माझा सह्याद्री लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
माझा सह्याद्री लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १६ जून, २०१५

माझा सह्याद्री ..आपला सह्याद्री ..

ह्या सह्याद्रीने खूप काही दिलंय ...

त्यात सगळ्यात अनमोल अस काही म्हणायचं असेल तर मी म्हणेन  ..
कि हि जोडली गेलेली रत्नमाणिकांसारखे .....एक एक  माणसं.  
मग ती सह्याद्रीतल्या  नंद्वनात म्हणजेच ,  खेड्या पाड्यातून  ...साधसं  जीवन  जगणारी ,
साधीशीच पण मनाचं  मोठेपण जपणारी  प्रेमळ माणसं  असतील किंव्हा
शहराकडून खऱ्या अर्थाने आपल्या  ह्या सह्याद्रीत मनसोक्त भटकणारी वा सह्याद्रीवर नितांत प्रेम करणारी ,
इथल्या जना मनांसाठी झटणारी , दुर्ग संवर्धनासाठी सतत कार्य करणारी ..हि  शहरी माणसं असतील.
दोन्ही हि तितकीच अनमोल प्रिय अन  जिव्हाळ्याची ..रत्नमाणिकं....
जी जोडली जातात. सह्याद्रीच्या प्रत्येक पाऊल वाटेवर ....

- संकेत पाटेकर 

१४..०६.२०१५ 


शनिवार, १० जानेवारी, २०१५

सह्याद्रीतला सोबती ...

आपल्या ह्या धगधगत्या , राकट, कणखर सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यातून, कसलेल्या पायमोडी वाटेतून निवांत मुशाफिरी करताना , चढ उतार करताना , एक सोबत नक्कीच आपल्याला लाभते , लाभलीच असेलच तुम्हाला ?
ह्या सह्याद्रीत कुठे ना कुठे , कधी ना कधी , केंव्हा ना केंव्हा , किंव्हा प्रत्येक क्षणी हि म्हणा ट्रेक दरम्यान ...बिना कूच बोले ... कहे ...पीछे पीछे ..पीछे -पीछे ..मुकाट्याने ...

ओळखतं का ? कोण ते ?
शेपूट झुलवीत , जिभली बाहेर काढत पाठीमागून माग काढणारा ..

अहो..ओळखलंच असेलच एव्हाना... होय ना ?

अहो...माणसांची, आपल्या धन्याशी निष्ठेने वागणारा....असं आपण म्हणतोच कि ..

ओळखलंत ना 'पाळीव कुत्रा 'हो ( कुत्रा , ह्याला पर्यायी नाव सुचवा , एखाद, श्वान वगैरे अजून काही... )

ट्रेक दरम्यान ह्यांची भेट होतेच होते . नुसती भेट नाही, तर ते आपल्यासंगे डोंगर दरयांची चढ उतार हि अगदी उत्साहपूर्ण करतात. ओळख पालख नसूनही ..बिनधास्त अगदी ..

सिद्धगड- भीमा शंकर करतेवेळी असंच, गणेश घाटाने आम्हाला उतरायचं होत . त्यावेळेस मंदिराच्या येथूनच आम्हाला रामू भेटला (असं कुणी एखादं भेटला तर नामकरण तर होतंच होत. आम्ही त्यास रामू अस नामकरण करून मोकळे झालो. ) अन तो चक्क 'खांडस' गावा पर्यंत आम्हाला सोबत करत आला.

पुढचा प्रवास चारचाकी ने असल्याने तिथेच त्याला बाय बाय कराव लागलं. . पण त्या तेवढ्या वेळेत त्याने आमच्या हृदयी कप्यात जागा मिळवली होती. अन ती विरह संवेदना (प्राणी असला म्हणून काय झालं ) त्या वेळेस मनास नक्कीच छळत होती.

असंच कळसुबाई ह्या महाराष्ट्रातल्या सर्वोच्च शिखरावर चढ - उतार करतेवली तोच अनुभव आला. तिथे हि आम्हाला रामू भेटला (सिद्धगड -भीमाशंकर ट्रेकची , त्या रामूची आठवण म्हणून ह्याच हि नाव आम्ही रामू ठेवलं ) तो हि आम्हाला सोबत करत आला .

धोडप च्या किल्ल्यावर तर नुकताच जाउन आलो. तिथे हि तसाच प्रकार .
तिथे तर गोंडस लहानगं पिल्लूच होत ते , भुकेने व्याकूळ झालेलं. झाडीत बसून राहिलेलं .
त्याला पाठीवरल्या पाठ पिशवीतून काही बिस्कुट खाऊ घातली तर तो चक्क पाठी पाठीच येऊ लागला. धोडप माची पासून ते थेट हट्टी गावा पर्यंत. त्याने साथ दिली . त्याच नाव मी प्रेमाने सोनू ठेवलं .
वाटलं त्याला हि सोबत करून घरी आणावं. ..पण कसल..काय .. हो ..असो.

