शनिवार, २० ऑक्टोबर, २०१२

पदरगड ची ती रात्र .....

 पहाटे ४ वाजता मी ..सिद्धेश.. दीप्ती ..भूषण आणि उज्वला त्या जंगलातून गणेश मंदिरा त जाण्यासाठी निघालो. जंगलातले ते वातावरण सुन्न करणारे होते .....आजूबाजूला कुठेच वस्ती नाही ..
खांडस हे गाव ते हि पाऊन ते १ तासाच्या अंतरावर.. . ..
जंगलातून चालत असताना ..पाला पाचोळ्याचा कुर्र कुर्र आणि रात किड्यांचा किर्र किर्र आवाज घोंगावत होता. काही अंतर पार करतोच तेच वर थोड्या अंतरावर कुणीतरी असल्याची आम्हाला चाहूल लागली ती त्यांच्या Tourch च्या झोतांनी .

इतक्या रात्री ..त्या काळ्या कुट्ट अंधारातल्या जंगलात आम्ही फक्त ५ जन आम्ही तिघे मुले आणि त्या दोघी ......
मनात क्षणभर भीती पसरली . पुढे जावे कि नाही ...रात्रीच्या त्या काळ्या कुट्ट अंधारात काहीच दिसत न्हवत . आणि वर कोण आहे तेही काही कल्पना येत न्हवती ....
थोडा वेळ तिथेच थांबून आणि आम्ही पुन्हा मागे फिरण्याचा निर्णय घेतला ..आणि आलो त्याच मार्गी एका फार्म हाउस च्या गेट ठिकाणी निवांत भिंतीला टेकून बसलो . आणि मग भूता गोत्यांच्या गोष्टी नां चेव आला आणि त्या निरव आणि भयावह शांततेत ..भूषण .आणि .उज्वला .....एक एक गोष्टी रंगवू लागल्या .....
काही वेळ गेला आमच्या त्या गोष्टी चालूच होत्या ...आणि तेवढ्यात पुन्हा एका Tourch चा प्रकाशाचा झोत आमच्या दिशेने पडू लागला . आणि पुन्हा सगळे एकदम शांत ...चूपचाप ...

तो झोत हळू हळू अधिक अधिक जवळ जवळ येऊ लागला आणि मग एका एकी गुडूप ......
क्षणभर कळेनास झाल ...काय झाले ते ...नि एकाकी एक व्यक्ती गेट च्या आतून आम्हाला डोकावून पाहून लागली . ..................

मनात नां ना विचार येण्या आधीच त्यांनी कुठून आलात ..इथे का बसलात ...आत तरी यायचं ना ...मी जातना तुम्हाला पाहिले . वगैरे वैगरे बोलू लागले .
आणि सर्वांनी त्यांच्याशी मन मोकळे केले . ते काका तिथे च असतात ....त्या फार्म हाउसवर ...रखवाली करत .

त्यांच्या शी बोलून ....नन्तर मग थोडे उजेडल्यावर आम्ही पदरगड साठी पुढे मार्गीक्रमण केले.
ट्रेक ला येण्या आधी पुस्तकात वाचले होते ....त्या जंगलात अनेक ट्रेकर्सना लुटण्याचे प्रकार घडले आहेत .
पण त्या काकान कडून कळल कि ते १० वर्षा पूर्वी ......आता नाही .
असा हा अविस्मरणीय क्षण -पदरगड
- संकेत —


सिद्धगड भीमाशंकर - एक विलक्षण ट्रेक अनुभव


इंग्रजी नवीन वर्षाची सुरवात आमच्या ह्या ट्रेक नि झाली .
१-२ जानेवारी २०१२ . हे ते दोन दिवस ...कधीही न विसरू शकणार असे.
ट्रेक ला आम्ही फक्त ४ जण.. यतीन , रश्मी , संपदा आणि मी ..म्हणजे दोन मुले आणि दोन मुली.
२ दिवसाचा अन एका रात्रीचा हा ट्रेक .
फक्त चौघे जण पण तरी हि हा ट्रेक खूप विलक्षण ठरला.
अनेक आठवणी दडल्यात ह्या ट्रेक मध्ये . खूप काही अनोख घडल खूप काही अनोख पाहिलं , खूप काही अनोख न रंजक अस ऐकल , प्रत्यक्ष अनुभवलं.
त्यातील काही आठवणी तुमच्या समोर पेश करत आहे .

