विरगळ , आणि सतीशीला आहेत , ते पाहून त्या संबंधी प्रश्न चिन्ह निर्माण झाले ? हे इथे कसे ? इथे काही लढाई वगैरे घडली आहे का ?
कारण आजोबा गड ह्या विषयीचा इतिहास माझ्या वाचण्यात कुठे आला नाही ?

आजोबा गड म्हणजेच आजा पर्वत , वाल्मिकी ऋषि तसेच सीता माई , लव कुश ह्यांच्या वास्तव्याने पावन झालेलं एक पवित्र स्थान. ह्या व्यक्तीरिक्त अजून तरी मला काही माहित नाही . कुणाला काही माहित असल्यास जरूर सांगावे . हि विनंती .

वाल्मिकीची ऋषि ची समाधी पाहून झाल्यास त्याच्या शेजारीच शिव मंदिर आहे , तिथे काही देव देव देवतेचे शिल्प आहेत , त्यात गणेश मूर्ती , विठ्ठल रखुमाई असे काही देविकाची शिल्प आहेत.
त्याच्या थोडा पुढे अजून एक शिव मंदिर आहे. पण आत पाणी आणि गाळ साचल्यामुळे काही आतील शिल्प अथवा शिव लिंग दिसण्यात येत नाही.

कुठे हि बाहेर गेल्यास वेळेच बंधन हे असतच , ते पाळावच लागतं, मनात असो वा नसो ,
आम्ही हि कैलास ह्यांना ५ ची वेळ दिली असल्यामुळे, साडे तीनच्या आसपास आम्ही पुन्हा परतीच्या मार्गाला लागलो . ते सारे क्षण नजरेत आणि कॅमेरात कैद करून .....

अशा तऱ्हेने आजोबांच्या सहवासात दिवस कसा पटकन निघून गेला ते आमचं आम्हालाच कळल नाही .
असो पुन्हा लवकरच येऊ तुमच्या भेटीला ........आजोबा ..:)

संकेत पाटेकर
०२.०७.२०१३

काही सूचना :-
१) तीन वर्षा पूर्वी पावसाळ्यातच इथे एका मुलीचा , सीतेच्या त्या गुहे जवळ जातना , वर चढत असता त्या खोल दरीत पडून मृत्यू झाला होता . हे मी काही ब्लोग मध्ये वाचल होत . आणि प्रत्यक्ष आज आश्रमातील त्या बाबांकडून हि ऐकल . वर पर्यंत जाणे तसे सोपे आहे , नित्य नेहमी ट्रेकर्स मंडलींना ते काही अवघड नाही. पण जातना जरा जपूनच . कारण पावसाळ्यात तो कातळ ओलसर नि चिकट झाल्याने , घसरण्याची फार शक्यता असते . तेंव्हा पुढचा काय तो विचार करावा आणि मग जावे .

२) आश्रमातून सीतेच्या पाळण्या पर्यंत जाता जाता , त्या घनदाट रानातून , मच्छर नि काही चिमुकली पाखरं खूप त्रास देतात . त्यमुएल जाताना काय ते बदोबस्त करून जावे . ओडोमॉस वगैरे ,वगैरे.

खर्चाचा तपशील :-
थानेहून पहाटे ५:४४ लोकल ट्रेन आसनगाव
तिकीट दर - ३० रुपये (जाउन येउन )

आसनगाव ते शहापूर - रिक्षा
तिकीट दर : १० रुपये प्रत्येकी

शहापूर ते देहाने - टमटम
जाउन येउन दर १५०० सांगतात . तुम्ही १२०० पर्यंत येऊ शकता .



























सोमवार, २४ जून, २०१३

असावा गड :- इतिहास जागवणारे काही गड - किल्ले




किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग, डोंगररांग: पालघर
जिल्हा : ठाणे, श्रेणी :सोपी/मध्यम

बहुतेकांना अपरिचित , पण सुंदरसा ,सुखद अनुभव देणारा ,मुंबई ठाण्याहून एका दिवसात करता येईल असा हा छोटेखानी किल्ला . पावसाळ्यात चहूकडे हिरवाईचा रंग उधळत, आणि धुक्याचे पांढरे ओलसर थर ...
स्वतःवर ओढवून घेत लपून बसतो . 
पण त्या मंत्रमुग्ध वातावरणाने स्वतःचे भान मात्र विसरायला लावतो, हे खर !!

