मंगळवार, १९ नोव्हेंबर, २०१३

'' आमची रायगड वारी''


इंटरनेट माध्यमातून घेतलेला फोटो ..
आषाढी एकादशीला वारकरी जसे तहान भूख विसरून,विठू माउलीच्या नावाचं गजर करत अगदी तल्लीन होवून आपलं देहभान विसरत आपुल्या माउलीच्या दर्शनासाठी ,त्याच्या भेटीसाठी मैलो दूर प्रवास करत पंढरी वारी करतात.
तसेच माझ्या ह्या लाडक्या राजाच्या भेटी साठी , ह्या गड किल्ल्यान वरील पवित्र माती लल्लाटी लाविन्या साठी ,इथली प्रत्येक वास्तू अन चिरयान चिर्यातून घडलेला सारा इतिहास हृदयी सामावून त्यातून प्रेरणा घेऊन इथे नतमस्तक होण्यासाठी ..पाऊल आपुसकच दर शनिवार रविवारी ह्या प्रेरणादायी गड किल्ल्यांकडे वळली जातात .
मनाचा एकच गजर करून ....इथल्या मातीला प्रणाम करून ..
जय भवानी जय शिवाजी ..!!

त्यातल्या त्यात राजगड अन रायगड असेल तर तन मन अगदी शिवमय होवून जातं.
कारण हि तर आम्हला तीर्थक्षेत्र . इथला प्रत्येक चिरा ना चिरा आपल्या राजाची, त्यांच्या शौर्याची , पराक्रमाची , त्यांच्या सदहृदयी मनाची महती सांगतो.
इथल्या एक एक प्रसंगाची आठवण करून देतो. ते सार पाहताना, अनुभवताना मनाची कधी समाधी अवस्था लागते तर कधी तना मनात आत्म्विश्वाचे नवे बळ संचारते.

काल परवाच असंच रायगड वर जाण्याचा पुन्हा योग आला .
तशी हि माझी चौथी खेप , खेप म्हणण्यापेक्षा चौथी वारी ..रायगड ची !
तरी सुद्धा रायगड काही अजून पूर्ण पाहून झालाच नाही .
पण रायगड वर जे अनुभवलं , जे पाहिलं ते '' सुवर्ण क्षण '' कायम स्मरणात राहतील असेच आहे.
(तसं तुम्ही एकाच ठिकाणी कित्येक वाऱ्या केल्या तरीही तुम्हाला प्रत्येकवेळी नवं काही अनुभवयास मिळतंच मिळत .ह्या वेळेसही मला नवं काही पाहायला मिळाल ,अनुभवयास मिळाल . ) 
















इतिहासाचा अमुल्य साठा असणारे , आपल्या गड-किल्यांवर , शिवरायांवर नितांत प्रेम असणारे ,
वयाच्या पंच्यातरीतही गड किल्ले सर सर चढणारे उतरणारे , इतिहास संकलक अप्पा परब ह्यांची योगा योगाने भेट घडली ती रायगड वरच .
त्यांच्या ह्या आगमनाने मात्र इतिहासाची न उलगडलेली अमुल्य पाने आज आमच्या समोर पुनः उलगडू लागली .
राणी महाल पासून , राजवाड्यापर्यंत , टांकसाळ ते भवानीहुडा (देवघर )पर्यंत , राजदरबार ते
नगारखाना ह्यां मध्ये एका बाजूला असलेल्या त्या खडकाच (भूमी पूजनाचा खडक ) नक्की प्रयोजन काय ? इथ पर्यंतचा इतिहास त्या संबंधित कथा नव्यानेच ऐकण्यास मिळाल्या .
ते ऐकताना अंग अंग शहराल . 
पुढे दुपाच्या भोजनाची वेळ झाल्या कारनाने आम्ही आमच्या वाटेस लागलो. आमच्या मुक्कामी पोहचलो .
(जिथे आजची रात्र काढणार होतो ) तिथे थोडी पेट पूजा आटोपून काही वेळाने पुन्हा मार्गीस्थ लागलो . 
ते होळीच्या माळेवरून , बाजारपेठेतून , टकमक च्या दिशेने...