१) हरवलेली ती वाट ............
सिद्धगड ...पुस्तकात वाचलं होत . घनदाट झाडी मुले इथे वाट चुकण्याची शक्यता अधिक असते , त्यामुळे कुणी तरी वाटाड्या सोबत असण चांगलच.
आमच्या पैकी यतीन ...३ वर्षा पूर्वी सिद्धगडला येऊन गेला होता . त्यामुळे त्याला वाट साधारण माहित होती.
सकाळच्या पारी एसटी ने आम्ही नारिवली गावात उतरलो नि एका माउशीकडे गडाकडे जाणारी वाट विचारून त्या दिशेने त्या मार्गी पुढे सरू लागलो,
वळणदार वाटेने लाल मातीत पाउलान्चा ठसा उमटवत . कोवळी सूर्य किरणे अंगावर घेत आम्ही निघालो. असा बराच वेळ निघून गेला ...आम्ही चालत राहिलो ..चालत राहिलो ..अन एकाकी पुढे वाट गडप .

एकाच फांदीला जसे अनेक छोट्या छोट्या फांद्या फुटाव्यात तसेच एका वाटेला १-२ वाटा दिसू लागल्या . मागे पुढे मागे पुढे करत आम्ही पुन्हा त्याच वाटेवर येऊ लागलो ...बराच वेळ गेला वाट सापडेना.

वेळेला खूप महत्व होतं....दुपार पर्यंत काहीही करून आम्हाला सिद्धगड करून ..
३ ते ४ तासाच्या ..सुमसाम आसपास कुठेही वस्ती नसलेल्या, निर्जन अन घनदाट जंगलातून पुढे पायपीट करायची होती.
त्यामुळे सिद्धगडावर वेळेत पोहोचण आम्हास काहीही करून बंधन कारक होत .
त्यामुळे पुढचा वेळ न दवडता आम्ही 'एक वाट' पडकून त्या दिशेने जावू लागलो.

उंचच उंच झाडी झुडपातून मार्ग काढत बराच पुढे आल्यानंतर एका धब धब्याच्या दगड धोंडांच्या दिशेने पुढे एका विस्तीर्ण कातळापाशी येऊन पोहोचलो

थोडा विसावलो नि आजूबाजूचा परिसर न्ह्याहाळू लागलो .आता वाटेने पुन्हा लपा छुपिचा डाव सुरु केला होता . वाट पुढे न्हवतीच..............तिन्ही दिशेला वाट बंद .
उजव्या हाताला मात्र ..भुसभुशीत माती ..आणि काटेरी झुडप असलेला एक उभा डोंगर आम्हाला challenge करू पाहत होता .
दुसरा पर्याय हि न्हवता . मागे फिरणे हि शक्य न्हवत .

तेंव्हा त्याचा तो challenge स्वीकारून आम्ही त्या भुसभुशीत मातीतून ....
एक एक पाउल सावधानतेने टाकत त्या काटेरी झुडपातून... अंगाला खरचटले असता ...मार्ग काढू लागलो नि अर्ध्या पाऊन तासाच्या उभ्या चढी नंतर कसे बसे विस्तीर्ण पठारावर येऊन पोहोचलो . नि श्वास मोकळा केला खरा ..........
पण इथेही पुन्हा ...उंचच उंच घनदाट झाडी, त्यामुळे समोरचा परिसरच दिसेनासा झाला होता .त्यात गवतांच्या पात्यानीही डोक वर काढल्यामुळे वाट नाहीसी झाली होती .

त्या सुमसाम निर्जन अन घनदाट झाडीत आम्ही फक्त चौघेच होतो .अन सोबत म्हणून रातकिड्यांची किर्र किर्र ....अन झाडाची काळी कुट्ट सावली
मागे वळता हि येत न्हवत . पुढे जाता हि येत न्हवत .

तशा त्या परिस्थितीत .......पुन्हा मनाचा निश्चय करून ....स्वताहाच्या संवरक्षणासाठी आणलेली छोटी हत्यार काढून आम्ही वाट शोधत शोधत एकदाचा पुढे निघालो ..... 