(प्राचीनकाळी शूर्पारक, डहाणू , तारापूर, श्रीस्थानक/ स्थानकीय पत्तन (ठाणे), कालियान (कल्याण) इत्यादी बंदरातून मोठ्या प्रमाणात परदेशांशी व्यापार होत. या बंदरात उतरणारा माल विविध मार्गांनी देशावर जात असे. 
या मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी किल्ले बांधले जात. यापैकीच एक आसावा किल्ला...
 डहाणू व तारापूर बंदरांना देशाशी जोडणार्‍या मार्गांवर प्राचीन काळी बांधण्यात आला. 
( ट्रेकक्षितीज या वेबसाईट वरून घेतलेली माहिती)

ठाणे जिल्ह्यातील बोइसर हे एक महत्वाचे ठिकाण आहे . बोईसर ला उतरून , पुढे पाच दहा मिनिटे रस्त्याने चालत गेल्यास नवापूर येथे वारंगडे साठी दहा आसनी जीप मिळते . 
ती आपल्याला १५-२० मिनटा मध्ये विराज FACTORY च्या आधी आणून सोडते . 
तिथेच विराज FACTORY च्या आधी उजवीकडे वळणाऱ्या डांबरी रस्त्याने गडाकडे जाणारी वाट मिळते .

पुढे पाच- दहा मिनिटे चालत गेल्यास रस्त्याच्या वळणावर एक दुकान लागते .
त्याच्या थोड्या आणिक पुढे एक ओहळ पार करत, आपण मळलेल्या पाय वाटेतून चिखलाच्या थरांचे भार आपल्या पायंवर घेत पुढे जाऊ लागतो. 
आणि काही वेळेतच एका पुलापाशी येउन पोहचतो.  (येथेच थोड्या अंतरावर उजव्या हाताला अजून २ पूल आहेत . )  येथून असावा किल्याचे सुंदर दर्शन होते .
आपले मुख, दाट धुक्याच्या मखमली थराने झाकून घेत, तो जणू नवीन नवरी सारखा डोक्यावर पदर घेत लाजून बसलेला आहे , असे वाटू लागते .

असावा गड डावीकडे ठेवत, उजवीकडील मळलेल्या पायवाटेने एका डोंगराला वळसा घेत, धुक्याच्या पांढर्या दाट पट्ट्यातून, मोकळी वाट असलेल्या गर्द झाडीतून ,गारव्याच्या ओलसर सरी अंगावर घेत, एक दीड तासातच आपण गडाच्या माथ्यावर येउन पोहचतो. 
वर येतानाच तटबंदीची रूप रेखा आपल्यास नजरेस पडते. त्या तट बंदिवरूनच आपला गडावर प्रवेश होतो .

(गडाच्या माथ्यावर कातळात खोदलेली २ टाकी आहेत. किल्ल्याच्या दक्षिण टोकाला प्रचंड मोठे बांधीव टाकं आहे. 
या टाक्याची लांबी ५० फूट ,रूंदी २० फूट व खोली १५ फूट आहे. 
या टाक्याचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या एका बाजूला कातळ आहे व उरलेल्या तीन बाजू घडीव दगडांनी बांधून काढलेल्या आहेत. टाक्याच्या पश्चिमेकडील भिंतीत टाक्यात उतरण्यासाठी पायर्‍या बनवलेल्या आहेत. 

कातळ उतरावरून येणारे पाणी टाक्यात जमा होण्यापूर्वी त्यातील गाळ निघून जावा यासाठी कातळात १ फूट व्यास व 6 इंच खोली असलेले वर्तूळाकार खड्डे कोरलेले आहेत. या टाक्याची भिंत फूटल्याने यात आता पाणी साठत नाही.

