मंगळवार, २ जुलै, २०१३

आजोबांच्या भेटीस ...... Trek to Ajobagad / Aja Parvat

हिरवे हिरवे गार गालिचे ,
हरित तृणाच्या मखमालीचे ..

पावसाळ्यात कुठे हि ट्रेक ला जा ,सह्याद्रीच्या कड्या कपारयातून फिरा, बालकवीं त्र्यंबक बापूजी ठोंबरे ह्यांच्या ह्या पंक्ती हमखास मुखी नाचू लागतात , आनंदाच्या स्वर लहरी मध्ये .., संगीताचे वलय निर्माण करून ..

हा निसर्ग अगदी भुलवून टाकतो आपल्याला , त्याच्या लावण्यमय सौंदर्याने ..., पण कधी कधी त्याच सौंदर्याला मानवी रूपाच एक डाग लागत . ती खंत मनास वाटू लागते . त्याचच वाईट वाटत खूप.

काल असच आजोबांच्या (आजोबा गड / आजा पर्वत ) भेटीस गेलो होतो ,जाता जाता निसर्गच ते भव्य , मोहक रूप नजरेत सामावून.

रस्त्याच्या दुर्तफा चहु कडे पसरलेली हिरवाई, अधे मध्ये पावसाची ओघळती सर , नद्या ओढ्यांचे , वाहते रूप , त्यातून होणारा खळखळाटी स्वर , नांगर घेऊन , बैलांस जुंपून जमिनीची मशागत करणारा शेतकरी , आणि दूर वरून एका ठिकाणी त्याच्या घराचे दिसणारे कौलारू छत ,
कुठे रस्त्या लगतच असणाऱ्या वसतीगृहातील , लहान मुलाचे, ' वेगळेवेगळे भाव दर्शवणारे निरागस चेहरे, असे अनेकानेक क्षण मनास भावतात , एक वेगळाच अनुभव घेत असतो आपण .

काल हि असाच काहीसा अनुभव आला . पण त्यात एक खंत हि मनी लागली .
कि मानवाने त्याच्या स्वार्था साठी निसर्गावर खूप घाव घातलेत , अजून हि तो घाव देतोयच आहे , त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागणार. हे एक कटू सत्य आहे .

वृक्षतोडी नंतर , जंगलच्या जंगल उध्वस्त केल्यांनतर आता मानव '' डोंगरफोडी कडे'' वळला आहे .
कुठे हि जा , एक दृश्य हमखास दिसतं , ते म्हणजे डोंगराला पडलेली खाच , त्यावर पडलेले मानवी मनाने घडवलेल्या क्रूर यंत्राचे हात .

काही काळा ने हे डोंगर दऱ्या हि नाहीसे होणार कि काय ? अस चित्र डोळ्यसमोर येऊ लागत .
सगळीकडे एक सपाटी दिसू लागते , आणि त्यावर इमारतींचे मजलेच मजलेच रचलेले दिसू लागतात . ,
पुढे कृतीम रित्या तयार केलेली डोंगर दरयांची सजावट पाहण्यास लोकं त्यांच्याच परिसरात जावू लागतील.
असो ..पुढच ते पुढच पण आत्ताच काय ? थांबवू शकणार का आपण हे ?

नजरेने टिपलेल्या क्षणांनी मनाच्या भावना हळूच कधी उचंबळून जातात . त्यात कधी हास्य असते तर कधी खोलवर विचारात मग्न करणारी एक प्रेरक शक्ती .
असो ,

ठाण्याहून पहाटे ५:४४ ची आसनगाव लोकल ने आमच्या दहा जणांचा समूह ठीक ५:५६ ला आसन गाव स्थानकात उतरता झाला . पुढे आसनगाव येथून रिक्षा ने शहापूर कडे . तिथून मग एक टमटम ठरवून थेट देहने गाव .
ह्या वर्षीचा पावसाळ्यातला हा माझा , राजमाची , असावा नंतर चा तिसरा पण माझ्या बहिणी सोबतचा पहिला ट्रेक , त्यामुळे आनंदातच होतो.

देहने गाव पासून , वाल्मिकी आश्रम कडे जाणाऱ्या रस्त्या ला , थोडा चढ चढून , आजोबा गडा कडे असा फलक दर्शविणाऱ्या पाटी जवळ रस्त्याच्या एका कडेला आम्ही गाडी पार्क केली (आमची टम टम ..)

संध्याकाळी ५ च्या आत तुम्ही परतणार ना ? ह्या अटीवर, टमटमचे चालक कैलास हे तयार झाले होते . त्यांना संध्याकाळी समर्थांच्या बैठकीस जायचं होत . आणि ते आम्हास तसं प्रत्येक वेळी बजावून सांगत होते . पण मनाच्या सदहृदयी भावेनेन .

गाडी इथेच लावतो ह , तुम्ही बघा , पाचच्या आधी या, जमलंच तर लवकर या ?
कैलाश ह्यांनी जाता जाता पुन्हा हे वाक्य उच्चारल, आम्ही खात्रीशीर येतो म्हणून सांगितल ,
अन बैलगाडीच्या त्या वाटेने धुक्याच्या राशीत लपलेल्या आजा पर्वताकडे पाहत त्या दिशेला आमची पाउलं पुढे पुढे टाकू लागलो .

आजोबागड
निसर्गसंपन्न अशी वनराई , इथेच वाल्मिकी ऋषि चं वास्तव्य होत . इथेच त्यांनी रामायण हा ग्रंथ लिहिला ,
इथेच सीता मायेन , लव कुश अशा दोन पुत्रांना जन्म दिला . हाच तो आजोबा गड , लव कुश त्यांना आजोबा म्हणत , म्हणून आजोबा गड / आजा पर्वत .



