जिथे आज एक फर्मान निघाल होतं. 
आज एकाचा कडेलोट होणार होता , आणि त्या शिक्षेच पात्र ठरलो होतो तो ''मीच'' . (अर्थात हा गंमतीचा भाग ) 
कडेलोट करण्याचमागच कारण मात्र त्या दोन देवींनाच माहिती . 
एक तर गीतू अन स्नेहू , बहुतेक मी प्रवासात किंव्हा काही दिवसांपासून त्यांना थोडा अधिक त्रास दिला असावा 
इतकच . पण त्याची किती मोठी हि शिक्षा ..!!
अर्थात हा गंमतीचा भाग .
पुढे पाउल जशी टकमक टोका कडे सरसावू लागली . 
तसं तसे ह्या राकट कणखर सह्याद्री रांगांनी त्यांच्या नयनरम्य दर्शनाने मन अगदी मंत्रमुग्ध झालं.

एकीकडे दिसणारा कोकण दिवा पुढच्या मोहिमे साठी तयार रहा अस म्हणत मनाशी सांगड घालू पाहत होता . रायगडाच दर्शन इथुन हि किती सुंदर मोहक दिसत ते जरा पाहून घे ? 
ये कधी तरी आपल्या सवंगड्यांना घेऊन इथे हि माझ्या अंगा खांद्यावर ...
मी तुला रायगडच सोनेरी रूपाच दर्शन घडवेन .
आजोबा - नातवाचं जस खेळकर प्रेम असतं . तसं प्रेम ह्या क्षणी मनी दाटून आल होतं .

टकमक टोकावरील घुंगावनारा वारा अजूनही त्या क्षणाची आठवण करून देत होता . 
म्हणत होता बघ त्या दिशेला दिसतंय का ते गाव , छत्री निजामपूर .., हो , हो तेच ते ..छत्री निजामपूर !

''छत्रीचा दांडा सोडू नकोस घट्ट धर '' असे म्हणणारे शिवराय आणि तो वाऱ्याच्या लाटे समवेत हवेत तरंगत असलेला शूर मावळा '' येथूनच हा सारा प्रसंग घडला होता आणि मी त्याला प्रत्यक्ष साक्षी होतो .
कित्येक वर्ष होवूनही हा प्रसंग मी इथे येणारया प्रत्येकाच्या कानी मनी हळूच सांगत असतो . 
त्या प्रसंगाची आठवण करून देत असतो .

निसर्गाच्या अशा प्रत्येक बाबी आपल्या मनाशी काही ना काही गुजगोष्टी करतच असतात . त्यासाठी संवेदनशील मनाची अन निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीत समरस होण्याची सवय जोडावी लागते . मग मनासोबत निसर्र्गाच्या नितांत गप्पा सुरु होतात . मग वारा बोलू लागतो , नदी नाले , डोंगा दर्या , पक्षी पाखरे , वृक्ष वेली , निर्जीव दगड धोंडे हि आपल्याशी गुजगोष्टी करू लागतात .
-------------------------------------------------------------------------
मन अशाच गुजगोष्टीत हरवलं असता . '' चला निघूयात'' अशी आर्त हाक ऐकू आली .
अन पाउलं टकमक टोका कडून ..जगदीश्वराच्या प्रासादलया कडे हळूच वळू लागली .
...जगदंब जगदंब नामस्मरण करत !! 

 
आता सायंकाळचे ५ वाजत आले होते .
सूर्य नारायण हि मावळतीला त्याच्या रोजच्या दिन क्रमानुसार वाटचाल करू लागला होता .
त्याची तांबूस सुवर्ण किरणं मात्र अंगाखांद्यावर अजून लोळण घेत होती .
पाउलं हळूवार टप्प्या टप्याने जगदिश्वरच्या दिशेने ...मार्गीक्रमण करत होती .

पुढे काही मिनिटे अशीच चालत गेल्यावर ,
एका सपाटीवर ,वृक्ष वेलींच्या दाट सावलीखाली ,थकल्या भागल्या लोकांची तृष्णा भागविण्याकरिता एक १०- ११ वर्षाची गोड मुलगी( नाव गीता )
लिंबू पाणी, ताक, कोकम सरबत ह्यांनी भरलेलं भांड कुंड एका टेबलावर जमवून , आमच्या येणाऱ्या चेहऱ्याकडे कटाक्षाने पाहत उभी होती. आम्ही समोर येताच तिच्या गावरान बोलीत,
दादा ताक घेता का ? ताक अस म्हणत ? मनोमन आम्ही ते घ्याव प्यावं अस , नजरेन सांगत होती .

