सोमवार, २४ जून, २०१३

असावा गड :- इतिहास जागवणारे काही गड - किल्ले




किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग, डोंगररांग: पालघर
जिल्हा : ठाणे, श्रेणी :सोपी/मध्यम

बहुतेकांना अपरिचित , पण सुंदरसा ,सुखद अनुभव देणारा ,मुंबई ठाण्याहून एका दिवसात करता येईल असा हा छोटेखानी किल्ला . पावसाळ्यात चहूकडे हिरवाईचा रंग उधळत, आणि धुक्याचे पांढरे ओलसर थर ...
स्वतःवर ओढवून घेत लपून बसतो . 
पण त्या मंत्रमुग्ध वातावरणाने स्वतःचे भान मात्र विसरायला लावतो, हे खर !!

(प्राचीनकाळी शूर्पारक, डहाणू , तारापूर, श्रीस्थानक/ स्थानकीय पत्तन (ठाणे), कालियान (कल्याण) इत्यादी बंदरातून मोठ्या प्रमाणात परदेशांशी व्यापार होत. या बंदरात उतरणारा माल विविध मार्गांनी देशावर जात असे. 
या मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी किल्ले बांधले जात. यापैकीच एक आसावा किल्ला...
 डहाणू व तारापूर बंदरांना देशाशी जोडणार्‍या मार्गांवर प्राचीन काळी बांधण्यात आला. 
( ट्रेकक्षितीज या वेबसाईट वरून घेतलेली माहिती)

ठाणे जिल्ह्यातील बोइसर हे एक महत्वाचे ठिकाण आहे . बोईसर ला उतरून , पुढे पाच दहा मिनिटे रस्त्याने चालत गेल्यास नवापूर येथे वारंगडे साठी दहा आसनी जीप मिळते . 
ती आपल्याला १५-२० मिनटा मध्ये विराज FACTORY च्या आधी आणून सोडते . 
तिथेच विराज FACTORY च्या आधी उजवीकडे वळणाऱ्या डांबरी रस्त्याने गडाकडे जाणारी वाट मिळते .

पुढे पाच- दहा मिनिटे चालत गेल्यास रस्त्याच्या वळणावर एक दुकान लागते .
त्याच्या थोड्या आणिक पुढे एक ओहळ पार करत, आपण मळलेल्या पाय वाटेतून चिखलाच्या थरांचे भार आपल्या पायंवर घेत पुढे जाऊ लागतो. 
आणि काही वेळेतच एका पुलापाशी येउन पोहचतो.  (येथेच थोड्या अंतरावर उजव्या हाताला अजून २ पूल आहेत . )  येथून असावा किल्याचे सुंदर दर्शन होते .
आपले मुख, दाट धुक्याच्या मखमली थराने झाकून घेत, तो जणू नवीन नवरी सारखा डोक्यावर पदर घेत लाजून बसलेला आहे , असे वाटू लागते .

असावा गड डावीकडे ठेवत, उजवीकडील मळलेल्या पायवाटेने एका डोंगराला वळसा घेत, धुक्याच्या पांढर्या दाट पट्ट्यातून, मोकळी वाट असलेल्या गर्द झाडीतून ,गारव्याच्या ओलसर सरी अंगावर घेत, एक दीड तासातच आपण गडाच्या माथ्यावर येउन पोहचतो. 
वर येतानाच तटबंदीची रूप रेखा आपल्यास नजरेस पडते. त्या तट बंदिवरूनच आपला गडावर प्रवेश होतो .

(गडाच्या माथ्यावर कातळात खोदलेली २ टाकी आहेत. किल्ल्याच्या दक्षिण टोकाला प्रचंड मोठे बांधीव टाकं आहे. 
या टाक्याची लांबी ५० फूट ,रूंदी २० फूट व खोली १५ फूट आहे. 
या टाक्याचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या एका बाजूला कातळ आहे व उरलेल्या तीन बाजू घडीव दगडांनी बांधून काढलेल्या आहेत. टाक्याच्या पश्चिमेकडील भिंतीत टाक्यात उतरण्यासाठी पायर्‍या बनवलेल्या आहेत. 

कातळ उतरावरून येणारे पाणी टाक्यात जमा होण्यापूर्वी त्यातील गाळ निघून जावा यासाठी कातळात १ फूट व्यास व 6 इंच खोली असलेले वर्तूळाकार खड्डे कोरलेले आहेत. या टाक्याची भिंत फूटल्याने यात आता पाणी साठत नाही.

हे टाकं पाहून उत्तरेकडे चालत जातांना डाव्या हाताला पश्चिमाभिमुख प्रवेशव्दाराची जागा दिसते. 
प्रवेशव्दार व त्यापुढील देवड्यांचे अवशेष पहायला मिळतात. प्रवेशव्दारातून खाली उतरून गेल्यावर डाव्या बाजूस भिंतीचे अवशेष दिसतात तसेच कातळात खोदलेल्या काही पायर्‍याही पहायला मिळतात.
- ट्रेकक्षितीज या वेबसाईट वरून घेतलेली माहिती )

किल्ल्याचा माथा फार छोटा असल्याने , थोडा वेळ तिथे काढून , थोडी पेटपूजा करून , आपला परतीचा प्रवास सुरु होतो. पण अजूनही आपली गड फेरी काही संपलेली नसते . 
किल्ल्याच्या खालच्या बाजूस कातळात खोदलेली एक-दोन गुहा व टाकं आहे. 
साधारण अर्धा तास चालून गेल्यावर त्या नजरेस पडतात .
त्यासाठी बांधीव टाक्याच्या बाजूने खाली उतरून बारी गावाच्या दिशेला चालावे लागते.

ती गुहा पाहून आपली गड फेरी संपते . पुढे त्या गुहे जवळूनच , गर्द झाडीतून ,झर्याचा खळखलाट ऐकत, पावसाच्या रिमझिम सरी अंगावर झेलत , दगड धोंड्यातून मार्ग काढत , आपल्याच मनाशीच गुणगुणत आपण कधी मामाच्या गावात येउन पोहचतो ते कळतच नाही .
पण मामाच्या गावात पोहोचताच ओठातून ते बालपणीच काव्य हळूच बाहेर पडत आणि त्यावर... 
आपलं ...तन मन सर्व त्या लयात नाचू लागतं.

झुक झुक झुक झुक,
आगीन गाडी,
धुरांच्या रेषा हवेत काढी
पळती झाडे पाहूया,
मामाच्या गावाला जाउया
जाउया मामाच्या गावाला जाउया ......!!
  
मामाच गाव म्हणजे एक RESORT आहे . येथे VALLEY Crossing हि करता येते , असा फलक जाता जाता दिसून येतो .
Picnic साठी म्हणून येथे लोकांच येणं जाणं सतत चालूच असत. पण येथे वरच किल्ला आहे , हे बर्याच लोकांना ठाऊक नसत . अन माहित असलं तरी किल्ले भेटीसाठी सहसा कुणी जात नाही . 

माझ्यासाठी हा खास ट्रेक होता, कारण ह्यापूर्वी कधी हि ट्रेकला न गेलेली , माझी खास गोड मैत्रीण स्नेहू , ह्या ट्रेकला आम्हां सोबत प्रथमच आली होती .ते ही मला न सांगता , न कळविता अचानक, surprise देऊन . त्यामुळे ट्रेकला खरी रंगत आली .
एकंदरीत ट्रेक खूपच मस्त झाला .