ट्रेक दरम्यान खेड्या पाड्यात , प्रेमाने ओतपोत जशी माणसं भेटतात तशी लळा लावणारी हि अशी मुकी प्राणी हि भेटतात.
त्यांना कधी सोबत हवी असते. इकडून तिंकडे जाण्यासाठी तर कधी आपल्या प्रेमापोटी हि ते आपल्या सोबत ,मागे येऊ लागतात.

सह्याद्रीत अश्या बरयाच गोष्टी आहेत. ज्याचा लळा अन गोडी न लागो तर नवलच ...

तुम्हाला हि आलाच असेल असा अनुभव, असेल तर शेअर करा.

आपलाच ,
संकेत उर्फ संकु
१०.०१.२०१५



मंगळवार, १७ जून, २०१४

! सह्याद्री !

! सह्याद्री !

नभा नभातुनी ,
दऱ्या खोऱ्यांतुनी
गर्जितो माझा सह्याद्री !

दिशा दिशांना
साद घालूनी
पुलकित होतो सह्याद्री !

गड किल्ल्यांच्या
रत्नमनी शोभितो
शान आपुला सह्याद्री !

शिवरायांचे , पराक्रमांचे
गुणगान गातो हा
सह्याद्री !

मनी उभरतो,
उरी फडकतो ,
शक्तिस्थळ अपुला
सह्याद्री !

मना मनातुनी
नाद घुमते
शान आपुला सह्याद्री !

कणखर ,रौद्र
भीषण रुप त्याचे
गौरवशाली सह्याद्री !

महाराष्ट्राचा मुकुट
मनी तो ,
वेड आपुले सह्याद्री !


©संकेत य पाटेकर
१८.१२.१२
मंगळवार
वेळ दुपार : २:१५

सोमवार, १६ जून, २०१४

पाऊस - सह्याद्रीतल्या कडे-कपारीतला

पाऊस - सह्याद्रीतल्या कडे-कपारीतला.. 
जर तुम्ही सह्याद्री वेडे आहात . तर पाउस म्हणजे काय हे वेगळ्या शब्दात काही सांगायला नको .
कारण पाऊस म्हटला कि लगेचच डोळ्यासमोर उभ राहतं ते सह्याद्रीचं विहिंगमय मनवेडं रूप.
स्वतःच अस्तित्व हि भुलवनारं. तना - मनात चैतन्याचं नवं सार पसरवणारं
स्वर्ग म्हणजे काय ? ह्याचं साक्षात अनुभूती देणारं.
जर तुम्हाला खऱ्या अर्थानं पाउस अनुभवायचा असेल तर सह्याद्रीतल्या ह्या दऱ्या खोऱ्यातून मुक्तपणे भटकावं . 
अगदी एखाद्या उनाड मुलासारखं स्वच्छंदी मनानं. तो एक वेगळा अनुभव ठरतो. 
तो वारेमाप उधळणारा अंगअंग झोंबणारा बेभान वारा . त्यात भर म्हणून काय तर टपोरया सरींचा मारा .उंचच उंच कडे कपाऱ्यातुनी धोधो बरसणारे शुभ्र धवल धबधबे .
सह्याद्री माथ्यावरून दिसणाऱ्या वेड्या वाकड्या वळणदार नद्यांचा पाट - ओढे.
तो उन- पावसाचा लपाछुपीचा खेळ अन अशातच आकाशी अवतरलेला सप्तरंगाचा फुलोरा ,
अन हिरवाईने सर्वत्र नव्याने फुललेला साज. सगळं कस डोळ्याचं पारणं फेडणारं.

हिरवा शालू परिधान केलेली हि आपली लाडकी धरित्री . आपल्याला अमाप सुख देऊन जाते .
लेकरांच्या मनाची घालमेल बहुदा तिला समजत असावी . मायेच पांघरून सदैव आपल्या भोवती गुरफटत ती आपल्या आनंदासाठी सदैव टवटवीत - प्रसन्न अन तयारीतच असते.

पावसाळचं हे सह्याद्रीचं रूप खरंच वेड लावतं .
ट्रेक ला निघताना एसटी महामंडळाच्या लाल डब्याच्या प्रवास आठवणीत राहतो .
घाट माथ्यावरचा वळणा वळणाचा काळाभोर डांबरी नागमोडी रस्ता , पावसाच्या सरींनी नुकताच स्वछ न्हावून निघालेला अन त्यावर असलेली पांढरी रेघ आपल्या मनात आनंदाची वलयांकित छाप उमटवून जाते. डोंगर दरयामध्ये फुललेली सोनकीची पिवळसर फुले मनावर प्रसन्न्तेचा साज चढवत राहतात .
खेड्या पाड्यातील चिखलमय रस्ते. कुठेशी साचलेलं डवलभर पाणी अन त्यात मुद्दाम उडी घेण्याचा मोह कधी कधी आवरता हि येत नाही. मन अगदी लहान होवून जातं अशावेळी .
हरिश्चंद्र गड चा माझा अनुभव इथे द्यावासा वाटतो .
खिरेश्वर गावातून आम्ही वाट काढत खिंडीतून आम्ही माथ्यावर पोहोचलो.
माझ्या सोबत माझा मित्र होता . पाउस अन वारा इतका बेभान झालेला त्यावेळेस कि समोरच काहीच दिसत न्हवतं . आपण नक्की कुठवर आलो आहोत हे हि कळत न्हवतं .
उलट वारा वेगाने आम्हाला मागे सरत होता . पाउस अन वारा ह्याचाच काय तो अमंल सुरु होता .
बाकी चिडीचूप शांतात . आम्ही काही वेळ त्याच ठिकाणी स्थिर राहिलो .
तेवढ्यात पांढरया धुक्याची दाट चादर डोळ्यासमोर चटकन बाजूला सरली . अन साक्षात हरिश्चंद्रेश्वराचं ते पवित्र मंदिर डोळ्यासमोर उभ ठाकलं . त्याने तन- मन अगदी भक्तिमय झालं.
देवाने जणू आमचा पुढचा मार्ग खुला केला .
अन आशीर्वाद देऊन पुन्हा क्षणात तो अदृश्य झाला . धुक्याची दाट चादर आपल्यावर ओढवून .
क्षणाचा तो खेळ खरा मात्र मनाला एक वेगळा अनुभव देऊन गेला .