एक , सव्वा एक तासात आम्ही वाल्मिकी आश्रमात पोहचते झालो.
आणि पोहचताच तिथल्या एका वट वृक्षानी , त्याच्या गोलाकार विस्तीर्ण पसरलेल्या असंख्य पारंब्यांनी लक्ष वेधून घेतलं. .
त्याच्याच शेजारी नव्याने बांधण्यात आलेल्या , धर्मशाळेच, ' आतलं काम हि चालू असल्याच कळल. 
चौकशी केली असता , तिथेच काम करत असलेल्या त्या काकांनी , आतले चालू असलेल काम दाखविले...
इथे बरेच जण येतात , त्यामुळे राहणायचा प्रश्न असतो , त्यामुळे हे बांध काम चालू आहे .

बरेच जणू इथे राहू शकतील . दूर वरून येणारे , ५- १० दिवस इथे राहून मग निघू शकतील .
त्याचं बोलन ऐकल्यावर , मी नि यतीन त्या धर्म शाळेतून बाहेर पडलो ,
फार वेळ इथे न थांबता , थेट सीतेचा पाळणा येथे जावून मग पुन्हा आश्रमात येण्याच आणि मग इथला आजू बाजूचा परिसर पाह्ण्याच निच्छित झालं होत . त्यानुसार फार वेळ न दवडता आम्ही १५ मिनिटात तिथून निघालो , पण जाता जाता जीवाच्या आकांताने ओरडणाऱ्या, केवीळवाण्या,त्या किंकाळीने मन सुन्न झाले होते .

मंदिराच्या थोड्या पुढे, काही अंतरावर एका ठिकाणी शेळीच्या त्या निष्पाप छोट्या पिल्लूचा बळी घेतला जात होता . देवाच्या नावाने, ते किंचाळत होतं, जीवाच्या आकांताने . पण ते किंचाळण काही क्षणाचाच होत .
जीव जाताच ते किंकालन हि त्या शांततेत ते विरून गेल .

मन त्यातच पुढे वाहू लागल .
आश्रमाच्या मागच्या बाजूने , धबधब्याच्य वाटेने पाउलं पटपट पडू लागली . घन दाट जंगलाच ते रूप आणि सोबत पक्षांचे सुरेल स्वरगीत आणि वाहते नितळ , शुभ्र धवल असे धबेधबे पाहण्यात मन एकरूप व्हाऊ लागल .

सव्वा तासाच्या, दगडांच्या त्या राशींवरून ती चढ चढून आम्ही दुपारी १२:३० ला सीतेच्या पाळणा ह्या ठिकाणी , त्या गुहेच्या पायथ्याशी येउन पोहोचलो. 




























एका बाजूला व्ही आकाराची खोल दरी , आणि त्या दरी ला रौद्र तसेच भव्य असे रूप बहाल करणारे धुक्याचे दाट थर 
आणि ओथंबून वाहणाऱ्या पावसाची सर ह्यांच्या एकत्रित मिलनाने तिथलं तेवातावरनच इतकं आल्हादायक झालं होत . काय सांगू .......विचारू नका ...


अर्धा तासाचे ते आनंदी क्षण आणि सीतेचा पाळणा , ती गुहा पाहून , नजरेत सामावून नि स्मृतीत ठेवून आम्ही आश्रमाकडे परतू लागलो .

दुपारी १ च्या सुमारास आम्ही खाली उतरण्यास सुरवात केली आणि २:३० च्या सुमारास आश्रमात दाखल हि झालो . 
मग नव्याने बांधण्यात आलेल्या धर्मशाळेत जेवण वगैरे उरकून आसपासचा परिसर पाहू लागलो .


पावसाची संततधार अजून हि तशी सुरुच होती. खाली येता येता त्या घनदाट जंगलातून पावसाने चांगलेच झोडपले होते , सर्वजण ओलेचिंब झालो होतो. 

त्यातच आम्ही जेवण उरकलं आणि आजूबाजूचा परिसर पाहण्यसाठी बाहेर पडलो.






वाल्मिकी आश्रम कडे जाताना समोरच एक विरगळ , आणि सतीशीला आहेत , ते पाहून त्या संबंधी प्रश्न चिन्ह निर्माण झाले ? हे इथे कसे ? इथे काही लढाई वगैरे घडली आहे का ?
कारण आजोबा गड ह्या विषयीचा इतिहास माझ्या वाचण्यात कुठे आला नाही ?

आजोबा गड म्हणजेच आजा पर्वत , वाल्मिकी ऋषि तसेच सीता माई , लव कुश ह्यांच्या वास्तव्याने पावन झालेलं एक पवित्र स्थान. ह्या व्यक्तीरिक्त अजून तरी मला काही माहित नाही . कुणाला काही माहित असल्यास जरूर सांगावे . हि विनंती .

वाल्मिकीची ऋषि ची समाधी पाहून झाल्यास त्याच्या शेजारीच शिव मंदिर आहे , तिथे काही देव देव देवतेचे शिल्प आहेत , त्यात गणेश मूर्ती , विठ्ठल रखुमाई असे काही देविकाची शिल्प आहेत.
त्याच्या थोडा पुढे अजून एक शिव मंदिर आहे. पण आत पाणी आणि गाळ साचल्यामुळे काही आतील शिल्प अथवा शिव लिंग दिसण्यात येत नाही.

कुठे हि बाहेर गेल्यास वेळेच बंधन हे असतच , ते पाळावच लागतं, मनात असो वा नसो ,
आम्ही हि कैलास ह्यांना ५ ची वेळ दिली असल्यामुळे, साडे तीनच्या आसपास आम्ही पुन्हा परतीच्या मार्गाला लागलो . ते सारे क्षण नजरेत आणि कॅमेरात कैद करून .....