संकेत य पाटेकर
२४.०६.२०१३

प्रवास माहिती : आणि खर्च
पहाटे ५:३३ ची डोंबिवली - बोइसर ट्रेन :
तिकीट दर २५ रुपये प्रत्येकी .

ठीक ८:१० ला बोइसर रेल्वे स्थानक
(विरार ला हीच ट्रेन ७ ला पोहचते )

येथेच रेल्वे लगत एक restaurants आहे , तिथे पेट पूजा उरकून
पाच मिनटे रस्त्याने तसंच पुढे गेल्यास

नवापूर येथून वारंगडे साठी जीप मिळते .
प्रत्येकी १० रुपये सीट प्रमाणे .

१५-२० मिनिटा मध्ये मध्ये विराज FACATORY ,
तिथून पुढे चालत गडाचा माथा : १ ते दीड तास ,
गडाचा माथा फार मोठा नसल्याने , आणि इतक्या काही वास्तू नसल्याने गड पाहून लगेच होते .
१ ते दीड तास वर घालवल्यावर , परतीचा प्रवास
गडाच्या पोटात असलेल्या गुहा पाहत .दुसरया वाटेने, दीड -दोन तासात मामाच्या गावात उतरून .
तिथून मग पुढे एखादी जीप पडकून बोइसर ...


काही क्षणचित्रे :-

विराज FACTORY कडून जाणरी वाट...



सुशांत नि स्नेहू ...........

वळणा वरचे दुकान ...

छोटास ओहळ ..पार करत पुढे जाताना

चिखलात माखलेले माझे पाय...

एक सुंदर फोटो..

सुंदर मनमोहक दृश्य ..

विराज factory नि आसपासचा परिसर..

पाय वाटेची एक खून ...मोठा दगड

आम्ही साद सह्याद्री ट्रेकर्स ..

भारं वाहताना , गावातले एक काका
























मंगळवार, ११ जून, २०१३

काजव्यांच्या राशीतून ..........लुकलुकता राजमाची !!


काजव्यांच्या राशीतून ..........

तुम्ही म्हणालं राजमाची अन काजव्याच्या राशीतून '' , हि काय भानगड आहे. राजमाची किल्ल्याशी त्याचा काय संबंध  ? त्याच साधं सरळ अस उत्तर आहे.

लोणावल्याहुन हून जर तुम्ही तुंगार्ली मार्गे राजमाची करण्याचा विचार करत असाल अन न ते हि रात्रीच्या दाट अंधुक काळोखात, पावसाच्या अगदी रिमझिम ओसरत्या सरित , ' तर तुम्हाला काजव्यांच्या नैसर्गिक स्वयंमचलित प्रकाशाचे लुक लुकणारे, मन मोहून टाकणारे अनेक तारे जागोजागी झाडांवर पाहायला मिळतात. 
त्याने मनात अनेक आनंद तवंग उठू लागतात.

निसर्ग तसां अद्भुत अन रहस्यमयच आहे . निसर्गाची अनेक चमत्कारिक रूप , निसर्गाची गट्टी जमाविल्यास नक्की पाहता येतात . अन ते समजून घेता येतात .

रात्रीच्या दाट काळोखातून जाताना आम्ही ते अनुभवलं. 
तसं काजवा हा प्रकार मी काही पहिल्यांदाच पाहत न्हवतो. पण काजव्यांच्या राशीच राशी , पाउला पाउलन्वर..
झाडांवर आंनद नृत्य करताना मी पाहिले न्हवते.  त्याचं ते लुकलुकनार प्रकाशमय नाच , मनाला अजून चकाकी देत होता .येणारया पुढच्या वाटे मधला अंधार जणू नाहीसा करत होता .

रात्री पावणे दोनच्या आसपास आमच्या सात जणांचा समूह लोणावळा स्थानकात दाखल झाला .
आणि पुढे काही वेळ पोट पूजा करत पावणे तीनच्या आसपास लोणावळा एसटी डेपो येथून तुंगार्ली मार्गे मार्गीक्रमण झाला , चालता चालता बोलता बोलता ट्रेक ला अखेर सुरवात झाली .
पण त्याआधी काही मजेशीर प्रसंग घडले ,ते असे कि ,

आम्हाला प्रवास करायचा होता तो सिद्धेश्वर एक्स्प्रेसच्या च्या साधारण(General ) डब्यातून (त्याप्रमाणे तिकिटे काढली होती ) , पण सीएसटी वरून येणारे तिघेजण आले ते बिनधास्तपणे आरक्षित डब्यातून , त्यामुळे आम्ही हि तिघे ठाण्यात सिद्धेश्वर एक्स्प्रेस दाखल होताच आरक्षित डब्यात जावून बसलो जिथे सीएसटी वरून येणारे मित्र भेटले..

त्यांनतर पाच एक मिनिटे झाली असतील नसतील तोच तिकीट चेकर डब्यात प्रवेश करता झाला .
आणि प्रश्न करू लागला.
Staff है क्या ? Staff ?
'TC 'ची नि आम्हा सर्वांच्या नजरा आमच्यातल्या त्या अंबरीशकडे वळल्या . 
एकटक सर्वजण त्याकडेच पाहू लागले .

अंबरीश हि काही बोलेनसा झाला टीसीला पाहून ? टीसी चे मुखशब्द मात्र स्वरात चालूच होते
Staff है क्या ? Staff ?
काही क्षणाने अंबरीश ने हाताचा पंजा उचलत मूकशब्दाने होकारार्थी उत्तर दिले
.ते पाहून टीसी ने पुन्हा एक प्रश्न उपस्थित केला ?
कोनसे Deparments से ?

आता अंबरीश मात्र मनातून गोंधळाला नि सरळ नाही म्हटले ?
तेंव्हा टीसी ची मस्तकी आग तळपायात गेली .

कबसे बोल रहा हुं Staff है क्या Staff ? असे त्याचे गडगडणारे शब्द धो धो गतीने बरसू लागले. 
आम्ही मात्र हळूच मग पाठ पिशवी घेत मुकाट्याने ट्रेन मधून त्या डब्यातून खाली उतरलो. 
नि Genral डब्यातून कसे बसे करत कल्याण गाठले नि पुन्हा एका टीसीशी गोड धोड बोलून आरक्षित डब्यातून लोणावळ्याला दाखल झालो . अशी हि गंमत ..

रात्रीच्या शांत वातारणात पावसाच्या सरीने न्हाहून निघालेल्या काळ्याभोर नितळ स्वछ ,डांबरी रस्त्यातून तुंगार्ली मार्गे आमचा प्रवास सुरु होता . एक एक पाउलं पुढे पडत होती . मन ...एकेका पाउलान सोबत मनोमन नाचत बागडत होतं .

राजमाची पहिल्यांदाच करत असल्याने त्याचं कुतूहल नि किल्ले भेटीची ची ओढ मनास सतत प्रसन्नता निर्माण करत होती. त्यात रात्रीच ते वातारवण किती अलाहादायक होत . मन फ्रेश असल्याने पाउलं देखील पटपट पडत होती . 
काही वेळेत एक उड्डाण पूल ओलांडून आम्ही उप्पर डेक्क resort च्या फलकां इथे पोचलो . इथून काही अंतर मागे डांबरी रस्त्याची सीमारेषा संपूष्टात आली होती .

आता पुढचा रस्तामार्ग ...दुर्तफा दाट गर्द झाडींनी अन पावलान खालच्या दगड धोंडांनी , ओलसर लाल मातीनी  युक्त असा नटलेला होता . त्यात चालता चालता रात्रीच्या च्या अंधार्या काळोखात काजव्यांचा दिव्य प्रकाश मनाला उजळून टाकत होता. जणू दिव्य रोशानाईत आमचं जंगी स्वागत सुरु होत .