हे टाकं पाहून उत्तरेकडे चालत जातांना डाव्या हाताला पश्चिमाभिमुख प्रवेशव्दाराची जागा दिसते. 
प्रवेशव्दार व त्यापुढील देवड्यांचे अवशेष पहायला मिळतात. प्रवेशव्दारातून खाली उतरून गेल्यावर डाव्या बाजूस भिंतीचे अवशेष दिसतात तसेच कातळात खोदलेल्या काही पायर्‍याही पहायला मिळतात.
- ट्रेकक्षितीज या वेबसाईट वरून घेतलेली माहिती )

किल्ल्याचा माथा फार छोटा असल्याने , थोडा वेळ तिथे काढून , थोडी पेटपूजा करून , आपला परतीचा प्रवास सुरु होतो. पण अजूनही आपली गड फेरी काही संपलेली नसते . 
किल्ल्याच्या खालच्या बाजूस कातळात खोदलेली एक-दोन गुहा व टाकं आहे. 
साधारण अर्धा तास चालून गेल्यावर त्या नजरेस पडतात .
त्यासाठी बांधीव टाक्याच्या बाजूने खाली उतरून बारी गावाच्या दिशेला चालावे लागते.

ती गुहा पाहून आपली गड फेरी संपते . पुढे त्या गुहे जवळूनच , गर्द झाडीतून ,झर्याचा खळखलाट ऐकत, पावसाच्या रिमझिम सरी अंगावर झेलत , दगड धोंड्यातून मार्ग काढत , आपल्याच मनाशीच गुणगुणत आपण कधी मामाच्या गावात येउन पोहचतो ते कळतच नाही .
पण मामाच्या गावात पोहोचताच ओठातून ते बालपणीच काव्य हळूच बाहेर पडत आणि त्यावर... 
आपलं ...तन मन सर्व त्या लयात नाचू लागतं.

झुक झुक झुक झुक,
आगीन गाडी,
धुरांच्या रेषा हवेत काढी
पळती झाडे पाहूया,
मामाच्या गावाला जाउया
जाउया मामाच्या गावाला जाउया ......!!
  
मामाच गाव म्हणजे एक RESORT आहे . येथे VALLEY Crossing हि करता येते , असा फलक जाता जाता दिसून येतो .
Picnic साठी म्हणून येथे लोकांच येणं जाणं सतत चालूच असत. पण येथे वरच किल्ला आहे , हे बर्याच लोकांना ठाऊक नसत . अन माहित असलं तरी किल्ले भेटीसाठी सहसा कुणी जात नाही . 

माझ्यासाठी हा खास ट्रेक होता, कारण ह्यापूर्वी कधी हि ट्रेकला न गेलेली , माझी खास गोड मैत्रीण स्नेहू , ह्या ट्रेकला आम्हां सोबत प्रथमच आली होती .ते ही मला न सांगता , न कळविता अचानक, surprise देऊन . त्यामुळे ट्रेकला खरी रंगत आली .
एकंदरीत ट्रेक खूपच मस्त झाला .

संकेत य पाटेकर
२४.०६.२०१३

प्रवास माहिती : आणि खर्च
पहाटे ५:३३ ची डोंबिवली - बोइसर ट्रेन :
तिकीट दर २५ रुपये प्रत्येकी .

ठीक ८:१० ला बोइसर रेल्वे स्थानक
(विरार ला हीच ट्रेन ७ ला पोहचते )

येथेच रेल्वे लगत एक restaurants आहे , तिथे पेट पूजा उरकून
पाच मिनटे रस्त्याने तसंच पुढे गेल्यास

नवापूर येथून वारंगडे साठी जीप मिळते .
प्रत्येकी १० रुपये सीट प्रमाणे .

१५-२० मिनिटा मध्ये मध्ये विराज FACATORY ,
तिथून पुढे चालत गडाचा माथा : १ ते दीड तास ,
गडाचा माथा फार मोठा नसल्याने , आणि इतक्या काही वास्तू नसल्याने गड पाहून लगेच होते .
१ ते दीड तास वर घालवल्यावर , परतीचा प्रवास
गडाच्या पोटात असलेल्या गुहा पाहत .दुसरया वाटेने, दीड -दोन तासात मामाच्या गावात उतरून .
तिथून मग पुढे एखादी जीप पडकून बोइसर ...


काही क्षणचित्रे :-

विराज FACTORY कडून जाणरी वाट...



सुशांत नि स्नेहू ...........

वळणा वरचे दुकान ...

छोटास ओहळ ..पार करत पुढे जाताना

चिखलात माखलेले माझे पाय...

एक सुंदर फोटो..

सुंदर मनमोहक दृश्य ..

विराज factory नि आसपासचा परिसर..

पाय वाटेची एक खून ...मोठा दगड

आम्ही साद सह्याद्री ट्रेकर्स ..

भारं वाहताना , गावातले एक काका