आणि थोडा अंतर कापताच सिद्धगडाच्या त्या दर्शनाने पुन्हा आनंदून गेलो ......
तो आनंद ओसंडून वाहत असतानाच पुन्हा एका आनंदाची त्यात भर पडली ती तिथे त्या निर्जन स्थळी भेटलेल्या त्या काकांची..............
तिथून मग खरा प्रवास सुरु झाला आमचा सिद्धगडाच्या दिशेने ......नेहमीच्या वाटेने

दुसरी आठवण
२)मनाला भेदरून सोडणाऱ्या त्या किकांळ्या आणि ती घबराट :
सिद्धगडहून भिमाशंकरला जाणारी ती जंगलातली पायवाट आणि त्या मार्गी जात असता घडलेला तो प्रसंग अजून लक्षात आहे....ताजा आहे .
आणि तेच आज मी तुम्हाला इथे कथन करणार आहे . ..सांगणार आहे .
तर मागील भागत आपण पाहिले ...कि कसे आम्ही वाट काढत काढत ...सिद्धगड च्या नेहमीच्या वाटेलां येऊन मिळालो.
तिथे ज्या निर्जन स्थळी जे काका भेटले त्यांनी आम्हाला गडावर जाणारी वाट दाखविली ...आणि ते स्वताहा काही अंतरा पर्यंत आमच्या सोबत आले .

तिथून पुढे काही वेळेतच दगडांच्या त्या राशी पार करत करत ..घाम गाळत गाळत आम्ही सिद्धगड च्या त्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो , अन थोडीशी विश्रांती घेऊन ,माझ्या डिजिटल कॅमेरातून आमच्या चौघांची एक आठवण म्हणून त्या दरवाजापाशी एक छानशी छबी घेतली .

अन पुढे सरसावलो .
दरवाज्यातून प्रवेश करत आम्ही मळलेल्या वाटेने वेडे वाकडे होत होत. मंदिरा जवळून सिद्धगड वाडीत पोहोचलो . (सिद्धगडा वरच वसली आहे ती सिद्धगडवाडी )


वाटेत आम्हास ''शर्मा नावाचा एक गृहस्थ '' दिसला 'तरुणच होता .
नुकताच तो भीमाशंकर करून कोंढवळ गावा मार्गी सिद्धगड ला आला होता आणि इथून मग गोरखगडाच्या दिशेने तो वाटचाल करणार होता.
 



एकटाच तो ....सोबत कुणी नाही . ..तरीही ३-४ दिवसाचे ट्रेक करायचा ..जंगलात रात्र काढायचा .मैलो नि मैल चालायचा ...त्याच ते धाडस खरच कौतुकास्पद होत.
घनदाट जंगलात..त्या किर्र किर्र आवजात ...निर्जन वस्तीत ...एकट्याने रात्र काढण ....म्हणजे खूपच मोठ धाडस आहे....ते चित्र डोळ्यासमोर आणताच अंगावर हि माझ्या काटा येतो .


नर्मदा परिक्रमा हि त्याने पूर्ण केली होती. त्याने मी तर भारावून गेलो होतो.
मागे मी मलंगगड ट्रेक केला होता ..''एकट्याने'' तो त्याच्याकडून मिळालेल्या त्या प्रेरणेनेच.
आमचा त्याच्याशी परिचय झाल्यानंतर तो ...त्याच्या मार्गी ..गोरख गडाच्या दिशेने निघाला.
नि आम्ही सिद्धगडवाडीत एका घराच्या मोकळ्या अंगणात ..त्या घरातील आजीला विचारून पाय मोकळे केले . नि लगेचच पाठपिशवीतील आमचे जेवणाचे डबे काढून जेवणावर ताव मारण्यास सुरवात केली.
माझ्या बहिणी बाईनी म्हणजेच संपदा ने मस्तपैकी इडली अन सोबत चटकदार चटणी आणली होती.