तशी आमची मनं हि तृष्णेने काहीसी व्याकूळ झालेली . त्यामुळे क्षणभर त्या वृक्ष वेलीच्या दाट छायेखाली विसावा घेत आम्ही घट्ट ताकाचे एक दोन पेले गटा गटा पीत आमची तृष्णा भागविली .
अन काही क्षणाच्या विसाव्या नंतर , थोड्या अधिक चढणीचा मार्ग पत्करत , काहीसे अंतर चालत आम्ही जगदिश्वराच्या प्रवेश द्वारातून प्रांगणात प्रवेश करते झालो.

मंदिर म्हटलं कि ते एक पवित्र स्थान . अन त्याला फार महत्वाच स्थान आहे आपल्या जीवनात .
कारण देव देवतांचा तिथे वास्तव्य असतं. आणि अशा जागी ईश्वरी पण एक अदृश्य शक्ती सदा वास करत असते .
अन हिच शक्ती आपल्या तना मनात , नव्या परीने सकारात्मक विचारंच बळ प्राप्त करून... चैतन्याच नव अंकुर  रुजवू लागते. अशा चैतन्यमय वातावरणात मी प्रवेश करता झालो . तन मन अगदि प्रसन्न झालं .
पण पाउल जशी पुढे पुढे सरकू लागली तसं ' मन' पुन्हा इतिहासाकडे वळू लागल .
इतिहासाची अमुल्य पाने पुन्हा उलगडू लागली.

अन भारवलेल्या त्या क्षणाची पुन्हा आठवण झाली. नजरेसमोर सारा क्षण पुन्हा जिवंत झाला .
इथेच ह्या प्रांगणात ...
गडावरील काही मंडळी आपल देहभान विसरून ...
त्या १३ वर्षाच्या त्याच्या पहाडी आवाजानं त्याच्या काव्यान अगदी ध्यान मग्न झाली होती .

एकच आवाज चारी बाजूने दुमदुमत होता .
सेर सिवराज है ! सेर सिवराज है !

मंदिराच्या त्या कच्छ मंडपात तो बालक अर्थात कवी भूषण ''
त्याने रचलेले काही छंद शिवरायांसमोर आपल्या वज्र बोलीत पहाडी आवजात गाउन दाखवत होता .
इंद्र जिमी जम्भ पर बाड्व सुअम्ब पर
रावण सदम्भ पर रघुकुलराज है ||१||
पौन बरिवाह पर | संभु रतिनाह पर |
ज्यो सहसबाह पर | राम द्विजराज है ||२||

दावा द्रुम दंड पर | चिता मृग झुंड पर |
भूषण बितुंड पर | जैसे मृगराज है ||३||
तेजतमअंस पर | कान्ह जिमी कंस पर |
त्यों म्लेंछ बंस पर| सेर सिवराज है ||४||

सेर सिवराज है ! सेर सिवराज है!

ह्या आवाजाने सारा आसमंत दणाणून गेला होता . जो तो तल्लीन झाला होता . त्या भावसमाधीतून बाहेर पडू इच्छित न्हवता. ह्या पंक्ती त्याने तब्बल अठरा वेळा म्हणून दाखवल्या होत्या .
शिवरायांनी त्याला योग्य ती बक्षिशी दिली होती .

हा सारा प्रसंग इथेच घडला होता . आणि त्याचा प्रत्यय, ' आता ह्या क्षणी हि येत होता . जणू हा प्रसंग नजरेसमोर घडतोय घडत आहे . आणि मी त्यास प्रत्यक्ष साक्षी आहे .

छत्रपति शिवराय अन कवी भूषण ह्यांची हि पहिली भेट .
अन हे इतिहास संकलक अप्पा परब ह्यांनी फारच सुंदरतेने वर्णन केल आहे . त्यांच्या पुस्तकात .
ते तुम्ही अवश्य वाचा.

इथे आल्यावर आपली हि भावसमाधी लागते. आपण हि त्या लयात अगदी नाचू डोलू लागतो .
तन मन गाऊ लागत.

सेर शिवराज है ..!!

क्रमश :-
संकेत य पाटेकर
३०.११.२०१३


मंगळवार, २ जुलै, २०१३

आजोबांच्या भेटीस ...... Trek to Ajobagad / Aja Parvat

हिरवे हिरवे गार गालिचे ,
हरित तृणाच्या मखमालीचे ..

पावसाळ्यात कुठे हि ट्रेक ला जा ,सह्याद्रीच्या कड्या कपारयातून फिरा, बालकवीं त्र्यंबक बापूजी ठोंबरे ह्यांच्या ह्या पंक्ती हमखास मुखी नाचू लागतात , आनंदाच्या स्वर लहरी मध्ये .., संगीताचे वलय निर्माण करून ..