काही वेळाने , वळणा वळणाचा तो बराच अंतर पायी पार केल्यावर , काजव्यांच ते दिव्य स्वरूप कॅमेरा मध्ये टिपून घेण्यासाठी... काही वेळ आम्ही थांबलो .  
हे काही वेळ म्हणजे जवळ जवळ ३० ते ४० मिनिटे हं  ..!
माझ्या साध्याश्या  डिजिटल  कॅमेरा मधून ...ते क्षण टिपण्याचा मी फार प्रयत्न केला.  पण सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले. 

मितालीने मात्र तिच्या SLR मधून , बराच वेळ ट्रायपॉड वर कॅमेराच अंग इकडून तिकडे मोडवीत त्याची तीक्ष्ण नजर, त्या काजाव्यांकडे वळविण्याचा प्रयत्न केला. त्यात ती सफल हि झाली असेल म्हणा .
पण एकंदरीत त्या वेळच ते वातावरण खरच खूप सही होतं . 

''निसर्गाला पडलेले सुंदर स्वप्न'' हे काही दिवसा अगोदर गीतू ने म्हटलेलं वाक्य मनाभोवती घिरट्या घेत होत. स्वप्नाच्या रंगीत दुनियेत मन न्हावून निघत होतं .

त्यातच पुढे अधिक वेळ न दवडता , साधारण ४ :३० च्या सुमारास आम्ही पुन्हा चालू लागलो . 
वळणा वर वळण घेऊ लागलो. काही ठिकाणी चिखल इतका साचला होता कि त्यात आमच्या शूज , फ्लोटर्स वजनदार झाले होते . त्यामुळे एकेक पाउलं वर उचलताना चिकटलेल्या त्या चीखलेचा भार पायंना जाणवत होता.

साधारण बराच अंतर पार केल्यावर , पहाटेच दृश्य हळू हळू उजेडात येत होतं.
माणसांच्या आवाजा इतका तंतोतंत मिळणारा एका पक्षाने (कस्तुर पक्षाने घातलेला तो शिळ मनास संगीतमय तालावर नाचवू पाहत होता . पुढे पुढे अनेकानेक पक्षीय संगीतमय स्वर , मनास भिडू लागले .

पहाट झाली . रिमझिम पाउस सरी अलगद अंग खांद्यावर बरसू लागल्या . अन निघून हि गेल्या .

रात्री पाउने तीन ला सुरु केलेली पायपीट थोडा वेळ विश्रांती साठी थांबली . 
रस्त्याला पाठ टेकवून वर नभाकडे पाहताना मनास किती प्रसन्नता वाटत होती. 
पायांना हि थोडी विश्रांती मिळत होती .

पाच दहा मिनिटे गेल्यावर , जांभलीच्या रानातून पुढे वाट निघालेली , त्या वाटे मधून आम्ही चालू लागलो . 
अस करत करत आम्ही गावाच्या वेशीवर असलेल्या गणेश मंदिरात मुक्काम ठोकला. 
तो जवळ जवळ १ तास भर. तिथेच मग न्ह्याहारी झाली . अन डोळ्या वरची थोडी झोप हि पूर्ण झाली .

अधिक उशीर होऊन नये म्हणून पुन्हा पायपीट चालू केली .
मंदिराच्या उजव्या अंगाला रस्त्याला लागूनच तटबंदीचे काही अवशेष दिसत होते .
ते मागे सरत , पुढे श्रीवर्धन किल्याला वळसा घालत नि मनरंजन श्रीवर्धन ह्यांची एकत्र जोडीगोळी पाहत आम्ही उधेवाडीत प्रवेश करते झालो .

- क्रमश :
पुढील भाग लवकरच ..........

संकेत य पाटेकर
११.०६.२०१३


मंगळवार, २९ जानेवारी, २०१३

राजगड - शोध सह्याद्रीतून ....२६/२७- २०१३


राजगड - शोध सह्याद्रीतून ....



















किती शांत वातावरण होतं. तरीही अधून-मधून वाऱ्याची गार झुळूक अंगावर येत. जणू ती वारेगुलाबी थंडी एकटक खेळत,गुणगुणत स्व:तहाशीच ...

तिने आपले बाहू सर्वत्र पसरले होते ,संपूर्ण राजगड परिसर तिने आपल्या अखत्यारीत आणले होते , तिच्या मगरमिठीतून कुणाचीच सुटका होत न्हवती , गारठलेली ती पाने फुले हि , 'सूर्य नारायणाच्या दर्शनास जणू  आतुरली होती , त्याकडून मिळनाऱ्या कोमलतेच्या उबेसाठी ...

 पण अजून तसा बराच अवधी होता.
राजगडचं रूपं काळोखात हि कस लक्ख उठून दिसत होतं , शेवटी स्वराज्याची ती राजधानी,  आपल्या शिवबाजी , इथल्या रयतेची राजधानी, जिथे आपल्या राजाचं २५ वर्ष वास्तव्य होतं.
जिथे अनेक सुख दुखाचे प्रसंग स्व:तहा ह्या किल्ल्याने पहिले , इथल्या मातीने अनुभवले , इथली प्रत्येक वास्तू त्याची साक्ष देत आजही , अजूनही खंबीरपणे उभी आहे , ते पाहूनच उर भरून येतो , कुतूहल जागं होतं , अभिमान वाटू लागतो , खरच भाग्यवान आहोत आपण इथल्या मातीत आपला जन्म झाला.
हे सर्व अनुभवत होतो मी राजगडवर ,तिथल्या मातीत..

तन-मन हरवलं होतं राजगडचं रूप न्ह्याहाळत , स्व:ताहाशीच कुजबुज करत होतं ते , तेवढ्यात माझ्या वहिनीचा मंजुळ स्वर कानी पडला , डोक्यापर्यंत घेतलेली चादर अलगद उचलून बाजूला सारून पाहिली नि तोच घड्यालाकडे लक्ष गेलं , सकाळचे साडे सात होत आले होते.
पुन्हा एकवार घड्याळाकडे पाहू लागलो , डोळे चूळबळू लागलो . तेंव्हा आपण कुठे आहोत ह्याची जाणीव झाली.
अजूनही राजगडाची ती सोनेरी क्षणे मनातून नि नजरेतून हलत न्हवती. रात्री उशिरा घरी परतलो होतो नि जेवून-खाऊन तसाच झोपी गेलो होतो, राजगड वर घालवलेले ते सर्व क्षण आठवतं ...

मागच्याच वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राजगडला जाऊन आलो होतो.
त्या आठवणी ताज्या असतानाच पुन्हा राजगडला जाण्याचा योग आला... तो रश्मीमुळे, ..
तिच्या ''शोध सह्याद्री '' ह्या तिने स्थापिलेल्या अन ''छत्रपती शिवाजी महाराज '' ह्यांच्या जयंती वेळी सुरु केलेल्या छोट्याश्या पण महत्वाची कामगिरी त्यातून बजावणार्या ग्रुप मुळे .

खास , येणारया पिढीसाठी - शाळेतल्या मुलांमध्ये आपला हा गौरवशाली 'गड - कोट - किल्ले' ह्यांचा इतिहास , त्यांच्या मना मनात रुजवावं , किल्ल्याचं महत्व पटावं , त्यातून मिळणार्या प्रेरणेतून , त्यांच स्वतःच उज्ज्वल भविष्य घडावं हा ह्या '' शोध सह्याद्रीचा'' मुख्य उद्देश ...
आणि म्हणूनच माझं जाणही तितकंच निश्चित होतं .


