यतीन महराज ने घावन्या सारख काहीतरी पदार्थ आणले होत. (नाव आठवत नाही आता, पण खूपच चवीस्ट होत .). आणि रश्मी ने मस्तपैकी खिचडी भात . आणि अजून काहीतरी होत (ते हि आता आठवत नाही ) पण ...
सगळे कसे पोटभर जेवले . संपदाने आणलेल्या बर्यासच्या इडल्या मी एकट्यानेच फस्त केल्या. नि त्याचबरोबर इतरही पदार्थ संपवले . ....इतकी भूख लागली होती मला.. . (ह्यावरून पुढे बरेच असे गमतीचे क्षण घडले, 'जे मी तुम्हाला सांगणार नाही. 'नाहीतर बरसच माझ्या बद्दलच गुपित बाहेर पडायचं)
तर जेवण उरकल्यानन्तर काही वेळ विश्रांती करून आम्ही सिद्धगड वाडीतून बाहेर पडू लागलो.
खर तर आम्हाला सिद्धगडचा बालेकिल्ला हि सर करायचा होता ...पण वेळेच्या कमी मुळे आणि पुढे ३ ते ४ तासाची निर्जन वस्तीची जंगलातून पायपीट करायची असल्यामुळे . आणि काळोख्याच साम्राज्याचा विस्तार होण्याआधी वेळेत आमच्या स्थळी , आमच्या मुक्कामी पोहोचाण्य्साठी , वेळ न दवडता आम्ही निघू लागलो .
सिद्धगड वाडीत आम्ही पोहोचलो त्यावेळेस गावातला एकही कर्ता पुरुष गावात न्हवता. (आम्ही दोघे सोडून तसे आम्ही गावातले न्ह्वातोच म्हणा ). तर गावात शांतता होती. सुन्न करणारी ...
आमचे पाय गावातून सर सर करत बाहेर पडू लागले .....थोड्या वेळेतच आम्ही मंदिरापाशी पोहोचलो .तिथे एक दोन जण पुरुष मंडळी काम करत असताना दिसली . ...पुढे जात असता त्यांची नजर आम्हावर खिळली . आम्ही तसेच पुढे जावू लागलो आणि सिद्धगडाच्या त्या मुख्य दरवाजापाशी येऊन पोहोचलो.
इथून पुढे एक वाट जाते ती भीमाशंकर ला घनदाट अन निर्जन जंगलातून आणि एक वाट आलो त्या मार्गी म्हणजेच नारिवली गावात .
आम्ही भीमशंकर मार्गी निघू लागलो . आणि काही वेळेतच एका पठारापाशी येऊन पोहोचलो , तिथे काही शिल्पे आणि एक छोटास मंदिर होत . त्याच छायाचित्रण करून आणि दूरवरच ते सिद्धगडाच विलोभनीय दृश्य मनात साठवून आम्ही पावलो पाउली निघू लागलो.




वाटेतून जात असता आपला प्रवास सुखकर व्हावा यासाठी बरेच असे बाण कातळावर अथवा झाडीवर ओढीले आहेत. त्या बाणाच्या दिशेने आम्ही निघू लागलो.


आमच्या सगळ्यात पुढे यतीन साहेब होते त्यांनतर रश्मी आणि संपदा आणि सगळ्यात शेवटी मी .
असा आमचा क्रम ट्रेकच्या शेवट पर्यंत तसाच होता.
 
बराच वेळ निघून गेला .....आता घनदाट झाडीस सुरवात झाली होती ...सिद्धगड अजूनही डोक वर काढत जणू आम्हावर पहारा ठेवत होता. त्या निरव शांततेत .. रात किड्यांच्या किर्र किर्र ...अन पावलांचा चालण्याचा आवाज .आणि आम्ही चौघे मनुष्य प्राणी .....
हळू हळू पुढे कुणास ठाऊक ...मला भास होऊ लागला ..कि माझ्या मागून कुणीतरी येत आहे .
चर्र चर्र असा आवाज येऊ लागला . मागे वळून पाहिल्यास कुणी दिसत न्हवत . कुणीतरी आपला मागे लक्ष ठेवून आहे, अस सतत भासत होत,
मनात एक प्रकारे घबराटीचे सावट पसरू लागल होत. मला भास होत होता कि ...कुणी होत तिथे .....माहित नाही
संरक्षणासाठी तसं प्रत्येका कडे हत्यार होतच . ते बाहेरच काढूनच ठेवलं होत.
कुणास ठाऊक ह्या घनदाट निर्जन जंगलात काय कधी घडेल . ......आम्ही होतो तेही चौघेच . दोन मुल अन दोन मुली.
थोड्या वेळाने एक खोल दरीला वळसा घेत आम्ही थोड्या पुढे आलो नि ....त्या एका क्षणाने स्तंभित झालो.






