सिद्धगड भीमाशंकर.. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सिद्धगड भीमाशंकर.. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २० ऑक्टोबर, २०१२

सिद्धगड भीमाशंकर - एक विलक्षण ट्रेक अनुभव


इंग्रजी नवीन वर्षाची सुरवात आमच्या ह्या ट्रेक नि झाली .
१-२ जानेवारी २०१२ . हे ते दोन दिवस ...कधीही न विसरू शकणार असे.
ट्रेक ला आम्ही फक्त ४ जण.. यतीन , रश्मी , संपदा आणि मी ..म्हणजे दोन मुले आणि दोन मुली.
२ दिवसाचा अन एका रात्रीचा हा ट्रेक .
फक्त चौघे जण पण तरी हि हा ट्रेक खूप विलक्षण ठरला.
अनेक आठवणी दडल्यात ह्या ट्रेक मध्ये . खूप काही अनोख घडल खूप काही अनोख पाहिलं , खूप काही अनोख न रंजक अस ऐकल , प्रत्यक्ष अनुभवलं.
त्यातील काही आठवणी तुमच्या समोर पेश करत आहे .

१) हरवलेली ती वाट ............
सिद्धगड ...पुस्तकात वाचलं होत . घनदाट झाडी मुले इथे वाट चुकण्याची शक्यता अधिक असते , त्यामुळे कुणी तरी वाटाड्या सोबत असण चांगलच.
आमच्या पैकी यतीन ...३ वर्षा पूर्वी सिद्धगडला येऊन गेला होता . त्यामुळे त्याला वाट साधारण माहित होती.
सकाळच्या पारी एसटी ने आम्ही नारिवली गावात उतरलो नि एका माउशीकडे गडाकडे जाणारी वाट विचारून त्या दिशेने त्या मार्गी पुढे सरू लागलो,
वळणदार वाटेने लाल मातीत पाउलान्चा ठसा उमटवत . कोवळी सूर्य किरणे अंगावर घेत आम्ही निघालो. असा बराच वेळ निघून गेला ...आम्ही चालत राहिलो ..चालत राहिलो ..अन एकाकी पुढे वाट गडप .

एकाच फांदीला जसे अनेक छोट्या छोट्या फांद्या फुटाव्यात तसेच एका वाटेला १-२ वाटा दिसू लागल्या . मागे पुढे मागे पुढे करत आम्ही पुन्हा त्याच वाटेवर येऊ लागलो ...बराच वेळ गेला वाट सापडेना.

वेळेला खूप महत्व होतं....दुपार पर्यंत काहीही करून आम्हाला सिद्धगड करून ..
३ ते ४ तासाच्या ..सुमसाम आसपास कुठेही वस्ती नसलेल्या, निर्जन अन घनदाट जंगलातून पुढे पायपीट करायची होती.
त्यामुळे सिद्धगडावर वेळेत पोहोचण आम्हास काहीही करून बंधन कारक होत .
त्यामुळे पुढचा वेळ न दवडता आम्ही 'एक वाट' पडकून त्या दिशेने जावू लागलो.

उंचच उंच झाडी झुडपातून मार्ग काढत बराच पुढे आल्यानंतर एका धब धब्याच्या दगड धोंडांच्या दिशेने पुढे एका विस्तीर्ण कातळापाशी येऊन पोहोचलो

थोडा विसावलो नि आजूबाजूचा परिसर न्ह्याहाळू लागलो .आता वाटेने पुन्हा लपा छुपिचा डाव सुरु केला होता . वाट पुढे न्हवतीच..............तिन्ही दिशेला वाट बंद .
उजव्या हाताला मात्र ..भुसभुशीत माती ..आणि काटेरी झुडप असलेला एक उभा डोंगर आम्हाला challenge करू पाहत होता .
दुसरा पर्याय हि न्हवता . मागे फिरणे हि शक्य न्हवत .

तेंव्हा त्याचा तो challenge स्वीकारून आम्ही त्या भुसभुशीत मातीतून ....
एक एक पाउल सावधानतेने टाकत त्या काटेरी झुडपातून... अंगाला खरचटले असता ...मार्ग काढू लागलो नि अर्ध्या पाऊन तासाच्या उभ्या चढी नंतर कसे बसे विस्तीर्ण पठारावर येऊन पोहोचलो . नि श्वास मोकळा केला खरा ..........
पण इथेही पुन्हा ...उंचच उंच घनदाट झाडी, त्यामुळे समोरचा परिसरच दिसेनासा झाला होता .त्यात गवतांच्या पात्यानीही डोक वर काढल्यामुळे वाट नाहीसी झाली होती .