त्या निरागस लहान मुलांमध्ये मिसळणं , त्यांच्याशी संवाद साधणं  , त्यांच्या निरागस प्रश्नांना उत्तर देणं ' त्यांना आपला हा गौरवशाली गड-कोट-किल्ल्यांचा इतिहास समजावून सांगणं, ' हे मला अनुभावायचं होतं.
आणि ते सगळ पूर्ण झालं ,  ''शोध सह्याद्रीचे '' २ दिवसाच्या आखलेल्या ह्या राजगड मोहिमेत ...
त्याबद्दल मनापासून धन्यवाद आपल्या सर्व टीम ला ...

राजगड ट्रेक दरम्यान माझ्या मनावर आपला छाप उमटवून गेलेले काही क्षणांचे मी इथे वर्णन करणार आहे :-
१) वर दिल्या प्रमाणे लहान मुलांमध्ये मिसळणं खरच खूप वेगळा आनंद असतो, त्याचं ते निरागस मन आपल्याला आपल्या बालपणीच्या आठवणीत नकळत घेऊन जातं.
त्यांच्याशी संवाद साधताना ,त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांना कळेल अशा भाषेत समजावून सांगणं खरच खूप कठीण असतं ,प्रत्येकाला ते जमतच अस नाही...

ट्रेक दरम्यान अशी अनेक निरागस प्रश्न कानावर पडली. त्याच उत्तर त्यांना समजेल अशा शब्दात सांगण्याचा मी माझ्यावतीने तसा पूर्ण प्रत्यत्न केला .
आपण ज्यावेळेस आपल्याकडील ज्ञान इतरांना देतो, आणि देत असता त्यांच्या चेहऱ्यावरचे ते समाधानी भाव , ज्यावेळेस निरखतो  , त्यावेळेस मनात  स्फूर्ती निर्माण होते , मनं अधिक उत्साहाने टवटवीत होवून बहरले जाते.
माझं मनही असंच बहरलं .....त्या वातारवणात ........

विशेष म्हणजे परतीच्या वेळी ट्रेकबद्दल घेण्यात आलेल्या,  आप आपल्या प्रतिक्रिया देत असता केल्या गेलेल्या त्या कौतुकाने :-) विषेच आभार ....संपदाचे , माझ्या बहिणीचे :))

२) निसर्ग हा एकमेव असा मित्र आहे कि त्याच्या सानिध्यात असता तो इतर विचार 'जे मनात नेहमीच धूडगूस घालत असतात ' , त्यांना तो त्यावेळेस तरी आपल्या आजुबाजूस फिरकू देत नाही.
एका आगळ्या-वेगळ्या धुंदीत आपल्याला तो घेऊन जातो. एका वेगळ्या लयात आपल्याला तरंगत ठेवतो. एक वेगळी सफर घडवून देतो.  त्यात असतो असतो फक्त आनंद ...आनंद नि आनंद ..
नि जीवनशिक्षण जे पाठ्य पुस्तकातून कधीही मिळत नाही.
ते त्याच्या सानिद्ध्यात आल्यावर ,त्याच्याशी एकांतात सवांद साधता मिळून जातं.

दुपारची वेळ , माचिवरल्या पद्मावती मंदिर मागे असंच काही क्षण आजूबाजूचा निसर्ग , त्यातील निर्जीव सजीव घटकं,  नजरेत उतरवतं,  एकटक त्या तटबंदी जवळ बसून होतो.
बाजूला काही अंतरावर माकडांची टोळी त्यांच्या मस्तीत गुंग होती.  त्यातील एक कुटुंब माझ्या अगदी समीप येउन बसलं. घाबरलं नाही. मी हि आपला जागचा उठलो नाही. बस्स त्यांना निरखून पाहू लागलो.
प्रेमाने ...
ते चौकट कुटुंब , त्यातलं ते चिमुकलं पिल्लू , आईच्या अंगा खांद्याशी लगट करत होतं.
कधी आपली भूख भागवतं होतं...
किती गोजिरवानं नि छानसं पिल्लू होतं ते..

काही वेळेत टुनटुन उडया मारत ते आईपासून दुरावलं नि तटबंदी वरून बागडत बागडत , आपल्या इतर बांधवांकडे जावू लागलं. आई अन तिची सावली सोबत असली म्हणजे , कसली काळजी नि काय ...
क्षणभर वाटलं ,ते सगळे क्षण आपल्या कॅमेरात बंदिस्त करावेत. पण म्हटलं , नको ..ते आपण आपल्या नजरेतच सामावून घ्यावं ...कायमचं...!

दुसऱ्याच  क्षणी निळ्याशार आकाशात त्या काळ्या निळ्या इवल्याश्या पाखराची ती उंच झेप मनाला भरारी देत होती.पाली दरवाज्याचा भक्कमपणा , बालेकिल्ल्याच ते रांगड रूप , त्याच ते सौंदर्य अन निळेशार आकाश मनाला उजळवून टाकत होतं.
दुपारच जेवण उरकून सुवेळा माचीकडे जातेवेळी , डुबा खुणावू लागला.
नजरेत येऊ लागला. तसं  गो. नि दांडेकरांची '' वाघरु'' नि त्यातील ते क्षण '' तिथल्या उंच झाडी वर वाघरुसाठी बांधलेले मचाण'' तो सारा प्रसंग डोळ्यासमोर नाचू लागला.

पुढे नेढे जवळ , त्या नेढेतून त्या वाघरू च क्षणात नाहीस होणं, हे सगळे त्या कादंबरी मधले प्रसंग एक एक करत आठवू लागले. मन भारावू लागले. आणि त्या भारावलेल्या स्थितीतचं आम्ही , मी पुन्हा पद्म्वती मंदिरकडे परतू लागलो.

सूर्य हळू हळू मावळती कडे झुकू लागला. तशी रात्रीच्या जेवणाची लगबग सुरु झाली.
संपदा , सिद्धेश , सुशील , सुशांत , रश्मी , यतीन , भरत , प्रणीत सर्व एकमेकांना  मदत करत होते.
जेवण तयार करण्यास मी हि अधे मध्ये इतर कामांना हातभार लावत होतो.

अशातच सूर्य देवता मावळतीकडे केंव्हाच लुप्त झाले होते.  पण त्यांची ती सोनेरी तांबूस रूप मी माझ्या कॅमेरात नि नजरेत बंदिस्त केली होती.
































रात्रीच गडद छाया हळू हळू गडावर आपलं विस्तार करू पाहत होती. तरीही पौर्णिमा असल्याकारणाने , चंद्र देवतेच्या शीतल प्रकाशित छायेत गड न्हाहून निघालं होतं.

काही वेळ त्या ढगांशी लपाछुपिचा खेळ खेळणार्या त्या चांदोबा कडे टकमक पाहत असता, एक विचार मनात तरळून गेला.
मनं म्हणू लागलं , 'आता पर्यंत कित्येक क्षण ह्याने आपल्या स्मरणात ठेवले असतील ...
कित्येक महत्वाचे प्रसंग , इथला इतिहास आपल्यात सामावून घेतला असेल न्हाई !
मन असंच काहीसं  कुजबुज करत होतं.
काही गोष्टींशी जुळवणी करत होतं अन त्याचबरोबर वेळ हि पुढे पुढे सरत होती.