अशा तऱ्हेने आजोबांच्या सहवासात दिवस कसा पटकन निघून गेला ते आमचं आम्हालाच कळल नाही .
असो पुन्हा लवकरच येऊ तुमच्या भेटीला ........आजोबा ..:)

संकेत पाटेकर
०२.०७.२०१३

काही सूचना :-
१) तीन वर्षा पूर्वी पावसाळ्यातच इथे एका मुलीचा , सीतेच्या त्या गुहे जवळ जातना , वर चढत असता त्या खोल दरीत पडून मृत्यू झाला होता . हे मी काही ब्लोग मध्ये वाचल होत . आणि प्रत्यक्ष आज आश्रमातील त्या बाबांकडून हि ऐकल . वर पर्यंत जाणे तसे सोपे आहे , नित्य नेहमी ट्रेकर्स मंडलींना ते काही अवघड नाही. पण जातना जरा जपूनच . कारण पावसाळ्यात तो कातळ ओलसर नि चिकट झाल्याने , घसरण्याची फार शक्यता असते . तेंव्हा पुढचा काय तो विचार करावा आणि मग जावे .

२) आश्रमातून सीतेच्या पाळण्या पर्यंत जाता जाता , त्या घनदाट रानातून , मच्छर नि काही चिमुकली पाखरं खूप त्रास देतात . त्यमुएल जाताना काय ते बदोबस्त करून जावे . ओडोमॉस वगैरे ,वगैरे.

खर्चाचा तपशील :-
थानेहून पहाटे ५:४४ लोकल ट्रेन आसनगाव
तिकीट दर - ३० रुपये (जाउन येउन )

आसनगाव ते शहापूर - रिक्षा
तिकीट दर : १० रुपये प्रत्येकी

शहापूर ते देहाने - टमटम
जाउन येउन दर १५०० सांगतात . तुम्ही १२०० पर्यंत येऊ शकता .



























सोमवार, २४ जून, २०१३

असावा गड :- इतिहास जागवणारे काही गड - किल्ले




किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग, डोंगररांग: पालघर
जिल्हा : ठाणे, श्रेणी :सोपी/मध्यम

बहुतेकांना अपरिचित , पण सुंदरसा ,सुखद अनुभव देणारा ,मुंबई ठाण्याहून एका दिवसात करता येईल असा हा छोटेखानी किल्ला . पावसाळ्यात चहूकडे हिरवाईचा रंग उधळत, आणि धुक्याचे पांढरे ओलसर थर ...
स्वतःवर ओढवून घेत लपून बसतो . 
पण त्या मंत्रमुग्ध वातावरणाने स्वतःचे भान मात्र विसरायला लावतो, हे खर !!

(प्राचीनकाळी शूर्पारक, डहाणू , तारापूर, श्रीस्थानक/ स्थानकीय पत्तन (ठाणे), कालियान (कल्याण) इत्यादी बंदरातून मोठ्या प्रमाणात परदेशांशी व्यापार होत. या बंदरात उतरणारा माल विविध मार्गांनी देशावर जात असे. 
या मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी किल्ले बांधले जात. यापैकीच एक आसावा किल्ला...
 डहाणू व तारापूर बंदरांना देशाशी जोडणार्‍या मार्गांवर प्राचीन काळी बांधण्यात आला. 
( ट्रेकक्षितीज या वेबसाईट वरून घेतलेली माहिती)

ठाणे जिल्ह्यातील बोइसर हे एक महत्वाचे ठिकाण आहे . बोईसर ला उतरून , पुढे पाच दहा मिनिटे रस्त्याने चालत गेल्यास नवापूर येथे वारंगडे साठी दहा आसनी जीप मिळते . 
ती आपल्याला १५-२० मिनटा मध्ये विराज FACTORY च्या आधी आणून सोडते . 
तिथेच विराज FACTORY च्या आधी उजवीकडे वळणाऱ्या डांबरी रस्त्याने गडाकडे जाणारी वाट मिळते .

पुढे पाच- दहा मिनिटे चालत गेल्यास रस्त्याच्या वळणावर एक दुकान लागते .
त्याच्या थोड्या आणिक पुढे एक ओहळ पार करत, आपण मळलेल्या पाय वाटेतून चिखलाच्या थरांचे भार आपल्या पायंवर घेत पुढे जाऊ लागतो. 
आणि काही वेळेतच एका पुलापाशी येउन पोहचतो.  (येथेच थोड्या अंतरावर उजव्या हाताला अजून २ पूल आहेत . )  येथून असावा किल्याचे सुंदर दर्शन होते .
आपले मुख, दाट धुक्याच्या मखमली थराने झाकून घेत, तो जणू नवीन नवरी सारखा डोक्यावर पदर घेत लाजून बसलेला आहे , असे वाटू लागते .

असावा गड डावीकडे ठेवत, उजवीकडील मळलेल्या पायवाटेने एका डोंगराला वळसा घेत, धुक्याच्या पांढर्या दाट पट्ट्यातून, मोकळी वाट असलेल्या गर्द झाडीतून ,गारव्याच्या ओलसर सरी अंगावर घेत, एक दीड तासातच आपण गडाच्या माथ्यावर येउन पोहचतो. 
वर येतानाच तटबंदीची रूप रेखा आपल्यास नजरेस पडते. त्या तट बंदिवरूनच आपला गडावर प्रवेश होतो .