हा निसर्ग अगदी भुलवून टाकतो आपल्याला , त्याच्या लावण्यमय सौंदर्याने ..., पण कधी कधी त्याच सौंदर्याला मानवी रूपाच एक डाग लागत . ती खंत मनास वाटू लागते . त्याचच वाईट वाटत खूप.

काल असच आजोबांच्या (आजोबा गड / आजा पर्वत ) भेटीस गेलो होतो ,जाता जाता निसर्गच ते भव्य , मोहक रूप नजरेत सामावून.

रस्त्याच्या दुर्तफा चहु कडे पसरलेली हिरवाई, अधे मध्ये पावसाची ओघळती सर , नद्या ओढ्यांचे , वाहते रूप , त्यातून होणारा खळखळाटी स्वर , नांगर घेऊन , बैलांस जुंपून जमिनीची मशागत करणारा शेतकरी , आणि दूर वरून एका ठिकाणी त्याच्या घराचे दिसणारे कौलारू छत ,
कुठे रस्त्या लगतच असणाऱ्या वसतीगृहातील , लहान मुलाचे, ' वेगळेवेगळे भाव दर्शवणारे निरागस चेहरे, असे अनेकानेक क्षण मनास भावतात , एक वेगळाच अनुभव घेत असतो आपण .

काल हि असाच काहीसा अनुभव आला . पण त्यात एक खंत हि मनी लागली .
कि मानवाने त्याच्या स्वार्था साठी निसर्गावर खूप घाव घातलेत , अजून हि तो घाव देतोयच आहे , त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागणार. हे एक कटू सत्य आहे .

वृक्षतोडी नंतर , जंगलच्या जंगल उध्वस्त केल्यांनतर आता मानव '' डोंगरफोडी कडे'' वळला आहे .
कुठे हि जा , एक दृश्य हमखास दिसतं , ते म्हणजे डोंगराला पडलेली खाच , त्यावर पडलेले मानवी मनाने घडवलेल्या क्रूर यंत्राचे हात .

काही काळा ने हे डोंगर दऱ्या हि नाहीसे होणार कि काय ? अस चित्र डोळ्यसमोर येऊ लागत .
सगळीकडे एक सपाटी दिसू लागते , आणि त्यावर इमारतींचे मजलेच मजलेच रचलेले दिसू लागतात . ,
पुढे कृतीम रित्या तयार केलेली डोंगर दरयांची सजावट पाहण्यास लोकं त्यांच्याच परिसरात जावू लागतील.
असो ..पुढच ते पुढच पण आत्ताच काय ? थांबवू शकणार का आपण हे ?

नजरेने टिपलेल्या क्षणांनी मनाच्या भावना हळूच कधी उचंबळून जातात . त्यात कधी हास्य असते तर कधी खोलवर विचारात मग्न करणारी एक प्रेरक शक्ती .
असो ,

ठाण्याहून पहाटे ५:४४ ची आसनगाव लोकल ने आमच्या दहा जणांचा समूह ठीक ५:५६ ला आसन गाव स्थानकात उतरता झाला . पुढे आसनगाव येथून रिक्षा ने शहापूर कडे . तिथून मग एक टमटम ठरवून थेट देहने गाव .
ह्या वर्षीचा पावसाळ्यातला हा माझा , राजमाची , असावा नंतर चा तिसरा पण माझ्या बहिणी सोबतचा पहिला ट्रेक , त्यामुळे आनंदातच होतो.

देहने गाव पासून , वाल्मिकी आश्रम कडे जाणाऱ्या रस्त्या ला , थोडा चढ चढून , आजोबा गडा कडे असा फलक दर्शविणाऱ्या पाटी जवळ रस्त्याच्या एका कडेला आम्ही गाडी पार्क केली (आमची टम टम ..)

संध्याकाळी ५ च्या आत तुम्ही परतणार ना ? ह्या अटीवर, टमटमचे चालक कैलास हे तयार झाले होते . त्यांना संध्याकाळी समर्थांच्या बैठकीस जायचं होत . आणि ते आम्हास तसं प्रत्येक वेळी बजावून सांगत होते . पण मनाच्या सदहृदयी भावेनेन .