जेवण आता  तयार झालेलं , चुलीवरल्या जेवणाची अन ते तयार करताना केल्या गेलेल्या मेहनतीची चव,
अन तो खमंगच इतका स्वादिष्ट होता कि त्यानेच मनं आणि उदर दोन्हीही तृप्त झाले.


काही वेळेतेच जेवण उरकून सगळे (बच्चे कंपनी विशेष करून ) थकले भागलेले असल्याने ते हि झोपी गेले ,
मी हि आपली चादर पायापासून डोक्यापर्यंत घेत झोपी गेलो.
पण रात्रीची ती गुलाबी थंडी अंगावर चादर घेतली असता हि अलगद स्पर्शून जात होती.
मनाची हुरहुरी वाढत होती.सर्वत्र शांतता नांदू लागली.
पद्मावती मंदिर बाहेर कुणा एका दोघांचा आवाज हळुवार कानी पडत होता.
अशातच एका क्षणी , एका कसल्यातरी मोठ्या आवाजाने सगळं वातावरण ढवळून निघालं .
सगळं एकाकी  शांत झाल्यासारखं  भासलं. कुणास ठाऊक काहीतरी विपरीत घडलं असावं असा एक विचार मनाशी स्पर्शून गेला. पण नंतर म्हटलं बाहेरील मुले काहीतरी दंगा मस्ती करत असावी.
असो...

घड्याळाचे काटे वर्तुळाकार फिरत फिरत एकमेकान जवळ येतं  अन पुन्हा दुरावतं असा एकंदरीत  त्यांचाखेळक्रम चालू होता.  त्यांच्या त्या खेळ - खेळा मध्येच पहाटेचे ६ वाजले होते.
अजून हि तसं उजाडलं न्हवत. पण थंडीने मात्र झोडपलं होतं.

त्या गारठ्यात पद्मावती तलावाजवळ गेलो नि त्यातल्या थंडगार पाण्याने (अर्थात बॉटल ने पाणी भरून मग ) हाता तोंडावर पाणी शिंपडले. काही वेळेतच रात्रीचा उरलेला भाताचे फोडणी भात करून नि चहा पाणी घेऊन आम्ही सगळे संजीवनी माचीकडे निघालो.

संजीवनी माचीकडून मग पाली दरवाज्याकडे , अन तिथून पुन्हा पद्मावती मंदिराकडे ,
प्रत्येक ठिकाणी रश्मी , संपदा , यतीन , प्रीतम , आपल्याजवळील असलेली माहिती, लहान मुलांपर्यंत पोहोचवत, त्यांना ते समजावून सांगत ....माझाही त्यात थोडाफार हातभार असे ,
मन तेंव्हा साहजिकच अधिक फुलत, कारण आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्यांना देण्यात जो आनंद असतो , त्याच काय नि कसं वर्णन करावं  ....असो

दुपारचे २ वाजले होते. परतीचा मार्ग जवळ येत होता , वेळ हि अशी गोष्ट आहे कि कधी कुणासाठी थांबत नाही. 
झाली परतीची वेळ झाली , निघण्याची घाई झाली , राजगड , राजगड , राजगड ...
 हे २ दिवस कसे त्वरित निघून गेले , कसे भुर्रकन उडाले ते कळलेच नाही , राजगडचं ते राजवैभव , तिथल्या प्रत्येक वास्तूतलं सौंदर्य नजरेत बंदिस्त करून आम्ही निघालो पुन्हा परतीच्या वाटेला ...

पण खरंच राहवत न्हवतं ..' कुणीतरी माझ्या पायाला साखलदंड बांधा रे '  
म्हणजे मी इथला जागचा हलणार नाही. 
मनात एकप्रकारे अशी आरडाओरड सुरु होती. 
पण त्यावर इलाज न्हवता. चोर दरवाज्याने आलो तसंच पुन्हा त्याच वाटेने गुंजवणे कडे निघालो. 
काही तासातच गुंजवणे गावात पोहोचलो हि ...

गावात पोहोचताच  तिथल्या हापशी वर हातपाय धुतले  नि पुढे शिवरायांच्या प्रतिमेचे मनोमन दर्शन घेतले आणि शाळेजवळील पटांगणात उभा राहिलो .
तेवढ्यात समोरून एक आजीबाई काठी टेकवत टेकवत हळुवार थरथरत्या अंगांनी माझ्या बाजूला येउन बसली.चेहर्यावर असंख्य त्रयस्त छटा , सुरकुत्या लांबूनच दिसत होत्या.

तुम्ही ह्याच गावाचे का ? ह्या प्रश्नाने मी बोलण्यास सुरवात केली.

हो रे बाबा, इथलेच..
काय सांगू , दोन तीन दिवसापासून  ताप थंडी , उलट्या चालू आहेत.
डॉक्टर कडे गेले होते.  २०० रुपये घेतले.
आपला हातावरची पट्टी दाखवत थकल्या आवजात त्या आजीबाई बोलत होत्या.

मरण पण येत नाही रे बाबा , सुनेकडे लाह्या मागितल्या दिल्या नाही.
मुलाकडे पैसे मागितले दव्यासाठी ते दिले नाही.  मरण पण येत नाही रे.. नाही येत...
स्वतःशीच बोलल्यागत हळुवार थरथरत्या ओठाशी त्या पुटपुटत होत्या.

बाबा दहा रुपये मिळतील का ?
त्यांनी माझ्याकडे वळून पाहिलं , मिळतील ह्या अपेक्षेने ,
पाकिटात किती पैसे शिल्लक होते हे मलाच ठाऊक न्हवतं.
मी  माझं पाकीट बाहेर काढलं नि जी नोट हाती आली ती देऊ केली.
ते देताना त्यांच्या चेहऱ्यावरील ते भाव बघण्यासारखे होते.
त्यांनी मला मनोमन आशीर्वाद दिला.  त्यांचे चरणस्पर्श करून त्यांचा निरोप घेऊन मी आमच्या टीम सोबत चार चाकी वाहनाने परतीच्या मार्गी लागलो.

मनात तेंव्हा एकाच विचार घोळत होता.
का म्हणून अशी वागतात लोक ? आपल्या आई - वडलांशी ?
म्हातारपणं हेही देवानेच दिलेली देणगी , ती पुढे आपल्यालाही मिळणारच ?
काही क्षण विचारांचं चक्र तेजीत चालू होतं.

एका क्षणी मन म्हणालं , परिस्थिती नि वेळ हीच मुळात माणसाला त्याच्या सहनशक्तीला , त्याच्या विचार वृत्तीवर , त्याच्या तना मनावर , आघात करत असते ...अन त्यानुसार बदल हा घडत असतो.
हाच निसर्ग नियम ............
गाडी ने वेग घेतला तसा राजगड नि त्या सगळ्यां आठवणी मनाच्या एकां कप्यात बंदिस्त झाल्या.....

संकेत य पाटेकर
२९.०१.२०१३
मंगळवार
















शनिवार, २० ऑक्टोबर, २०१२

कुलाबा - सर्जेकोट अन भरतीची लाट (३० सप्टेंबर २०१२, रविवार )





माणसाने कितीही प्रगती केली ...तरी त्याला ह्या निसर्गा पुढे मान झुकवावी लागतेच ..हतबल ह्वावेच लागते. 
दुसरा पर्याय हि नसतो आपल्याकडे त्याच्या त्या भव्य दिव्य शक्तीपुढे ... ह्याचा प्रत्यय काल आम्हास आला.  
पूर्ण तयारीनिशी कुलाबा किल्ल्याकडे आम्ही सगळे रवाना झालो. 
पहाटे ७ ची गेट वे वरून फेरी बोट पकडून ..