(गडाच्या माथ्यावर कातळात खोदलेली २ टाकी आहेत. किल्ल्याच्या दक्षिण टोकाला प्रचंड मोठे बांधीव टाकं आहे. 
या टाक्याची लांबी ५० फूट ,रूंदी २० फूट व खोली १५ फूट आहे. 
या टाक्याचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या एका बाजूला कातळ आहे व उरलेल्या तीन बाजू घडीव दगडांनी बांधून काढलेल्या आहेत. टाक्याच्या पश्चिमेकडील भिंतीत टाक्यात उतरण्यासाठी पायर्‍या बनवलेल्या आहेत. 

कातळ उतरावरून येणारे पाणी टाक्यात जमा होण्यापूर्वी त्यातील गाळ निघून जावा यासाठी कातळात १ फूट व्यास व 6 इंच खोली असलेले वर्तूळाकार खड्डे कोरलेले आहेत. या टाक्याची भिंत फूटल्याने यात आता पाणी साठत नाही.

हे टाकं पाहून उत्तरेकडे चालत जातांना डाव्या हाताला पश्चिमाभिमुख प्रवेशव्दाराची जागा दिसते. 
प्रवेशव्दार व त्यापुढील देवड्यांचे अवशेष पहायला मिळतात. प्रवेशव्दारातून खाली उतरून गेल्यावर डाव्या बाजूस भिंतीचे अवशेष दिसतात तसेच कातळात खोदलेल्या काही पायर्‍याही पहायला मिळतात.
- ट्रेकक्षितीज या वेबसाईट वरून घेतलेली माहिती )

किल्ल्याचा माथा फार छोटा असल्याने , थोडा वेळ तिथे काढून , थोडी पेटपूजा करून , आपला परतीचा प्रवास सुरु होतो. पण अजूनही आपली गड फेरी काही संपलेली नसते . 
किल्ल्याच्या खालच्या बाजूस कातळात खोदलेली एक-दोन गुहा व टाकं आहे. 
साधारण अर्धा तास चालून गेल्यावर त्या नजरेस पडतात .
त्यासाठी बांधीव टाक्याच्या बाजूने खाली उतरून बारी गावाच्या दिशेला चालावे लागते.

ती गुहा पाहून आपली गड फेरी संपते . पुढे त्या गुहे जवळूनच , गर्द झाडीतून ,झर्याचा खळखलाट ऐकत, पावसाच्या रिमझिम सरी अंगावर झेलत , दगड धोंड्यातून मार्ग काढत , आपल्याच मनाशीच गुणगुणत आपण कधी मामाच्या गावात येउन पोहचतो ते कळतच नाही .
पण मामाच्या गावात पोहोचताच ओठातून ते बालपणीच काव्य हळूच बाहेर पडत आणि त्यावर... 
आपलं ...तन मन सर्व त्या लयात नाचू लागतं.

झुक झुक झुक झुक,
आगीन गाडी,
धुरांच्या रेषा हवेत काढी
पळती झाडे पाहूया,
मामाच्या गावाला जाउया
जाउया मामाच्या गावाला जाउया ......!!
  
मामाच गाव म्हणजे एक RESORT आहे . येथे VALLEY Crossing हि करता येते , असा फलक जाता जाता दिसून येतो .
Picnic साठी म्हणून येथे लोकांच येणं जाणं सतत चालूच असत. पण येथे वरच किल्ला आहे , हे बर्याच लोकांना ठाऊक नसत . अन माहित असलं तरी किल्ले भेटीसाठी सहसा कुणी जात नाही . 

माझ्यासाठी हा खास ट्रेक होता, कारण ह्यापूर्वी कधी हि ट्रेकला न गेलेली , माझी खास गोड मैत्रीण स्नेहू , ह्या ट्रेकला आम्हां सोबत प्रथमच आली होती .ते ही मला न सांगता , न कळविता अचानक, surprise देऊन . त्यामुळे ट्रेकला खरी रंगत आली .
एकंदरीत ट्रेक खूपच मस्त झाला .

संकेत य पाटेकर
२४.०६.२०१३

प्रवास माहिती : आणि खर्च
पहाटे ५:३३ ची डोंबिवली - बोइसर ट्रेन :
तिकीट दर २५ रुपये प्रत्येकी .

ठीक ८:१० ला बोइसर रेल्वे स्थानक
(विरार ला हीच ट्रेन ७ ला पोहचते )

येथेच रेल्वे लगत एक restaurants आहे , तिथे पेट पूजा उरकून
पाच मिनटे रस्त्याने तसंच पुढे गेल्यास

नवापूर येथून वारंगडे साठी जीप मिळते .
प्रत्येकी १० रुपये सीट प्रमाणे .

१५-२० मिनिटा मध्ये मध्ये विराज FACATORY ,
तिथून पुढे चालत गडाचा माथा : १ ते दीड तास ,
गडाचा माथा फार मोठा नसल्याने , आणि इतक्या काही वास्तू नसल्याने गड पाहून लगेच होते .
१ ते दीड तास वर घालवल्यावर , परतीचा प्रवास
गडाच्या पोटात असलेल्या गुहा पाहत .दुसरया वाटेने, दीड -दोन तासात मामाच्या गावात उतरून .
तिथून मग पुढे एखादी जीप पडकून बोइसर ...


काही क्षणचित्रे :-

विराज FACTORY कडून जाणरी वाट...



सुशांत नि स्नेहू ...........

वळणा वरचे दुकान ...

छोटास ओहळ ..पार करत पुढे जाताना

चिखलात माखलेले माझे पाय...

एक सुंदर फोटो..

सुंदर मनमोहक दृश्य ..

विराज factory नि आसपासचा परिसर..

पाय वाटेची एक खून ...मोठा दगड

आम्ही साद सह्याद्री ट्रेकर्स ..

भारं वाहताना , गावातले एक काका
























मंगळवार, ११ जून, २०१३

काजव्यांच्या राशीतून ..........लुकलुकता राजमाची !!