त्या सुमसाम निर्जन अन घनदाट झाडीत आम्ही फक्त चौघेच होतो .अन सोबत म्हणून रातकिड्यांची किर्र किर्र ....अन झाडाची काळी कुट्ट सावली
मागे वळता हि येत न्हवत . पुढे जाता हि येत न्हवत .

तशा त्या परिस्थितीत .......पुन्हा मनाचा निश्चय करून ....स्वताहाच्या संवरक्षणासाठी आणलेली छोटी हत्यार काढून आम्ही वाट शोधत शोधत एकदाचा पुढे निघालो ..... 





आणि थोडा अंतर कापताच सिद्धगडाच्या त्या दर्शनाने पुन्हा आनंदून गेलो ......
तो आनंद ओसंडून वाहत असतानाच पुन्हा एका आनंदाची त्यात भर पडली ती तिथे त्या निर्जन स्थळी भेटलेल्या त्या काकांची..............
तिथून मग खरा प्रवास सुरु झाला आमचा सिद्धगडाच्या दिशेने ......नेहमीच्या वाटेने

दुसरी आठवण
२)मनाला भेदरून सोडणाऱ्या त्या किकांळ्या आणि ती घबराट :
सिद्धगडहून भिमाशंकरला जाणारी ती जंगलातली पायवाट आणि त्या मार्गी जात असता घडलेला तो प्रसंग अजून लक्षात आहे....ताजा आहे .
आणि तेच आज मी तुम्हाला इथे कथन करणार आहे . ..सांगणार आहे .
तर मागील भागत आपण पाहिले ...कि कसे आम्ही वाट काढत काढत ...सिद्धगड च्या नेहमीच्या वाटेलां येऊन मिळालो.
तिथे ज्या निर्जन स्थळी जे काका भेटले त्यांनी आम्हाला गडावर जाणारी वाट दाखविली ...आणि ते स्वताहा काही अंतरा पर्यंत आमच्या सोबत आले .

तिथून पुढे काही वेळेतच दगडांच्या त्या राशी पार करत करत ..घाम गाळत गाळत आम्ही सिद्धगड च्या त्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो , अन थोडीशी विश्रांती घेऊन ,माझ्या डिजिटल कॅमेरातून आमच्या चौघांची एक आठवण म्हणून त्या दरवाजापाशी एक छानशी छबी घेतली .

अन पुढे सरसावलो .
दरवाज्यातून प्रवेश करत आम्ही मळलेल्या वाटेने वेडे वाकडे होत होत. मंदिरा जवळून सिद्धगड वाडीत पोहोचलो . (सिद्धगडा वरच वसली आहे ती सिद्धगडवाडी )


वाटेत आम्हास ''शर्मा नावाचा एक गृहस्थ '' दिसला 'तरुणच होता .
नुकताच तो भीमाशंकर करून कोंढवळ गावा मार्गी सिद्धगड ला आला होता आणि इथून मग गोरखगडाच्या दिशेने तो वाटचाल करणार होता.
 



एकटाच तो ....सोबत कुणी नाही . ..तरीही ३-४ दिवसाचे ट्रेक करायचा ..जंगलात रात्र काढायचा .मैलो नि मैल चालायचा ...त्याच ते धाडस खरच कौतुकास्पद होत.
घनदाट जंगलात..त्या किर्र किर्र आवजात ...निर्जन वस्तीत ...एकट्याने रात्र काढण ....म्हणजे खूपच मोठ धाडस आहे....ते चित्र डोळ्यासमोर आणताच अंगावर हि माझ्या काटा येतो .


नर्मदा परिक्रमा हि त्याने पूर्ण केली होती. त्याने मी तर भारावून गेलो होतो.
मागे मी मलंगगड ट्रेक केला होता ..''एकट्याने'' तो त्याच्याकडून मिळालेल्या त्या प्रेरणेनेच.
आमचा त्याच्याशी परिचय झाल्यानंतर तो ...त्याच्या मार्गी ..गोरख गडाच्या दिशेने निघाला.
नि आम्ही सिद्धगडवाडीत एका घराच्या मोकळ्या अंगणात ..त्या घरातील आजीला विचारून पाय मोकळे केले . नि लगेचच पाठपिशवीतील आमचे जेवणाचे डबे काढून जेवणावर ताव मारण्यास सुरवात केली.
माझ्या बहिणी बाईनी म्हणजेच संपदा ने मस्तपैकी इडली अन सोबत चटकदार चटणी आणली होती.