सकाळच्या तांबड्या - सोनेरी कोवळ्या उन्हातून ....त्या तरंगातून ..सागरी फेसाळ लाटातून ...
मांडावा बंदरात ..अन तिथून त्यांच्याच बस ने पाऊन तासात रस्ताय्च्या दुर्तफा असलेल्या नारळी पोफळीच्या बागेतून थेट अलिबाग....मनात त्या बळकट अन ऐतिहासिक किल्ल्याचे ते रूप साठवून ... 
छत्रपती शिवराय , छत्रपती संभाजी महाराज , मराठी आरमार प्रमुख ..दर्यासारंग ..कान्होजी आंग्रे ....ह्यांच्यासारखे आदर्श व्यक्ती आणि त्याचे ते महान कार्य डोळ्यात साठवून...

आम्ही अलिबाग एसटी स्थानका जवळ आलो अन तिथून १०- १५ मिनटे पायी चालण्या नंन्तर अलिबागच्या त्या समुद्र किनारी येऊन थांबलो . 
आमच्या पैकी दोघेजण निलेश अन स्नेहल ह्यांनी सकाळी आठ वाजताच बाईक ने डोंबिवली हून अलिबाग गाठले होते . २ तास ते तिथे आमची वाट पाहत कंटाळून गेले होते.

आम्ही पोहताच त्यांना हायसे वाटले असावे ह्यात शंकाच नाही ....
स्नेहल चा चेहरा तर प्रेमळ रागाने फुगला होता. थोडं बोलन अन निलेश अन स्नेहल शी थट्टा मस्करी झाल्यावर  किल्ल्यावर जाण्यासाठी म्हणून मी समुद्रकिनारी नौका /होड्या कुठे दिसते का ते पाहू लागलो. 

भरतीची वेळ होती त्यामुळे आम्हाला काही पायी किंव्हा टान्ग्यानी जाता येणार न्हवते. 
नजर आपुसकच मग इकडे तिकडे नौकेच्या शोधार्थ समुंदर किनारी झेप घेऊ लागली . पण कुठेच काही दिसेना. 
ना नौका ना नौका धारक ....नाविक...

तिथल्या स्थानिक लोकांना विचारले असता त्यांनी म्हटले ''तुम्हाला ओहोटी शिवाय किल्ल्यात जाता येणार नाही' दुपारपर्यंत ते पाणी निस्तरेल ..हळू हळू ..तेंव्हा तुम्ही पायी जावू शकता अथवा टान्ग्यांनी . होड्या बंद आहेत.

त्याचं ते वाहणारे शब्द ऐकून ...मनात विचारांचं चक्री वादळच फिरू लागल. ...मन सैरा वैरा झाले.
इतक्या सारयांना इतक्या दूर वर मी जो ऐतिहासिक किल्ला पाहण्यास घेऊन आलो .... 
ते न पाहताच पुन्हा माघारी फिरायचं ...ह्या एका विचारांनीच ...मन कस स्तब्ध झालं.

आता पुढे काय ??
म्हणून सगळ्याचं एकमत होणे गरजेच होत . त्यासाठी पटा पटा एकमेकांच मत जाणून घ्यायला सुरवात केली .
नि काही मिनिटातच मुरुड जंजिरा करायचे हा एकजुटीचा ठराव संमत झाला. 
अन जराही वेळ न दवडता आलो त्या मार्गी पुन्हा फिरलो ...

तसं ह्या मोहिमेला निघतेवेळी मनात ठसवुनच निघालो होतो, की आपण पोहचु त्यावेळेस नक्की भरती ही असणारच , ट्रेकक्षितिज च्या कुलाबा किल्ल्याविशायी दिलेल्ल्या माहितिपत्राताही त्या खाली शेवटी त्यानी तिथि आणि वेळ लिहली आहे,
किल्ल्यात जाण्यासाठी सोयीस्कर ओहोटीच्या वेळा
तिथी वेळ तिथी वेळ
प्रतिपदा ४:०० ते ६:०० अष्टमी ९:०० ते १२:००
द्वितीया ५:०० ते ७:०० नवमी १०:०० ते १२:३०
तृतीया ५:३० ते ८:०० दशमी ११:०० ते १३:००
चतुर्थी ६:०० ते ९:०० एकादशी११:३० ते १४:००
पंचमी ७:०० ते ९:३० द्वादशी १२:०० ते १५:००
षष्टी ८: ०० ते १०:०० त्रयोदशी१३:०० ते १६:००
सप्तमी ८:३० ते ११:०० चर्तुदशी १३:०० ते १६:००
पौर्णिमा / अमावस्या १४:३० ते १७:००

हे सर्व माहीत असता , आम्ही निघालो , कुलाबा अन सर्जेकोट पाहण्यासाठी , का .... तर वाटल होत की अलिबागाचा किनारा ते किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी ख़ास होड्या-नौकेच्या सेवा असतील. 
तसेच काही वर्षापुर्वी माझा मित्रही कुलाबा किल्ला पाहून आला होता आणि त्यावेलेस ही भरती असल्याने तो होडीनेच किल्ल्यात जावून आला होता.

म्हणून निशंक मनाने आम्ही कल्याण- ठाणे - गेट वे - मांडवा करत अलीबाग च्या ह्या किनार्या पर्यंत आलो होतो .
पण इथे आपल्यावर मनात साठवलेल सगळ चित्र पालटल होत. 
म्हणून वेळ हातातून निसटण्याआधी आम्ही मुरुड जंजिरा करायचे ठरवले.
अन त्यासाठी एखादी चारचाकी वाहन कुठे मिलते का म्हणून रस्त्याने चालता चालता चौकशी करू लागलो .

सुरवातीला एक टमटम वाला दिसला त्याने अलीबाग - मुरुड -जंजिरा - अलीबाग चे १५०० रुपये होतील असे सांगिलते. त्याला काही कारणास्तव आम्ही नाही म्हटले अन पुन्हा दुसर्या वाहनाच्या शोधार्थ बोलत चालत निघालो.
आमच्या पैकी दोघे निलेश अन स्नेहल बाईक ने होते . 
त्यांनी पुढे जावून एक तवेरा बद्दल चौकशी केली नि आम्हाला लगेच तिथून कॉल केला .

तवेरा होती त्यामुले मस्तपैकी आराम के साथ जाण्यास मिळणार होते . पण जाउन येउन १९०० रुपये होतील असे त्याने म्हटल्यावर खरच मुरुड जंजिरा करायच का ??.हां मुद्दा पुन्हा उपस्थित झाला .

कारण खर्च वाढत होता. त्यात वेळही फार कमी होता. जाउन येउन ५ ते ६ तास होणार होते . 
नि आताच इथे ११:१५ झाले होते .शेवटची सायंकाली ६:१५ ची मांडवाहुन अपोलो लौंच होती . 
तिने आलो त्या मार्गी पुन्हा घरी परतायचे होते.
मग काय पुन्हा एकदा ...ठराव पास झाला. नि जे पाहण्यासाठी आलो होतो. 
तो कुलाबा किल्ला पाहुनच जायचे असे मनी पक्की केले. पण त्यासाठी आम्हाला दुपार पर्यंत तिथे थांबायला लागणार होते, ओहोटी पर्यंत ...तेंव्हाच कुठे तिथे जाण्यास मिळणार होते.