काजव्यांच्या राशीतून ..........

तुम्ही म्हणालं राजमाची अन काजव्याच्या राशीतून '' , हि काय भानगड आहे. राजमाची किल्ल्याशी त्याचा काय संबंध  ? त्याच साधं सरळ अस उत्तर आहे.

लोणावल्याहुन हून जर तुम्ही तुंगार्ली मार्गे राजमाची करण्याचा विचार करत असाल अन न ते हि रात्रीच्या दाट अंधुक काळोखात, पावसाच्या अगदी रिमझिम ओसरत्या सरित , ' तर तुम्हाला काजव्यांच्या नैसर्गिक स्वयंमचलित प्रकाशाचे लुक लुकणारे, मन मोहून टाकणारे अनेक तारे जागोजागी झाडांवर पाहायला मिळतात. 
त्याने मनात अनेक आनंद तवंग उठू लागतात.

निसर्ग तसां अद्भुत अन रहस्यमयच आहे . निसर्गाची अनेक चमत्कारिक रूप , निसर्गाची गट्टी जमाविल्यास नक्की पाहता येतात . अन ते समजून घेता येतात .

रात्रीच्या दाट काळोखातून जाताना आम्ही ते अनुभवलं. 
तसं काजवा हा प्रकार मी काही पहिल्यांदाच पाहत न्हवतो. पण काजव्यांच्या राशीच राशी , पाउला पाउलन्वर..
झाडांवर आंनद नृत्य करताना मी पाहिले न्हवते.  त्याचं ते लुकलुकनार प्रकाशमय नाच , मनाला अजून चकाकी देत होता .येणारया पुढच्या वाटे मधला अंधार जणू नाहीसा करत होता .

रात्री पावणे दोनच्या आसपास आमच्या सात जणांचा समूह लोणावळा स्थानकात दाखल झाला .
आणि पुढे काही वेळ पोट पूजा करत पावणे तीनच्या आसपास लोणावळा एसटी डेपो येथून तुंगार्ली मार्गे मार्गीक्रमण झाला , चालता चालता बोलता बोलता ट्रेक ला अखेर सुरवात झाली .
पण त्याआधी काही मजेशीर प्रसंग घडले ,ते असे कि ,

आम्हाला प्रवास करायचा होता तो सिद्धेश्वर एक्स्प्रेसच्या च्या साधारण(General ) डब्यातून (त्याप्रमाणे तिकिटे काढली होती ) , पण सीएसटी वरून येणारे तिघेजण आले ते बिनधास्तपणे आरक्षित डब्यातून , त्यामुळे आम्ही हि तिघे ठाण्यात सिद्धेश्वर एक्स्प्रेस दाखल होताच आरक्षित डब्यात जावून बसलो जिथे सीएसटी वरून येणारे मित्र भेटले..

त्यांनतर पाच एक मिनिटे झाली असतील नसतील तोच तिकीट चेकर डब्यात प्रवेश करता झाला .
आणि प्रश्न करू लागला.
Staff है क्या ? Staff ?
'TC 'ची नि आम्हा सर्वांच्या नजरा आमच्यातल्या त्या अंबरीशकडे वळल्या . 
एकटक सर्वजण त्याकडेच पाहू लागले .

अंबरीश हि काही बोलेनसा झाला टीसीला पाहून ? टीसी चे मुखशब्द मात्र स्वरात चालूच होते
Staff है क्या ? Staff ?
काही क्षणाने अंबरीश ने हाताचा पंजा उचलत मूकशब्दाने होकारार्थी उत्तर दिले
.ते पाहून टीसी ने पुन्हा एक प्रश्न उपस्थित केला ?
कोनसे Deparments से ?

आता अंबरीश मात्र मनातून गोंधळाला नि सरळ नाही म्हटले ?
तेंव्हा टीसी ची मस्तकी आग तळपायात गेली .

कबसे बोल रहा हुं Staff है क्या Staff ? असे त्याचे गडगडणारे शब्द धो धो गतीने बरसू लागले. 
आम्ही मात्र हळूच मग पाठ पिशवी घेत मुकाट्याने ट्रेन मधून त्या डब्यातून खाली उतरलो. 
नि Genral डब्यातून कसे बसे करत कल्याण गाठले नि पुन्हा एका टीसीशी गोड धोड बोलून आरक्षित डब्यातून लोणावळ्याला दाखल झालो . अशी हि गंमत ..

रात्रीच्या शांत वातारणात पावसाच्या सरीने न्हाहून निघालेल्या काळ्याभोर नितळ स्वछ ,डांबरी रस्त्यातून तुंगार्ली मार्गे आमचा प्रवास सुरु होता . एक एक पाउलं पुढे पडत होती . मन ...एकेका पाउलान सोबत मनोमन नाचत बागडत होतं .

राजमाची पहिल्यांदाच करत असल्याने त्याचं कुतूहल नि किल्ले भेटीची ची ओढ मनास सतत प्रसन्नता निर्माण करत होती. त्यात रात्रीच ते वातारवण किती अलाहादायक होत . मन फ्रेश असल्याने पाउलं देखील पटपट पडत होती . 
काही वेळेत एक उड्डाण पूल ओलांडून आम्ही उप्पर डेक्क resort च्या फलकां इथे पोचलो . इथून काही अंतर मागे डांबरी रस्त्याची सीमारेषा संपूष्टात आली होती .

आता पुढचा रस्तामार्ग ...दुर्तफा दाट गर्द झाडींनी अन पावलान खालच्या दगड धोंडांनी , ओलसर लाल मातीनी  युक्त असा नटलेला होता . त्यात चालता चालता रात्रीच्या च्या अंधार्या काळोखात काजव्यांचा दिव्य प्रकाश मनाला उजळून टाकत होता. जणू दिव्य रोशानाईत आमचं जंगी स्वागत सुरु होत .