पावसाळी प्रबळगड हि असाच काहीसा वेडा पिसा .
घनदाट झाडींनी वेढलेल्या प्रबळगडावर एकदा तरी पावसात भेट जरूर द्यावी.
धो धो बरसणारा पाउस , वेडा बेभान वारा आपल्याला रोखून ठेवतो .
घनदाट अन शुकशुकाट असणाऱ्या त्या झाडी झुडपातून पावसांच्या सरींचा मारा अंगावर घेत मार्ग काढताना एक वेगळाच अनुभव येतो.
तिथेले कोसळणारे शुभ्र धवल धबधबे तर मनाला भुरळ घालतात.
अन भिजण्याचा मोह आवरता येत. नाही .
पावसाळी सह्याद्रीचं हे रूप नेहमीचं मनाला वेड लावतं.
अन म्हणूनच एकदा का पाऊस सुरु झाला . कि ट्रेकर्स मंडळींना वेध लागतात ते आपल्या लाडक्या सह्याद्रीचे .
तसा सह्याद्री प्रत्येक ऋतुत आपल्याला खुणावत असतो.
त्याच वेगळेपण प्रत्येक ऋतुत वेगळ असतं .
पण तरीही पावसाळचं त्याच रूप काही औरच . मनाला भुरळं घालणारं .
©संकेत य पाटेकर

१६.०६.२०१४

पाणिनी मासिकात प्रसिद्ध झालेला हा लेख...




प्रचि. १
प्रचि. २

प्रचि. ३

प्रचि. ४

प्रचि. ५
प्रचि. ६
प्रचि. ७
प्रचि. ८
प्रचि. ९
प्रचि. १०
प्रचि. ११
प्रचि. १२

शनिवार, ३० जून, २०१२

सह्याद्री ...सह्याद्री ..सह्याद्री !!!


सह्याद्री ..सह्याद्री ..सह्याद्री !!!

सह्याद्री म्हटले कि आले त्याचे रौद्र तितकेच मनाला भुलवून टाकणारे मनमोहक रूप ,
उंचच उंच आभाळाला भिडणारे त्याचे काळेकभिन्न कातळकडे .....तिथला सतत घुंगवत राहणारा...आपल्यासोबत वृक्ष वेलींनाहि , पक्षी पाखरांना डोलवनारा मनमुराद वारा , ते धुक्याचे दाट पांढरे ढग त्याची विस्तीर्ण पसरलेली ती रूपरेषा ...तो तिथला अलंकारित निसर्ग ....

सह्याद्री म्हटले कि आले गड -कोट किल्ले , आपले आदर्श छत्रपती शिवाजी महाराज...
स्वराज्य व स्वराज्याची राजधानी राजगड, रायगड , राजगडावरून स्वराज्यासाठी आखलेल्या अनेकानेक मोहिमा ....
रायगडावरील तो सुवर्ण क्षण ..राज्यभिषेक सोहळा ती आठवण ....,
स्वराज्यातील बळकट, भक्कम, आणि अचंबित करणारे हे किल्ले तेथील वास्तू ...
त्यांचा तो रक्तरंजित इतिहास ...

सह्याद्री म्ह्टलं कि आला कोकणकडा ...ट्रेकर्स मंडळींना आपल्या अजस्त्र पण मनमोहक रूपाने नेहमीच आकर्षित करणारा कोकणकडा ....हरिश्चंद्र राजाची महती सांगणारा तो हरिश्चंद्र गड

सह्याद्रीत वसलेले हे गड-कोट किल्ले ...त्यांचा इतिहास ..तो निसर्ग ......डोंगर दऱ्या ...नदी ..ओढे , पक्षी पाखरे ..विविध रंगी .फुले ...झाडे वेली...ती माती ...तो तिथला दरवळीत सुगंध ..तो आनंद मनाला पार भुलवून टाकतो .

असा हा ''सह्याद्री'' आणि मनाला भुलवणारा ,अद्भुत हवा हवासा वाटणारा ''निसर्ग''
मला नेहमीच वेडं लावतं .

संकेत य पाटेकर

३० जून २०१२