आता घड्याल्यातळा छोटा काटा ११ वर तर मोठा काटा ६ वर स्थिरावला होता. म्हणजेच साडे अकरा वाजले होते .दुपारी दोन ते तीन पर्यंत तरी जाता येणार न्हवते. त्यामुळे मिळालेला इतका वेळ काय करायचे हां एक नवा प्रश्न उपस्थित झाला....नि त्या प्रश्नाला थोड्याच वेळात उत्तर देखिल मिळाले.

बिर्ला मंदिर - अलिबागपासून चार चाकी वाहनाने साधारण १ तासाच्या अंतरावर
रेवदंडा साळाव ही खाडी पार केली की,
डाव्या बाजूला दोन कि.मी. अंतरावर बिर्ला उद्योग समुहाने बांधलेले संगमरवरी आदित्य बिर्ला गणेश मंदिर आहे . या मंदिरात गणेश मूर्ती व्यतिरिक्त अंबामाता, शिवपार्वती, राधाकृष्ण व सूर्यदेव यांच्या मूर्ती आहेत.
मंदिरात प्रवेश करतेवेळी मात्र आपल्या सोबत आणलेले मोबाईल फोन , कॅमेरा आता नेण्यास बंदी आहे.

साधारण १२:३५ मिनिटाने आम्ही मंदिराच्या प्रवेश द्वाराशी पोहोचलो . नि दर्शन वगैरे घेऊन ...काही वेळ त्या शांत ठिकाणी त्या वातावरणात तसेच बसून राहिलो.

मंदिर - मनात चैतन्य निर्माण करणार , चेहर्यावर प्रसन्नता आणणार अन शांत वातावरण असणार ठिकाण. 
अशी माझी मंदिराविषयी व्याख्या आहे. खरच खूप छान वाटत तिथे ..त्या शांत वातावरणात.
काही वेळ आम्ही तिथे तसेच बसून होतो ...

निलेश बाईक ने आला असल्यामुळे त्या प्रवासामुळे तो फारच थकला होता . त्यामुळे तो तिथेच काही वेळ शांत पडून होता . वेळेचे बंधन असल्यामुळे नि कुलाबा किल्ला पाहायचं असल्याने आम्ही तिथून काही वेळेतच निघालो .

दुपारचे १ वाजून गेल्याने पोटात कावळे सुद्धा ओरडू लागले होते. भूख लागली होती..साऱ्यांना ,
त्यामुळे जे काही सोबत आणले होते जेवणाचे डबे ते पटा पटा बाहेर पडू लागले .
कुणी थेपले चटणी , टोमॅटो चटणी , ठेचा, अस काय काय आणल होत. 
स्नेहल ने स्वतहा ने बनविलेला केक आणला होता.त्यामुळे कसं पोटभर जेवण झाल . 
पोट तृप्त झाल त्या जेवणाने...

जेवण उरकल्यावर थोड्या वेळेतच सगळ्यांची एकत्रित अशी एक छानशी छबी घेऊन,
आम्ही आमच्या पुढील अन महत्वाच्या ठिकाणी म्हणजेच कुलाबा किल्ल्याच्या दिशेने निघालो.
निलेश अन स्नेहल ह्याना घरी वेळेत पोहचायचे असल्याने कुलाबा किल्ला कडे न येता ते परतीच्या मार्गी लागले.

आमच्यामुळे सकाळी २ तास त्याना थांबावे लागले . ते हि आम्हा सोबत कुलाबा किल्ला पाहण्यसाठी आले होते. 
पण वेळेअभावी ते न पाहताच बिर्ला मंदिरा पर्यंत आम्हा सोबत करून तिथूनच पुन्हा माघारी फिरले.
वाईट त्याच गोष्टीच वाटत होत . त्या दोघांना तो ऐतिहासिक किल्ला पाहता आला नाही...माझ्यामुळे ....
भरती -ओहोटीच्या लाटांमुळे ................

असो ..तर बिर्ला मंदिरं करून जेवण उरकून आम्ही उरलेले ७ जण तवेराने सुसाट निघालो .
मध्येच एका वेडसर गाडीवाल्याने आमच्या तवेराला ओव्हर टेक करून ...
मधेच त्याच्या वाहनाचा वेग कमी अधिक करत ...तर कधी रस्ताच्या उजवीकडून डावीकडे , डावीकडून उजवीकडे गाडी वळवत काही मिनिटे पुढची जाण्याची वाट अडवून धरली. 
त्यामुळे आमच्या ड्राइव्हर काकांचा रागाचा पारा वाढीस लागला. नि मग काय चोर - पोलिसांचा खेळ सुरु व्हावा तसा ... त्याला चांगलाच धडा शिकवावा ह्या हेतूने काकांनी पाठलाग सुरु केला .

एकमार्गी रस्ता असल्याने दोन्ही दिशेने वाहनांची ये जा सुरु होती ...त्यात काकांनी इतर वाहंनाना ओव्हर टेक करत त्या गाडीला धुंडाळत त्याच्या पुढे जाऊन त्याला चांगलाच धडा शिकवण्याच्या हेतूने गाडीचा वेग वाढवला. 
तसं मनात धस्स होऊ लागले ... नि सगळ्यांनी '' '' जावू द्या ओ काका ...राहू द्या ''कुठे मागे लागताय '' उगाच काहीतरी भलत सलत व्हायचं'' अस म्हणून काकांचा राग थंड करू लागलो.

गाडीचा वेग नि काकांचा राग थोडा कमी झाल्यावर रस्त्याच्या दुर्तफा असलेल्या नारळी - पोफळींच्या बागेवर नजर खिळवत आम्ही साधारण दुपारी २:३० पर्यंत अलिबाग समुंदर(समुद्र) किनारी पोहोचलो.
अलिबाग- बिर्ला - अलिबाग ...तवेराचे ८०० रुपये आम्ही काकांना देऊ केले.
नि किनार्यावरच्या त्या वाळुच्या कणा कणावर पाय रोवीत ...ठसे उमटवीत ...आम्ही मौज मस्तीत किल्ल्याच्या दिशेने जावू लागलो. ओहोटी असली तरी समुद्राचं पाणी थोड्याफार प्रमाणात साठलेलं असतंच . त्या
तून डुबुक डुबुक आवाज काढत आम्ही सर्जेकोट ठिकाणी येऊन पोहचलो.











































५ बुरुजांच अन भक्कम तट बंदीचा हा छोटेखानी किल्ला आजही वयाच्या ३६१ व्या वर्षी सागराच्या प्रचंड लाटांचा 
तडाखा खात ,आपल्या इतिहासाची साक्ष देत भक्कमपणे उभा आहे.



जून १६८१ साली ह्या किल्ल्याच बांधकाम संभाजी महाराजांच्या अखत्यारीत पूर्ण झाल.
छत्रपती शिवरायांनी १६८० साली कुलाबा किल्ला बांधण्यास सुरवात केली. 
 पण त्यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज ह्यांनी ह्या दोन्ही किल्ल्याचे बांधकाम पूर्ण केले.