काही वेळाने , वळणा वळणाचा तो बराच अंतर पायी पार केल्यावर , काजव्यांच ते दिव्य स्वरूप कॅमेरा मध्ये टिपून घेण्यासाठी... काही वेळ आम्ही थांबलो .  
हे काही वेळ म्हणजे जवळ जवळ ३० ते ४० मिनिटे हं  ..!
माझ्या साध्याश्या  डिजिटल  कॅमेरा मधून ...ते क्षण टिपण्याचा मी फार प्रयत्न केला.  पण सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले. 

मितालीने मात्र तिच्या SLR मधून , बराच वेळ ट्रायपॉड वर कॅमेराच अंग इकडून तिकडे मोडवीत त्याची तीक्ष्ण नजर, त्या काजाव्यांकडे वळविण्याचा प्रयत्न केला. त्यात ती सफल हि झाली असेल म्हणा .
पण एकंदरीत त्या वेळच ते वातावरण खरच खूप सही होतं . 

''निसर्गाला पडलेले सुंदर स्वप्न'' हे काही दिवसा अगोदर गीतू ने म्हटलेलं वाक्य मनाभोवती घिरट्या घेत होत. स्वप्नाच्या रंगीत दुनियेत मन न्हावून निघत होतं .

त्यातच पुढे अधिक वेळ न दवडता , साधारण ४ :३० च्या सुमारास आम्ही पुन्हा चालू लागलो . 
वळणा वर वळण घेऊ लागलो. काही ठिकाणी चिखल इतका साचला होता कि त्यात आमच्या शूज , फ्लोटर्स वजनदार झाले होते . त्यामुळे एकेक पाउलं वर उचलताना चिकटलेल्या त्या चीखलेचा भार पायंना जाणवत होता.

साधारण बराच अंतर पार केल्यावर , पहाटेच दृश्य हळू हळू उजेडात येत होतं.
माणसांच्या आवाजा इतका तंतोतंत मिळणारा एका पक्षाने (कस्तुर पक्षाने घातलेला तो शिळ मनास संगीतमय तालावर नाचवू पाहत होता . पुढे पुढे अनेकानेक पक्षीय संगीतमय स्वर , मनास भिडू लागले .

पहाट झाली . रिमझिम पाउस सरी अलगद अंग खांद्यावर बरसू लागल्या . अन निघून हि गेल्या .

रात्री पाउने तीन ला सुरु केलेली पायपीट थोडा वेळ विश्रांती साठी थांबली . 
रस्त्याला पाठ टेकवून वर नभाकडे पाहताना मनास किती प्रसन्नता वाटत होती. 
पायांना हि थोडी विश्रांती मिळत होती .

पाच दहा मिनिटे गेल्यावर , जांभलीच्या रानातून पुढे वाट निघालेली , त्या वाटे मधून आम्ही चालू लागलो . 
अस करत करत आम्ही गावाच्या वेशीवर असलेल्या गणेश मंदिरात मुक्काम ठोकला. 
तो जवळ जवळ १ तास भर. तिथेच मग न्ह्याहारी झाली . अन डोळ्या वरची थोडी झोप हि पूर्ण झाली .

अधिक उशीर होऊन नये म्हणून पुन्हा पायपीट चालू केली .
मंदिराच्या उजव्या अंगाला रस्त्याला लागूनच तटबंदीचे काही अवशेष दिसत होते .
ते मागे सरत , पुढे श्रीवर्धन किल्याला वळसा घालत नि मनरंजन श्रीवर्धन ह्यांची एकत्र जोडीगोळी पाहत आम्ही उधेवाडीत प्रवेश करते झालो .

- क्रमश :
पुढील भाग लवकरच ..........

संकेत य पाटेकर
११.०६.२०१३


मंगळवार, २९ जानेवारी, २०१३

राजगड - शोध सह्याद्रीतून ....२६/२७- २०१३


राजगड - शोध सह्याद्रीतून ....



















किती शांत वातावरण होतं. तरीही अधून-मधून वाऱ्याची गार झुळूक अंगावर येत. जणू ती वारेगुलाबी थंडी एकटक खेळत,गुणगुणत स्व:तहाशीच ...

तिने आपले बाहू सर्वत्र पसरले होते ,संपूर्ण राजगड परिसर तिने आपल्या अखत्यारीत आणले होते , तिच्या मगरमिठीतून कुणाचीच सुटका होत न्हवती , गारठलेली ती पाने फुले हि , 'सूर्य नारायणाच्या दर्शनास जणू  आतुरली होती , त्याकडून मिळनाऱ्या कोमलतेच्या उबेसाठी ...

 पण अजून तसा बराच अवधी होता.
राजगडचं रूपं काळोखात हि कस लक्ख उठून दिसत होतं , शेवटी स्वराज्याची ती राजधानी,  आपल्या शिवबाजी , इथल्या रयतेची राजधानी, जिथे आपल्या राजाचं २५ वर्ष वास्तव्य होतं.
जिथे अनेक सुख दुखाचे प्रसंग स्व:तहा ह्या किल्ल्याने पहिले , इथल्या मातीने अनुभवले , इथली प्रत्येक वास्तू त्याची साक्ष देत आजही , अजूनही खंबीरपणे उभी आहे , ते पाहूनच उर भरून येतो , कुतूहल जागं होतं , अभिमान वाटू लागतो , खरच भाग्यवान आहोत आपण इथल्या मातीत आपला जन्म झाला.
हे सर्व अनुभवत होतो मी राजगडवर ,तिथल्या मातीत..