आनंदाला उधाण आला ..............जे मी पुस्तकात वाचलं होत.(शेकरू - रणजीत देसाई ) ते प्रत्यक्षात अनुभवत होतो.
शेकरू ...खारी सारखा पण खारी पेक्षा हि मोठा असा हा प्राणी टूणटूण फांद्या फांद्यावर उड्या घेत , एका मागो माग एक असे ते दोन शेकरू आमच्या समोर झाडीच्या त्या उंच शेंडीवर बागडत मस्ती करत जात होते . त्यांच्या त्या यथार्थ दर्शनाने आम्ही सुखावलो.
आणि त्याच आनंदात पुढे जात असता ................ते क्षण डोळ्यात तरळत असता.
एका विचित्र आवाजाने, त्या किंकाळीने मन सैरा वैरा झाले . काहीच कळेनास झाल . पाउल तिथेच जागीच थबकली . श्रवण ग्रंथी अन नजरां चुहीकडे त्या आवाजाच्या दिशेने घुमू लागल्या ,
त्या कुणा मनुष्य व्यक्तीच्या किंकाळ्या होत्या , त्या किंकाळ्या त्या निरव शांततेत अजून भयग्रस्त वाटत होत्या . तो भयानक आवाज चारी दिशांना घुंगावत होता . मनाचा थरकाप उडवत होता .
दूर वर दिसणाऱ्या त्या मंदिरा जवळून तो आवाज येत होता. अस आम्ही गृहीत धरल . अन इथून त्वरित निघायला हव म्हणून ...पटा पटा पाऊल उचलू लागलो अन कोंढवळ गावाच्या दिशेने भीमशंकर च्या वाटेने त्या घनदाट निर्जन जंगलातून पुढे पुढे चालू लागलो.





काही तासानंतर आम्ही पठारावर सुखरूप पोहोचलो, इथून पुढे कोंढवळ गाव काहीच अंतरावर होत. आम्ही जात असता एक ५-६ जणांचा पुण्याचा ग्रुप आम्हाला दिसला .

सगळी वयस्कर मंडळी होती . रात्री मुक्कामी होती सिद्धगड ला आता कोंढवळ गावात मुक्कामी जाणार होती.
आम्ही हि त्याच मार्गी असल्यामुळे आम्ही त्यांच्यात मिसळून गेलो . एकमेकांची ओळख झाली अन बोलत बोलत चालत चालत आम्ही कोंढवळ गावात पोहोचलो ते साधारण सायंकाळी ६:३० वाजता .
रस्त्याततून बोलत बोलत त्या ग्रुप मधील काकांनी (पाउने तीनशे किल्ले सर केलेलं काका ) नाव आठवत नाही आता , पण त्याच्याकडून आम्हाला सर्व हकीकत कळली . जी त्या भयग्रस्त आवाजाशी निगडीत होती.
घडल होत काय ...तर गावातील सारी पुरुष मंडळी त्या मंदिरा जवळ (गावापासून जरा दूर असलेल्या मंदिरापाशी )एकत्र जमली होती ...ती शिकारी साठी ...शिकार जाळ्यात फासण्यासाठी , आणि त्यासाठी ते असे चित्र विचित्र आवाज काढत अन किंकाळत होते.
पण ते माहित नसल्यामुळे आमचा मात्र त्या निर्जन स्थळी भर जंगलात मनाचा थरकाप उडाला होता.
तर अशी हि गोष्ट ...खरी खुरी जी आमच्या ट्रेक दरम्यान घडली होती.
आणि अशा त्या क्षणांन मुळे आमचा हा ट्रेक यादगार ठरला होता. ..नि आहे .
तसं अजून बऱ्याच आठवणी बाकी आहेत . ते तुम्हाला मी नन्तर सांगेन .
धन्यवाद ...!!!!!

संकेत य पाटेकर



बुधवार, १२ सप्टेंबर, २०१२

तांदुळवाडीचा किल्ला :अन निसर्गाची सुंदरता Tandulwadi trek



















सफाळे ( विरारच्या २ स्थानक पुढे ) ह्या पच्छिम रेल्वे स्थानका पासून ५ ते ६ किलोमीटर अंतरावर दाट जंगलाची हिरवी चादर आपल्याभोवती लपेटून आकाशला गवसणी घालत उभा आहे तो तांदूळवाडी गड , तांदूळगड.

एकीकडे डोंगर दरयानच विहिंगमय दृश्य अन एकीकडे वैतरणा नदीच नागमोडी वळनाच नयनरम्य दृश्य , मनाला सुखद अनुभव देतो. मन कस त्या निसर्गाशी एकरूप होवून जातं .

सफाळे स्थानका पासून एसटीने ..दुर्तफा दाट भरगच्च झाडीच्या हिरवळीतून , वळणदार नागमोडी डांबरी रस्त्याने ..   घाट माथा  चढत १५ मिनिटात आपण पोहोचतो ते तांदुळवाडी ह्या गावात.