गाडी इथेच लावतो ह , तुम्ही बघा , पाचच्या आधी या, जमलंच तर लवकर या ?
कैलाश ह्यांनी जाता जाता पुन्हा हे वाक्य उच्चारल, आम्ही खात्रीशीर येतो म्हणून सांगितल ,
अन बैलगाडीच्या त्या वाटेने धुक्याच्या राशीत लपलेल्या आजा पर्वताकडे पाहत त्या दिशेला आमची पाउलं पुढे पुढे टाकू लागलो .

आजोबागड
निसर्गसंपन्न अशी वनराई , इथेच वाल्मिकी ऋषि चं वास्तव्य होत . इथेच त्यांनी रामायण हा ग्रंथ लिहिला ,
इथेच सीता मायेन , लव कुश अशा दोन पुत्रांना जन्म दिला . हाच तो आजोबा गड , लव कुश त्यांना आजोबा म्हणत , म्हणून आजोबा गड / आजा पर्वत .



























एक , सव्वा एक तासात आम्ही वाल्मिकी आश्रमात पोहचते झालो.
आणि पोहचताच तिथल्या एका वट वृक्षानी , त्याच्या गोलाकार विस्तीर्ण पसरलेल्या असंख्य पारंब्यांनी लक्ष वेधून घेतलं. .
त्याच्याच शेजारी नव्याने बांधण्यात आलेल्या , धर्मशाळेच, ' आतलं काम हि चालू असल्याच कळल. 
चौकशी केली असता , तिथेच काम करत असलेल्या त्या काकांनी , आतले चालू असलेल काम दाखविले...
इथे बरेच जण येतात , त्यामुळे राहणायचा प्रश्न असतो , त्यामुळे हे बांध काम चालू आहे .

बरेच जणू इथे राहू शकतील . दूर वरून येणारे , ५- १० दिवस इथे राहून मग निघू शकतील .
त्याचं बोलन ऐकल्यावर , मी नि यतीन त्या धर्म शाळेतून बाहेर पडलो ,
फार वेळ इथे न थांबता , थेट सीतेचा पाळणा येथे जावून मग पुन्हा आश्रमात येण्याच आणि मग इथला आजू बाजूचा परिसर पाह्ण्याच निच्छित झालं होत . त्यानुसार फार वेळ न दवडता आम्ही १५ मिनिटात तिथून निघालो , पण जाता जाता जीवाच्या आकांताने ओरडणाऱ्या, केवीळवाण्या,त्या किंकाळीने मन सुन्न झाले होते .

मंदिराच्या थोड्या पुढे, काही अंतरावर एका ठिकाणी शेळीच्या त्या निष्पाप छोट्या पिल्लूचा बळी घेतला जात होता . देवाच्या नावाने, ते किंचाळत होतं, जीवाच्या आकांताने . पण ते किंचाळण काही क्षणाचाच होत .
जीव जाताच ते किंकालन हि त्या शांततेत ते विरून गेल .

मन त्यातच पुढे वाहू लागल .
आश्रमाच्या मागच्या बाजूने , धबधब्याच्य वाटेने पाउलं पटपट पडू लागली . घन दाट जंगलाच ते रूप आणि सोबत पक्षांचे सुरेल स्वरगीत आणि वाहते नितळ , शुभ्र धवल असे धबेधबे पाहण्यात मन एकरूप व्हाऊ लागल .

सव्वा तासाच्या, दगडांच्या त्या राशींवरून ती चढ चढून आम्ही दुपारी १२:३० ला सीतेच्या पाळणा ह्या ठिकाणी , त्या गुहेच्या पायथ्याशी येउन पोहोचलो. 




























एका बाजूला व्ही आकाराची खोल दरी , आणि त्या दरी ला रौद्र तसेच भव्य असे रूप बहाल करणारे धुक्याचे दाट थर 
आणि ओथंबून वाहणाऱ्या पावसाची सर ह्यांच्या एकत्रित मिलनाने तिथलं तेवातावरनच इतकं आल्हादायक झालं होत . काय सांगू .......विचारू नका ...


अर्धा तासाचे ते आनंदी क्षण आणि सीतेचा पाळणा , ती गुहा पाहून , नजरेत सामावून नि स्मृतीत ठेवून आम्ही आश्रमाकडे परतू लागलो .

दुपारी १ च्या सुमारास आम्ही खाली उतरण्यास सुरवात केली आणि २:३० च्या सुमारास आश्रमात दाखल हि झालो . 
मग नव्याने बांधण्यात आलेल्या धर्मशाळेत जेवण वगैरे उरकून आसपासचा परिसर पाहू लागलो .