यतीन महराज ने घावन्या सारख काहीतरी पदार्थ आणले होत. (नाव आठवत नाही आता, पण खूपच चवीस्ट होत .). आणि रश्मी ने मस्तपैकी खिचडी भात . आणि अजून काहीतरी होत (ते हि आता आठवत नाही ) पण ...
सगळे कसे पोटभर जेवले . संपदाने आणलेल्या बर्यासच्या इडल्या मी एकट्यानेच फस्त केल्या. नि त्याचबरोबर इतरही पदार्थ संपवले . ....इतकी भूख लागली होती मला.. . (ह्यावरून पुढे बरेच असे गमतीचे क्षण घडले, 'जे मी तुम्हाला सांगणार नाही. 'नाहीतर बरसच माझ्या बद्दलच गुपित बाहेर पडायचं)
तर जेवण उरकल्यानन्तर काही वेळ विश्रांती करून आम्ही सिद्धगड वाडीतून बाहेर पडू लागलो.
खर तर आम्हाला सिद्धगडचा बालेकिल्ला हि सर करायचा होता ...पण वेळेच्या कमी मुळे आणि पुढे ३ ते ४ तासाची निर्जन वस्तीची जंगलातून पायपीट करायची असल्यामुळे . आणि काळोख्याच साम्राज्याचा विस्तार होण्याआधी वेळेत आमच्या स्थळी , आमच्या मुक्कामी पोहोचाण्य्साठी , वेळ न दवडता आम्ही निघू लागलो .
सिद्धगड वाडीत आम्ही पोहोचलो त्यावेळेस गावातला एकही कर्ता पुरुष गावात न्हवता. (आम्ही दोघे सोडून तसे आम्ही गावातले न्ह्वातोच म्हणा ). तर गावात शांतता होती. सुन्न करणारी ...
आमचे पाय गावातून सर सर करत बाहेर पडू लागले .....थोड्या वेळेतच आम्ही मंदिरापाशी पोहोचलो .तिथे एक दोन जण पुरुष मंडळी काम करत असताना दिसली . ...पुढे जात असता त्यांची नजर आम्हावर खिळली . आम्ही तसेच पुढे जावू लागलो आणि सिद्धगडाच्या त्या मुख्य दरवाजापाशी येऊन पोहोचलो.
इथून पुढे एक वाट जाते ती भीमाशंकर ला घनदाट अन निर्जन जंगलातून आणि एक वाट आलो त्या मार्गी म्हणजेच नारिवली गावात .
आम्ही भीमशंकर मार्गी निघू लागलो . आणि काही वेळेतच एका पठारापाशी येऊन पोहोचलो , तिथे काही शिल्पे आणि एक छोटास मंदिर होत . त्याच छायाचित्रण करून आणि दूरवरच ते सिद्धगडाच विलोभनीय दृश्य मनात साठवून आम्ही पावलो पाउली निघू लागलो.




वाटेतून जात असता आपला प्रवास सुखकर व्हावा यासाठी बरेच असे बाण कातळावर अथवा झाडीवर ओढीले आहेत. त्या बाणाच्या दिशेने आम्ही निघू लागलो.


आमच्या सगळ्यात पुढे यतीन साहेब होते त्यांनतर रश्मी आणि संपदा आणि सगळ्यात शेवटी मी .
असा आमचा क्रम ट्रेकच्या शेवट पर्यंत तसाच होता.
 
बराच वेळ निघून गेला .....आता घनदाट झाडीस सुरवात झाली होती ...सिद्धगड अजूनही डोक वर काढत जणू आम्हावर पहारा ठेवत होता. त्या निरव शांततेत .. रात किड्यांच्या किर्र किर्र ...अन पावलांचा चालण्याचा आवाज .आणि आम्ही चौघे मनुष्य प्राणी .....
हळू हळू पुढे कुणास ठाऊक ...मला भास होऊ लागला ..कि माझ्या मागून कुणीतरी येत आहे .
चर्र चर्र असा आवाज येऊ लागला . मागे वळून पाहिल्यास कुणी दिसत न्हवत . कुणीतरी आपला मागे लक्ष ठेवून आहे, अस सतत भासत होत,
मनात एक प्रकारे घबराटीचे सावट पसरू लागल होत. मला भास होत होता कि ...कुणी होत तिथे .....माहित नाही
संरक्षणासाठी तसं प्रत्येका कडे हत्यार होतच . ते बाहेरच काढूनच ठेवलं होत.
कुणास ठाऊक ह्या घनदाट निर्जन जंगलात काय कधी घडेल . ......आम्ही होतो तेही चौघेच . दोन मुल अन दोन मुली.
थोड्या वेळाने एक खोल दरीला वळसा घेत आम्ही थोड्या पुढे आलो नि ....त्या एका क्षणाने स्तंभित झालो.