तन-मन हरवलं होतं राजगडचं रूप न्ह्याहाळत , स्व:ताहाशीच कुजबुज करत होतं ते , तेवढ्यात माझ्या वहिनीचा मंजुळ स्वर कानी पडला , डोक्यापर्यंत घेतलेली चादर अलगद उचलून बाजूला सारून पाहिली नि तोच घड्यालाकडे लक्ष गेलं , सकाळचे साडे सात होत आले होते.
पुन्हा एकवार घड्याळाकडे पाहू लागलो , डोळे चूळबळू लागलो . तेंव्हा आपण कुठे आहोत ह्याची जाणीव झाली.
अजूनही राजगडाची ती सोनेरी क्षणे मनातून नि नजरेतून हलत न्हवती. रात्री उशिरा घरी परतलो होतो नि जेवून-खाऊन तसाच झोपी गेलो होतो, राजगड वर घालवलेले ते सर्व क्षण आठवतं ...

मागच्याच वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राजगडला जाऊन आलो होतो.
त्या आठवणी ताज्या असतानाच पुन्हा राजगडला जाण्याचा योग आला... तो रश्मीमुळे, ..
तिच्या ''शोध सह्याद्री '' ह्या तिने स्थापिलेल्या अन ''छत्रपती शिवाजी महाराज '' ह्यांच्या जयंती वेळी सुरु केलेल्या छोट्याश्या पण महत्वाची कामगिरी त्यातून बजावणार्या ग्रुप मुळे .

खास , येणारया पिढीसाठी - शाळेतल्या मुलांमध्ये आपला हा गौरवशाली 'गड - कोट - किल्ले' ह्यांचा इतिहास , त्यांच्या मना मनात रुजवावं , किल्ल्याचं महत्व पटावं , त्यातून मिळणार्या प्रेरणेतून , त्यांच स्वतःच उज्ज्वल भविष्य घडावं हा ह्या '' शोध सह्याद्रीचा'' मुख्य उद्देश ...
आणि म्हणूनच माझं जाणही तितकंच निश्चित होतं .


























त्या निरागस लहान मुलांमध्ये मिसळणं , त्यांच्याशी संवाद साधणं  , त्यांच्या निरागस प्रश्नांना उत्तर देणं ' त्यांना आपला हा गौरवशाली गड-कोट-किल्ल्यांचा इतिहास समजावून सांगणं, ' हे मला अनुभावायचं होतं.
आणि ते सगळ पूर्ण झालं ,  ''शोध सह्याद्रीचे '' २ दिवसाच्या आखलेल्या ह्या राजगड मोहिमेत ...
त्याबद्दल मनापासून धन्यवाद आपल्या सर्व टीम ला ...

राजगड ट्रेक दरम्यान माझ्या मनावर आपला छाप उमटवून गेलेले काही क्षणांचे मी इथे वर्णन करणार आहे :-
१) वर दिल्या प्रमाणे लहान मुलांमध्ये मिसळणं खरच खूप वेगळा आनंद असतो, त्याचं ते निरागस मन आपल्याला आपल्या बालपणीच्या आठवणीत नकळत घेऊन जातं.
त्यांच्याशी संवाद साधताना ,त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांना कळेल अशा भाषेत समजावून सांगणं खरच खूप कठीण असतं ,प्रत्येकाला ते जमतच अस नाही...

ट्रेक दरम्यान अशी अनेक निरागस प्रश्न कानावर पडली. त्याच उत्तर त्यांना समजेल अशा शब्दात सांगण्याचा मी माझ्यावतीने तसा पूर्ण प्रत्यत्न केला .
आपण ज्यावेळेस आपल्याकडील ज्ञान इतरांना देतो, आणि देत असता त्यांच्या चेहऱ्यावरचे ते समाधानी भाव , ज्यावेळेस निरखतो  , त्यावेळेस मनात  स्फूर्ती निर्माण होते , मनं अधिक उत्साहाने टवटवीत होवून बहरले जाते.
माझं मनही असंच बहरलं .....त्या वातारवणात ........

विशेष म्हणजे परतीच्या वेळी ट्रेकबद्दल घेण्यात आलेल्या,  आप आपल्या प्रतिक्रिया देत असता केल्या गेलेल्या त्या कौतुकाने :-) विषेच आभार ....संपदाचे , माझ्या बहिणीचे :))

२) निसर्ग हा एकमेव असा मित्र आहे कि त्याच्या सानिध्यात असता तो इतर विचार 'जे मनात नेहमीच धूडगूस घालत असतात ' , त्यांना तो त्यावेळेस तरी आपल्या आजुबाजूस फिरकू देत नाही.
एका आगळ्या-वेगळ्या धुंदीत आपल्याला तो घेऊन जातो. एका वेगळ्या लयात आपल्याला तरंगत ठेवतो. एक वेगळी सफर घडवून देतो.  त्यात असतो असतो फक्त आनंद ...आनंद नि आनंद ..
नि जीवनशिक्षण जे पाठ्य पुस्तकातून कधीही मिळत नाही.
ते त्याच्या सानिद्ध्यात आल्यावर ,त्याच्याशी एकांतात सवांद साधता मिळून जातं.

दुपारची वेळ , माचिवरल्या पद्मावती मंदिर मागे असंच काही क्षण आजूबाजूचा निसर्ग , त्यातील निर्जीव सजीव घटकं,  नजरेत उतरवतं,  एकटक त्या तटबंदी जवळ बसून होतो.
बाजूला काही अंतरावर माकडांची टोळी त्यांच्या मस्तीत गुंग होती.  त्यातील एक कुटुंब माझ्या अगदी समीप येउन बसलं. घाबरलं नाही. मी हि आपला जागचा उठलो नाही. बस्स त्यांना निरखून पाहू लागलो.
प्रेमाने ...
ते चौकट कुटुंब , त्यातलं ते चिमुकलं पिल्लू , आईच्या अंगा खांद्याशी लगट करत होतं.
कधी आपली भूख भागवतं होतं...
किती गोजिरवानं नि छानसं पिल्लू होतं ते..