गावातून एक वाट ..शाळेजवळून .... कॉनक्रिट च्या रस्त्याने ...आनंद दिघे साहेबांची प्रतिमा असलेल्या अन विविध पारितोषिकांनी सजलेल्या त्या कार्यालया जवळून पुढे होत जाते . तिथून  साधारण १ तासात गड माथा गाठता येतो.  

सुरवातीला दगडांच्या राशी पार करत  आपण पुढे पुढे चालू लागतो .  १५- २०मिनितात  आपण एका पठारावर  येऊन  पोहोचतो . येथून आपल्याला 'सुळक्याच अन त्यावरील मळलेल्या वाटेचं सुंदर दृश्य दिसत'. ते नजरेत   टिपत पुढे व्हायचं. . काही वेळेतच त्या सुळक्यावर जाणारी चढण सुरु होते.  
हळू हळू पाउल टाकत अन निसर्गाच विस्तीर्ण मनमोहक दृश्य पाहत , थंड  हवेचा जोरदार मारा खात पाऊलं पुढे सरत राहतात.   

पुढे अजून दोन - तीन चढणीचे टप्पे  पार करून .   ५ फुटापेक्षा उंचावलेल्या गवती पात्यांपासून , मळलेल्या पाय  वाटेने आपण गडावर पोहोचतो.



गडावर '' सप्त हंडी म्हणून ओळखल्या जाणर्या ...७ पाण्याच्या टाके आहेत.

तसेच काही ठिकाणी तटबंदीचे अवशेष आहेत. 
पावसाळ्यात गडावर आजुबाचुच दृश्य दिसन खर तर भाग्याच असत ...कारण पांढऱ्या शुभ्र धुक्यानी . गड नेहमीच काबीज केलेला असतो. पण ते भाग्य आम्हाला काही लाभल नाही.

काही वेळ गडावर फिरून  जेथून आम्ही आलो त्या वाटेने न जाता त्याच्या दुसर्या वाटेने त्या घनदाट जंगलातून मार्ग शोधत शोधत २ तासात गडाला एक वळसा घालत तांदुळवाडी - चावरेपाडा ह्या गावाच्या विहिरीजवळ पोहोचलो. 
अन तिथून मग गावातून ...रस्त्यामार्गे तांदुळवाडी गावात आलो . 
जेथून आम्ही चढण्यास सुरवात केली.

तिथून मग पुढे एसटी ची वाट पाहत ....उभे असता ....गावातल्याच एका चार चाकी गाडीतून त्याकडे लिफ्ट मागून '' राजेश नाव असलेल्या त्या प्रेमळ मुलाशी ( त्याने प्रवासाचे पैसे काही घेतले नाही आम्हाकडून ) बोलत बोलत सफाळे स्थानकात पोहोचलो.
मोठा ग्रुप वगैरे असेल तर दिवाळीत यायचं ... गावातले सगळे जण गडावर जातात दिवाळीत . अस त्याने आम्हास सांगितले.
सफाळे स्थानकातून मग ३:०५ ची शटल पकडून आम्ही विरार ला पोहोचलो नि तिथून दादर मार्गे थेट ठाणे गाठले आणि अशा तर्हेने आमचा तांदूळ वाडीचा प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण झाला.
  
संकेत य पाटेकर 
११.०९.२०१२

सफाळे रेल्वे स्थानक ...........



























             तांदूळ वाडी एसटी थांबा ....सफाळे स्थानका पासून अवघ्या १५ मिनिटात आपण एसटी ने येथे पोहोचतो. 




























                     तांदुळवाडी गावातली शाळा..




























                      डावीकडची वाट आपणास गडावर पोहोचवते ...येथून साधारण १ तासात आपण गडावर पोहोचतो. 




























आनंद दिघे साहेबांची प्रतिमेला वंदन करून पुढे वाटचाल करायची ....






























                            पंधरा वीस मिनिटात आपण एका पठारावर पोहोचतो ....येथून ह्या सुळक्याच सुंदर दृश्य दिसत.





























आमच्या चौघांची छबी...

हे लाल रंगाचे हे फुलझाड इथे बरयाच प्रमाणात आढळतात ...कुणी ह्याच नाव सांगू शकेल का ?



































स्वताहा :...

                                                        माथ्यावर वर नेणारी वाट..

                                                                मनमोहक दृश्य : माथ्यावर नेणारी वाट...

                                                                   दरी  न्याहाळताना... 