पावसाची संततधार अजून हि तशी सुरुच होती. खाली येता येता त्या घनदाट जंगलातून पावसाने चांगलेच झोडपले होते , सर्वजण ओलेचिंब झालो होतो. 

त्यातच आम्ही जेवण उरकलं आणि आजूबाजूचा परिसर पाहण्यसाठी बाहेर पडलो.






वाल्मिकी आश्रम कडे जाताना समोरच एक विरगळ , आणि सतीशीला आहेत , ते पाहून त्या संबंधी प्रश्न चिन्ह निर्माण झाले ? हे इथे कसे ? इथे काही लढाई वगैरे घडली आहे का ?
कारण आजोबा गड ह्या विषयीचा इतिहास माझ्या वाचण्यात कुठे आला नाही ?

आजोबा गड म्हणजेच आजा पर्वत , वाल्मिकी ऋषि तसेच सीता माई , लव कुश ह्यांच्या वास्तव्याने पावन झालेलं एक पवित्र स्थान. ह्या व्यक्तीरिक्त अजून तरी मला काही माहित नाही . कुणाला काही माहित असल्यास जरूर सांगावे . हि विनंती .

वाल्मिकीची ऋषि ची समाधी पाहून झाल्यास त्याच्या शेजारीच शिव मंदिर आहे , तिथे काही देव देव देवतेचे शिल्प आहेत , त्यात गणेश मूर्ती , विठ्ठल रखुमाई असे काही देविकाची शिल्प आहेत.
त्याच्या थोडा पुढे अजून एक शिव मंदिर आहे. पण आत पाणी आणि गाळ साचल्यामुळे काही आतील शिल्प अथवा शिव लिंग दिसण्यात येत नाही.

कुठे हि बाहेर गेल्यास वेळेच बंधन हे असतच , ते पाळावच लागतं, मनात असो वा नसो ,
आम्ही हि कैलास ह्यांना ५ ची वेळ दिली असल्यामुळे, साडे तीनच्या आसपास आम्ही पुन्हा परतीच्या मार्गाला लागलो . ते सारे क्षण नजरेत आणि कॅमेरात कैद करून .....

अशा तऱ्हेने आजोबांच्या सहवासात दिवस कसा पटकन निघून गेला ते आमचं आम्हालाच कळल नाही .
असो पुन्हा लवकरच येऊ तुमच्या भेटीला ........आजोबा ..:)

संकेत पाटेकर
०२.०७.२०१३

काही सूचना :-
१) तीन वर्षा पूर्वी पावसाळ्यातच इथे एका मुलीचा , सीतेच्या त्या गुहे जवळ जातना , वर चढत असता त्या खोल दरीत पडून मृत्यू झाला होता . हे मी काही ब्लोग मध्ये वाचल होत . आणि प्रत्यक्ष आज आश्रमातील त्या बाबांकडून हि ऐकल . वर पर्यंत जाणे तसे सोपे आहे , नित्य नेहमी ट्रेकर्स मंडलींना ते काही अवघड नाही. पण जातना जरा जपूनच . कारण पावसाळ्यात तो कातळ ओलसर नि चिकट झाल्याने , घसरण्याची फार शक्यता असते . तेंव्हा पुढचा काय तो विचार करावा आणि मग जावे .

२) आश्रमातून सीतेच्या पाळण्या पर्यंत जाता जाता , त्या घनदाट रानातून , मच्छर नि काही चिमुकली पाखरं खूप त्रास देतात . त्यमुएल जाताना काय ते बदोबस्त करून जावे . ओडोमॉस वगैरे ,वगैरे.

खर्चाचा तपशील :-
थानेहून पहाटे ५:४४ लोकल ट्रेन आसनगाव
तिकीट दर - ३० रुपये (जाउन येउन )

आसनगाव ते शहापूर - रिक्षा
तिकीट दर : १० रुपये प्रत्येकी

शहापूर ते देहाने - टमटम
जाउन येउन दर १५०० सांगतात . तुम्ही १२०० पर्यंत येऊ शकता .



























सोमवार, २४ जून, २०१३

असावा गड :- इतिहास जागवणारे काही गड - किल्ले




किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग, डोंगररांग: पालघर
जिल्हा : ठाणे, श्रेणी :सोपी/मध्यम

बहुतेकांना अपरिचित , पण सुंदरसा ,सुखद अनुभव देणारा ,मुंबई ठाण्याहून एका दिवसात करता येईल असा हा छोटेखानी किल्ला . पावसाळ्यात चहूकडे हिरवाईचा रंग उधळत, आणि धुक्याचे पांढरे ओलसर थर ...
स्वतःवर ओढवून घेत लपून बसतो . 
पण त्या मंत्रमुग्ध वातावरणाने स्वतःचे भान मात्र विसरायला लावतो, हे खर !!