सर्जेकोट बांधण्याचे कारण .......
(शिवाजी महाराज आपल्या आज्ञापत्रात म्हणतात, ‘‘किल्ल्या जवळ डोंगर(पर्वत) असल्यास तो सुरुंग लावून फोडावा आणि शक्य नसल्यास त्या डोंगरावरही किल्ला बांधावा‘‘. यामुळे मुख्य किल्ल्याला संरक्षण मिळते. अन्यथा शत्रु बाजुच्या मोक्याच्या जागेवर मोर्चे लावून किल्ला जिंकून घेऊ शकतो. आज्ञापत्रातील महाराजांच्या या आज्ञेप्रमाणेच बहुतेक संभाजी महाराजांनी कुलाबा किल्ल्या जवळील खडकावर सर्जेकोट किल्ला बांधला.
यापूर्वी १६७९ साली खांदेरी बेटावर किल्ला बांधताना जवळच असलेल्या उंदेरी बेटाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे सिद्दीने उंदेरीचा ताबा घेतला व त्यावर किल्ला बांधला व मराठ्यांना कायमची डोकेदुखी झाली. कदाचित ह्या घटनेपासून बोध घेऊन सर्जेकोट व त्याला कुलाबा किल्ल्याशी जोडणारा दगडी सेतू(कॉजवे) संभाजी महाराजांनी बांधला. - ट्रेकक्षितीज सौजन्याने )

सर्जेकोट पाहून झाल्यावर ...आमची पाउल कुलाबा किल्ल्याच्या दिशेने त्या बांधलेल्या सेतूवरून पुढे पुढे सरू लागली.
अन किनाऱ्यालगतच्या एका भव्य अन मुख्य प्रवेशद्वारापाशी येऊन थबकली .
किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर मोर, हत्ती, हरण, कमळ, शरभ अशी शिल्पे कोरलेली आहेत.
मुख्य प्रवेश द्वारातून आत शिरताच दुसऱ्या दरवाज्याचे काही अवशेषच फक्त आपल्या नजरेस पडतात . त्यातून पुढे प्रवेश केला कि ५ रुपयाच तिकीट काढल्यावर मग किल्ला पाहण्यास निघायचे .



कुलाबा किल्ल्याचा इतिहास :
(अलिबागच्या समुद्रात अर्धा किलोमीटरवर असलेल्या खडकावर मराठी सैन्याची चौकी होती. ‘‘ज्यांचे आरमार त्यांचा समुद्र‘‘ हे शिवाजी महाराजांना माहीत असल्यामुळे मोक्याच्या बेटांवर त्यांनी किल्ले बांधले व जुने बळकट केले. १९ मार्च १६८० रोजी महाराजांनी किल्ला बांधायला सुरुवात केली. त्यांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी कुलाबा किल्ल्याचे बांधकाम जून १६८१ मध्ये पूर्ण केले. सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांच्या कारकीर्दीत कुलाबा किल्ला प्रसिध्दीस आला. त्यावेळी आरमारी हालचालींचा डावपेचांचा हा किल्ला केंद्र होता. ४ जुलै १७२९ रोजी कान्होजी आंग्रे ह्यांचे कुलाबा किल्ल्यावर निधन झाले. १७७० मध्ये पिंजरा बुरुजापाशी लागलेल्या भयंकर आगीत किल्ल्यावरील अनेक बांधकामे जळून नष्ट झाली. १७८७ मध्ये लागलेल्या दुसर्‍या आगीत आंग्य्राचा वाडा नष्ट झाला. २९ नोव्हेंबर १७२१ रोजी ब्रिटीश व पोर्तुगिजांच्या संयुक्त सैन्याने अलिबागवर ६००० सैनिक व ६ युध्दनौका घेऊन हल्ला केला, पण त्यांचा त्यात सपशेल पराभव झाला.

वैज्ञानिक प्रयोग : दुर्ग बांधणी
शिवाजी महाराजांनी दुर्ग स्थापत्यात अनेक प्रयोग केलेले आहेत. त्यापैकी एक येथे पहावयास मिळतो. हा दुर्ग बांधतांना दगडाचे मोठे मोठे चिरे नुसते एकमेकांवर रचलेले आहेत. दोन दगडांमधील फटीत चुना भरलेला नाही. त्यामुळे समुद्राची लाट किल्ल्याच्या तटाच्या भिंतींवर आपटल्यावर पाणी दगडांमधील फटीत घुसते व लाटेच्या तडाख्याचा जोर कमी होतो.

किल्ल्याला एकूण १७ बुरुज आहेत. चार टोकांना चार, पश्चिमेला ५, पूर्वेला ४, उत्तरेला ३ व दक्षिणेला १ बुरुज असे आहेत. बुरुजांना पिंजरा, नगारखानी, गणेश, सूर्य, हनुमंत, तोफखानी, दारुखानी अशी नावे आहेत. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर, डाव्या बाजूने गेल्यास भवानी मातेचे मंदिर लागते त्याच्या समोरच पद्मावती देवीचे छोटे व गुलवती देवीचे मोठे मंदिर आहे. पुढे गेल्यावर डाव्या हाताला वाडे, पागा, कोठी यांचे अवशेष दिसतात. डावीकडची वाट हजरत हाजी कमाल उद्दीनशहा दरबार ह्यांच्या दर्ग्याकडे जाते. परतीच्या वाटेवर डावीकडे आंग्य्रांच्या वाड्याचे अवशेष दिसतात.

किल्ल्यावर अजुनही लोकांचा राबता असलेले सिध्दीविनायकाचे मंदीर आहे.

गणेशमूर्ती संगमरवरी असून तिची उंची दीडफूट आहे.१७५९ साली राघोजी आंग्रे ह्यांनी सिध्दीविनायकाचे मंदिर बांधले असा उल्लेख आढळतो. मंदिराच्या प्राकारातच उंचवट्यावर उत्तरेस मारुतीचे व दक्षिणेस शंकराचे मंदिर आहे.

मंदिरासमोर चिरेबंदी बांधणीची गोड्या पाण्याची पुष्कर्णी आहे. पुष्कर्णीच्या पुढे तटा पलिकडच्या दरवाजातून बाहेर गेल्यावर स्वच्छ पाण्याची विहीर आहे. या विहिरीला आत उतरायला पायर्‍या आहेत.

दुर्गाच्या दक्षिण टोकाला असणार्‍या दरवाजाला धाकटा दरवाजा / यशवंत दरवाजा / दर्या दरवाजा म्हणतात. या दरवाजावर गणपती, गरुड, मारुती, मगरी, कमळे, वेलबुट्टी यांची नक्षी कोरलेली आहे.

दरवाजालगत कान्होजींची घुमटी व द्वाररक्षक देवतेचा शेंदुर फासलेला दगड आहे. किल्ल्याच्या तटात गोदीचे अवशेष आहेत. तेथे नवीन जहाजे बांधली जात व जूनी दुरुस्त कली जात असत. किल्ल्याच्या तटावर जाण्यासाठी पायर्‍या आहेत.

किल्ल्याच्या उत्तरेला चाके असलेल्या २ तोफा आहेत.

तोफांच्या चाकांजवळ तोफा बनवणार्‍या कंपनीच नाव कोरलेल आहे ‘‘ डाऊसन हार्डी फिल्ड, डाऊ मूट आर्यन वर्क्स, यॉर्कशायर, इंग्लंड ", व वर्ष आहे १८४९. किल्ल्याच्या दक्षिण दरवाजातून सर्जेकोटला जाता येते.
(ट्रेकक्षितीज सौजन्याने )
























































असा हा ऐतिहासिक किल्ला पाहून .....मनात भरून ...डोळ्यात साठवून ...कॅमेरात बंदिस्त करून आम्ही आमच्या परतीच्या वाटेला निघालो .
अलिबाग ते मांडवा बस ने , मांडवा ते गेट वे अपोलो लौंच ने ..रात्रीच्या त्या शांत सागरी लहरीतून ....
आठवणींचे ते क्षण पुन्हा पुन्हा आठवून ...

संकेत य. पाटेकर
१०.०९.२०१२