                                                                शेवटचा टप्पा ... 





































                                                              कुतूहल ..सृष्टीचे .. 

                                       वैतरणा नदी...

                                वैतरणा नदी...

                                     गवतातून मार्ग काढत जाताना...

                            धु कं...

                              दोन धड एक शिर ..



























               खादाडी  .. 




























पाणी हेची  जीवन ...



लक्ष्या अन किशोर ह्यांची जोडी...



































किशोर अन मी

 स्वताहा ....

धुक्यात हरवलेलं झाड...

झाडावरच भूत .....



































गडावरच्या ''सात'' पाण्याच्या टाक्या ...सप्त हंडी म्हणून ओळखल्या जातात. 

तांदूळ वाडी किल्ला .....
















सोमवार, २७ ऑगस्ट, २०१२

मृगगड - एक तुफानी ट्रेक (१५ ऑगस्ट २०१२ )




आजवर इतके ट्रेक केले .....पण हा त्यात फारच निराळा ठरला .....
तस पाहयला गेले तर ...प्रत्येक ट्रेक चा अनुभव हा वेग वेगळा आणि अविस्मरणीयच असतो .
पण आजचा आमचा हा ट्रेक हि तसाच पण जरा त्याहुनी वेगळा अन अविस्मरणीय असा ठरला. 

वाट चुकण्यात जो आनंद असतो ना ...तो नेहमीच्याच रुळलेल्या वाटेने जाताना नाही मिळत ,
एक वेगळी वाट अन ते धाडस ......नेहमीच अविस्मरणीय अन ...तुफानी ठरत.

पहिल्यांदा घोरपडी सारख ....हात अन पाय दोघांचा उपयोग करून ....निसरड्या गवतातून आणि माखलेल्या चिखलातून . भर पावसात ....सरींचा मारा खात ...अन एक एक पावूल हळूच सावकाश ...टाकत ....मनाचा तोल सांभाळत ...ती उभी निसरडी ...आणि एक बाजूला खोल दरी असलेली ती चढण चंदू लागलो.

काही वेळातच कसे बसे माथ्य्वर पोहोचलो ....खरे ...........पण
वर पोहोचताच कळलं.....कि आम्ही चुकीच्या ठिकाणी आलो आहे .....चुकीच्या डोंगरावर ...
समोरून च मृग गड दिसत होता ...जिथे आम्हाला खरे जायचे होते .....

आमचा बरासचा वेळ आता वाया गेला होता . आणि महत्वाच म्हणजे आलो त्या वाटेने पुन्हा जाने म्हणजे
खूपच रिस्की वाटू लागल होत.कारण कुठूनही वाट न्हवती .....सगळीकडून उभी खोल दरी ...

चढण खूप सोप असत ...पण उतरण फार कठीण......
शेवटी नाईलाज म्हणून ...पुन्हा त्याच वाटेने .... उतरायचं ठरलं ...आणि
पुन्हा ते धाडस करून कसे बसे ...आम्ही खाली उतरलो.
अन दुसर्या वाटेने जाऊ लागलो ..एका डोंगराला वळसा घेत ...

पुढे काही वेळातच एक गुहा दिसली. एका वेळी एकंच माणूस त्यात जाईल अशी ती गुहा...
अशा गुहे मध्ये जाण्यात मला नेहमीच फार उत्सुकता असते. त्या उत्सुकतेतच मी त्या गुहेत जाण्याच ठरवले ....आणि एका हाती torch घेऊन .....पुढे पुढे जाऊ लागलो .
ती गुहा सरळ सरळ पुढे गेल्यावर उजवीकडे वळते आणि तिथून पुन्हा ती खाली जाते खालच्या दिशेने आणि 
तिथून पुन्हा सरळ ....आणि पुन्हा कुठे वळते ते ठाऊक नाही .....
कारण त्याच्याही पुढे जाण्यचे धाडस न्हावतेच ...कारण अचानक समोरून काही प्राणी म्हणा किंवा इतर काही आले तर त्वरित मागे फिरणे ......फारच कठीण आणि जीवावर बेतणार ठरू शकत. म्हणून पुन्हा मागे फिरलो .
अन गडाची वाट पकडू लागलो .
थोड्या वेळात पुन्हा एक चढण आली ....आणि त्या उभ्या दगड धोंड्यानच्या घळी मधून आम्ही वर आलो . आणि समोरच ते दृश्य पाहून .....त्या खडकात खोदलेल्या पायर्या पाहून तो आनंद आमचा गगनात मावेनासा झाला .....