(प्राचीनकाळी शूर्पारक, डहाणू , तारापूर, श्रीस्थानक/ स्थानकीय पत्तन (ठाणे), कालियान (कल्याण) इत्यादी बंदरातून मोठ्या प्रमाणात परदेशांशी व्यापार होत. या बंदरात उतरणारा माल विविध मार्गांनी देशावर जात असे. 
या मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी किल्ले बांधले जात. यापैकीच एक आसावा किल्ला...
 डहाणू व तारापूर बंदरांना देशाशी जोडणार्‍या मार्गांवर प्राचीन काळी बांधण्यात आला. 
( ट्रेकक्षितीज या वेबसाईट वरून घेतलेली माहिती)

ठाणे जिल्ह्यातील बोइसर हे एक महत्वाचे ठिकाण आहे . बोईसर ला उतरून , पुढे पाच दहा मिनिटे रस्त्याने चालत गेल्यास नवापूर येथे वारंगडे साठी दहा आसनी जीप मिळते . 
ती आपल्याला १५-२० मिनटा मध्ये विराज FACTORY च्या आधी आणून सोडते . 
तिथेच विराज FACTORY च्या आधी उजवीकडे वळणाऱ्या डांबरी रस्त्याने गडाकडे जाणारी वाट मिळते .

पुढे पाच- दहा मिनिटे चालत गेल्यास रस्त्याच्या वळणावर एक दुकान लागते .
त्याच्या थोड्या आणिक पुढे एक ओहळ पार करत, आपण मळलेल्या पाय वाटेतून चिखलाच्या थरांचे भार आपल्या पायंवर घेत पुढे जाऊ लागतो. 
आणि काही वेळेतच एका पुलापाशी येउन पोहचतो.  (येथेच थोड्या अंतरावर उजव्या हाताला अजून २ पूल आहेत . )  येथून असावा किल्याचे सुंदर दर्शन होते .
आपले मुख, दाट धुक्याच्या मखमली थराने झाकून घेत, तो जणू नवीन नवरी सारखा डोक्यावर पदर घेत लाजून बसलेला आहे , असे वाटू लागते .

असावा गड डावीकडे ठेवत, उजवीकडील मळलेल्या पायवाटेने एका डोंगराला वळसा घेत, धुक्याच्या पांढर्या दाट पट्ट्यातून, मोकळी वाट असलेल्या गर्द झाडीतून ,गारव्याच्या ओलसर सरी अंगावर घेत, एक दीड तासातच आपण गडाच्या माथ्यावर येउन पोहचतो. 
वर येतानाच तटबंदीची रूप रेखा आपल्यास नजरेस पडते. त्या तट बंदिवरूनच आपला गडावर प्रवेश होतो .

(गडाच्या माथ्यावर कातळात खोदलेली २ टाकी आहेत. किल्ल्याच्या दक्षिण टोकाला प्रचंड मोठे बांधीव टाकं आहे. 
या टाक्याची लांबी ५० फूट ,रूंदी २० फूट व खोली १५ फूट आहे. 
या टाक्याचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या एका बाजूला कातळ आहे व उरलेल्या तीन बाजू घडीव दगडांनी बांधून काढलेल्या आहेत. टाक्याच्या पश्चिमेकडील भिंतीत टाक्यात उतरण्यासाठी पायर्‍या बनवलेल्या आहेत. 

कातळ उतरावरून येणारे पाणी टाक्यात जमा होण्यापूर्वी त्यातील गाळ निघून जावा यासाठी कातळात १ फूट व्यास व 6 इंच खोली असलेले वर्तूळाकार खड्डे कोरलेले आहेत. या टाक्याची भिंत फूटल्याने यात आता पाणी साठत नाही.