आनंदाला उधाण आला ..............जे मी पुस्तकात वाचलं होत.(शेकरू - रणजीत देसाई ) ते प्रत्यक्षात अनुभवत होतो.
शेकरू ...खारी सारखा पण खारी पेक्षा हि मोठा असा हा प्राणी टूणटूण फांद्या फांद्यावर उड्या घेत , एका मागो माग एक असे ते दोन शेकरू आमच्या समोर झाडीच्या त्या उंच शेंडीवर बागडत मस्ती करत जात होते . त्यांच्या त्या यथार्थ दर्शनाने आम्ही सुखावलो.
आणि त्याच आनंदात पुढे जात असता ................ते क्षण डोळ्यात तरळत असता.
एका विचित्र आवाजाने, त्या किंकाळीने मन सैरा वैरा झाले . काहीच कळेनास झाल . पाउल तिथेच जागीच थबकली . श्रवण ग्रंथी अन नजरां चुहीकडे त्या आवाजाच्या दिशेने घुमू लागल्या ,
त्या कुणा मनुष्य व्यक्तीच्या किंकाळ्या होत्या , त्या किंकाळ्या त्या निरव शांततेत अजून भयग्रस्त वाटत होत्या . तो भयानक आवाज चारी दिशांना घुंगावत होता . मनाचा थरकाप उडवत होता .
दूर वर दिसणाऱ्या त्या मंदिरा जवळून तो आवाज येत होता. अस आम्ही गृहीत धरल . अन इथून त्वरित निघायला हव म्हणून ...पटा पटा पाऊल उचलू लागलो अन कोंढवळ गावाच्या दिशेने भीमशंकर च्या वाटेने त्या घनदाट निर्जन जंगलातून पुढे पुढे चालू लागलो.





काही तासानंतर आम्ही पठारावर सुखरूप पोहोचलो, इथून पुढे कोंढवळ गाव काहीच अंतरावर होत. आम्ही जात असता एक ५-६ जणांचा पुण्याचा ग्रुप आम्हाला दिसला .

सगळी वयस्कर मंडळी होती . रात्री मुक्कामी होती सिद्धगड ला आता कोंढवळ गावात मुक्कामी जाणार होती.
आम्ही हि त्याच मार्गी असल्यामुळे आम्ही त्यांच्यात मिसळून गेलो . एकमेकांची ओळख झाली अन बोलत बोलत चालत चालत आम्ही कोंढवळ गावात पोहोचलो ते साधारण सायंकाळी ६:३० वाजता .
रस्त्याततून बोलत बोलत त्या ग्रुप मधील काकांनी (पाउने तीनशे किल्ले सर केलेलं काका ) नाव आठवत नाही आता , पण त्याच्याकडून आम्हाला सर्व हकीकत कळली . जी त्या भयग्रस्त आवाजाशी निगडीत होती.
घडल होत काय ...तर गावातील सारी पुरुष मंडळी त्या मंदिरा जवळ (गावापासून जरा दूर असलेल्या मंदिरापाशी )एकत्र जमली होती ...ती शिकारी साठी ...शिकार जाळ्यात फासण्यासाठी , आणि त्यासाठी ते असे चित्र विचित्र आवाज काढत अन किंकाळत होते.
पण ते माहित नसल्यामुळे आमचा मात्र त्या निर्जन स्थळी भर जंगलात मनाचा थरकाप उडाला होता.
तर अशी हि गोष्ट ...खरी खुरी जी आमच्या ट्रेक दरम्यान घडली होती.
आणि अशा त्या क्षणांन मुळे आमचा हा ट्रेक यादगार ठरला होता. ..नि आहे .
तसं अजून बऱ्याच आठवणी बाकी आहेत . ते तुम्हाला मी नन्तर सांगेन .
धन्यवाद ...!!!!!

संकेत य पाटेकर