कसे गेलो :
ठाणे ते खोपली - (२ तास )
लोकल ट्रेन (ठाण्याहून )
पहाटे : ५:११ ते ७:००

खोपोली ते परळी (अर्धा ते पाऊन तास )
एसटी
सकाळी : ७:२० ते ८:१० ते ८:१५

परळी ते भेलीव ( अर्धा तास )
टमटम :दहा आसनी रिक्षा
सकाळी : ९:३५ ते १०:०५

भेलीव(गडाच्या पायथ्याच गाव ) ते गडमाथा
सकाळी १०:०५ ते दुपारी 1:३०
आमचा बरासचा वेळ वाया गेला चुकीच्या वाटेने गेल्यामुळे त्यामुळे इथे अधिक वेळ लागला ,
अन्यथा १ तासात आपण गडाचा माथा गाठू शकतो.

गडाकडे जाणारी वाट:
गडाकडे जाणारी खरी वाट हि भेलीव गावाच्या थोड्या वर असलेल्या कातकरी वाडीतून जाते . हि वाट थेट आपणास एका घळी पर्यंत पोहचवते मग तिथून वर आलो कि समोरच दगडात खोदलेल्या पायऱ्या दिसू लागतात . त्या पायऱ्या चढत आपण गडावर प्रवेस करतो .

गडावर प्रवेस करत असताना आपणास थोडी फार तटबंदी दिसते .
आपण जिथून प्रवेश करतो तिथेच त्याच्या उजव्या हाताला महिशासुर्वार्दिनी च एक शिल्प आहे आणि मधेच एक तडा गेलेली शिवपिंड दिसते . आणि त्याच्या बाजूला हाती डमरू आणि त्रिशूल असलेल एक शिल्प.
तिथून सरळ पुढे पुढे जात आपण २ टाक्यां जवळ पोहोचतो. त्या दोन टाक्याच्या मधून थोडा पुढे आलो कि समोरील सुंदर परिसर न्ह्याहालाता येतो .

संकेत य.पाटेकर
२७.०८.२०१२

परळीत पोहोचल्यावर थोडी पोट पूजा करत असताना आम्ही
डावीकडून हेमंत.. मी ..आणि लक्ष्मण



मृगगड आणि एकीकडे मोराडीचा सुळका...

मृगगड...




आम्ही चौघे ....आणि पाठीमागे मोराडीचा सुळका...




























मी ..




























दगड धोंड्यातून उभी चढ चढत असताना ....


मोराडीच्या सुळक्याकडे ..........लक्ष्मन आमचा लक्षा उर्फ मेन इंजिन..


























डोंगर दरयांच विहिंगमय दृश्य..

गडाकडे कूच करताना ...मृग गडाचा map पाहताना...

हेमंत ...किशोर आणि लक्ष्या उर्फ बाळू दा...

एका बाजूला खोल दरी ....आणि निसरड्या ओल्याचिंब गवतातून त्या मातीतून सावकाशपणे पाउल ठेवत खाली उतरताना .....
गडाकडे जाणारी वाट..

हीच ती..............वेडी वाकडी ....गुहा..




























गुहेच्या आत जात असताना .......मी...
ह्या घळी तून वर गेल्यावर ...समोरच दगडात खोदलेल्या पायऱ्या दिसू लागतात ..तिथूनच गडावर जाता येते. 





































ओसंडून वाहणारा आनंद ..............

गडाच्या माथ्यावर नेणारया पायऱ्या...

पायऱ्या चढत असताना ............दगडात कोरलेले एक शिल्प दिसत. 

महिषासुर्वार्धिनी देवी.




































महिषासुर्वार्धिनी देवी ....शिवपिंड आणि एका हाती डमरू अन त्रिशूल घेतलेलं शिल्प. 

एका हाती डमरू अन त्रिशूल घेतलेलं शिल्प. 



































पाण्याच दोन टाकं..

समोरील दृश्य..

मृगगड

अंबा नदीच्या पात्रात ,…

अंबा नदीवरील अरुंद पूल...



अंबा नदीवरील अरुंद पूल..



मानखोरे (माणगाव ) येथून परळी करता टमटम मिळते ( भेलीव पासून काही अंतर पार केल्यावर माणगाव लागते )

सकाळ वृत्त पत्रात आलेली मृगगडाची/ भेलीवचा किल्लाची माहिती.