हे टाकं पाहून उत्तरेकडे चालत जातांना डाव्या हाताला पश्चिमाभिमुख प्रवेशव्दाराची जागा दिसते. 
प्रवेशव्दार व त्यापुढील देवड्यांचे अवशेष पहायला मिळतात. प्रवेशव्दारातून खाली उतरून गेल्यावर डाव्या बाजूस भिंतीचे अवशेष दिसतात तसेच कातळात खोदलेल्या काही पायर्‍याही पहायला मिळतात.
- ट्रेकक्षितीज या वेबसाईट वरून घेतलेली माहिती )

किल्ल्याचा माथा फार छोटा असल्याने , थोडा वेळ तिथे काढून , थोडी पेटपूजा करून , आपला परतीचा प्रवास सुरु होतो. पण अजूनही आपली गड फेरी काही संपलेली नसते . 
किल्ल्याच्या खालच्या बाजूस कातळात खोदलेली एक-दोन गुहा व टाकं आहे. 
साधारण अर्धा तास चालून गेल्यावर त्या नजरेस पडतात .
त्यासाठी बांधीव टाक्याच्या बाजूने खाली उतरून बारी गावाच्या दिशेला चालावे लागते.

ती गुहा पाहून आपली गड फेरी संपते . पुढे त्या गुहे जवळूनच , गर्द झाडीतून ,झर्याचा खळखलाट ऐकत, पावसाच्या रिमझिम सरी अंगावर झेलत , दगड धोंड्यातून मार्ग काढत , आपल्याच मनाशीच गुणगुणत आपण कधी मामाच्या गावात येउन पोहचतो ते कळतच नाही .
पण मामाच्या गावात पोहोचताच ओठातून ते बालपणीच काव्य हळूच बाहेर पडत आणि त्यावर... 
आपलं ...तन मन सर्व त्या लयात नाचू लागतं.

झुक झुक झुक झुक,
आगीन गाडी,
धुरांच्या रेषा हवेत काढी
पळती झाडे पाहूया,
मामाच्या गावाला जाउया
जाउया मामाच्या गावाला जाउया ......!!
  
मामाच गाव म्हणजे एक RESORT आहे . येथे VALLEY Crossing हि करता येते , असा फलक जाता जाता दिसून येतो .
Picnic साठी म्हणून येथे लोकांच येणं जाणं सतत चालूच असत. पण येथे वरच किल्ला आहे , हे बर्याच लोकांना ठाऊक नसत . अन माहित असलं तरी किल्ले भेटीसाठी सहसा कुणी जात नाही . 

माझ्यासाठी हा खास ट्रेक होता, कारण ह्यापूर्वी कधी हि ट्रेकला न गेलेली , माझी खास गोड मैत्रीण स्नेहू , ह्या ट्रेकला आम्हां सोबत प्रथमच आली होती .ते ही मला न सांगता , न कळविता अचानक, surprise देऊन . त्यामुळे ट्रेकला खरी रंगत आली .
एकंदरीत ट्रेक खूपच मस्त झाला .

संकेत य पाटेकर
२४.०६.२०१३

प्रवास माहिती : आणि खर्च
पहाटे ५:३३ ची डोंबिवली - बोइसर ट्रेन :
तिकीट दर २५ रुपये प्रत्येकी .

ठीक ८:१० ला बोइसर रेल्वे स्थानक
(विरार ला हीच ट्रेन ७ ला पोहचते )

येथेच रेल्वे लगत एक restaurants आहे , तिथे पेट पूजा उरकून
पाच मिनटे रस्त्याने तसंच पुढे गेल्यास

नवापूर येथून वारंगडे साठी जीप मिळते .
प्रत्येकी १० रुपये सीट प्रमाणे .

१५-२० मिनिटा मध्ये मध्ये विराज FACATORY ,
तिथून पुढे चालत गडाचा माथा : १ ते दीड तास ,
गडाचा माथा फार मोठा नसल्याने , आणि इतक्या काही वास्तू नसल्याने गड पाहून लगेच होते .
१ ते दीड तास वर घालवल्यावर , परतीचा प्रवास
गडाच्या पोटात असलेल्या गुहा पाहत .दुसरया वाटेने, दीड -दोन तासात मामाच्या गावात उतरून .
तिथून मग पुढे एखादी जीप पडकून बोइसर ...


काही क्षणचित्रे :-

विराज FACTORY कडून जाणरी वाट...



सुशांत नि स्नेहू ...........

वळणा वरचे दुकान ...

छोटास ओहळ ..पार करत पुढे जाताना

चिखलात माखलेले माझे पाय...

एक सुंदर फोटो..

सुंदर मनमोहक दृश्य ..

विराज factory नि आसपासचा परिसर..

पाय वाटेची एक खून ...मोठा दगड

आम्ही साद सह्याद्री ट्रेकर्स ..

भारं वाहताना , गावातले एक काका