काही वेळेत टुनटुन उडया मारत ते आईपासून दुरावलं नि तटबंदी वरून बागडत बागडत , आपल्या इतर बांधवांकडे जावू लागलं. आई अन तिची सावली सोबत असली म्हणजे , कसली काळजी नि काय ...
क्षणभर वाटलं ,ते सगळे क्षण आपल्या कॅमेरात बंदिस्त करावेत. पण म्हटलं , नको ..ते आपण आपल्या नजरेतच सामावून घ्यावं ...कायमचं...!

दुसऱ्याच  क्षणी निळ्याशार आकाशात त्या काळ्या निळ्या इवल्याश्या पाखराची ती उंच झेप मनाला भरारी देत होती.पाली दरवाज्याचा भक्कमपणा , बालेकिल्ल्याच ते रांगड रूप , त्याच ते सौंदर्य अन निळेशार आकाश मनाला उजळवून टाकत होतं.
दुपारच जेवण उरकून सुवेळा माचीकडे जातेवेळी , डुबा खुणावू लागला.
नजरेत येऊ लागला. तसं  गो. नि दांडेकरांची '' वाघरु'' नि त्यातील ते क्षण '' तिथल्या उंच झाडी वर वाघरुसाठी बांधलेले मचाण'' तो सारा प्रसंग डोळ्यासमोर नाचू लागला.

पुढे नेढे जवळ , त्या नेढेतून त्या वाघरू च क्षणात नाहीस होणं, हे सगळे त्या कादंबरी मधले प्रसंग एक एक करत आठवू लागले. मन भारावू लागले. आणि त्या भारावलेल्या स्थितीतचं आम्ही , मी पुन्हा पद्म्वती मंदिरकडे परतू लागलो.

सूर्य हळू हळू मावळती कडे झुकू लागला. तशी रात्रीच्या जेवणाची लगबग सुरु झाली.
संपदा , सिद्धेश , सुशील , सुशांत , रश्मी , यतीन , भरत , प्रणीत सर्व एकमेकांना  मदत करत होते.
जेवण तयार करण्यास मी हि अधे मध्ये इतर कामांना हातभार लावत होतो.

अशातच सूर्य देवता मावळतीकडे केंव्हाच लुप्त झाले होते.  पण त्यांची ती सोनेरी तांबूस रूप मी माझ्या कॅमेरात नि नजरेत बंदिस्त केली होती.
































रात्रीच गडद छाया हळू हळू गडावर आपलं विस्तार करू पाहत होती. तरीही पौर्णिमा असल्याकारणाने , चंद्र देवतेच्या शीतल प्रकाशित छायेत गड न्हाहून निघालं होतं.

काही वेळ त्या ढगांशी लपाछुपिचा खेळ खेळणार्या त्या चांदोबा कडे टकमक पाहत असता, एक विचार मनात तरळून गेला.
मनं म्हणू लागलं , 'आता पर्यंत कित्येक क्षण ह्याने आपल्या स्मरणात ठेवले असतील ...
कित्येक महत्वाचे प्रसंग , इथला इतिहास आपल्यात सामावून घेतला असेल न्हाई !
मन असंच काहीसं  कुजबुज करत होतं.
काही गोष्टींशी जुळवणी करत होतं अन त्याचबरोबर वेळ हि पुढे पुढे सरत होती.

जेवण आता  तयार झालेलं , चुलीवरल्या जेवणाची अन ते तयार करताना केल्या गेलेल्या मेहनतीची चव,
अन तो खमंगच इतका स्वादिष्ट होता कि त्यानेच मनं आणि उदर दोन्हीही तृप्त झाले.


काही वेळेतेच जेवण उरकून सगळे (बच्चे कंपनी विशेष करून ) थकले भागलेले असल्याने ते हि झोपी गेले ,
मी हि आपली चादर पायापासून डोक्यापर्यंत घेत झोपी गेलो.
पण रात्रीची ती गुलाबी थंडी अंगावर चादर घेतली असता हि अलगद स्पर्शून जात होती.
मनाची हुरहुरी वाढत होती.सर्वत्र शांतता नांदू लागली.
पद्मावती मंदिर बाहेर कुणा एका दोघांचा आवाज हळुवार कानी पडत होता.
अशातच एका क्षणी , एका कसल्यातरी मोठ्या आवाजाने सगळं वातावरण ढवळून निघालं .
सगळं एकाकी  शांत झाल्यासारखं  भासलं. कुणास ठाऊक काहीतरी विपरीत घडलं असावं असा एक विचार मनाशी स्पर्शून गेला. पण नंतर म्हटलं बाहेरील मुले काहीतरी दंगा मस्ती करत असावी.
असो...

घड्याळाचे काटे वर्तुळाकार फिरत फिरत एकमेकान जवळ येतं  अन पुन्हा दुरावतं असा एकंदरीत  त्यांचाखेळक्रम चालू होता.  त्यांच्या त्या खेळ - खेळा मध्येच पहाटेचे ६ वाजले होते.
अजून हि तसं उजाडलं न्हवत. पण थंडीने मात्र झोडपलं होतं.

त्या गारठ्यात पद्मावती तलावाजवळ गेलो नि त्यातल्या थंडगार पाण्याने (अर्थात बॉटल ने पाणी भरून मग ) हाता तोंडावर पाणी शिंपडले. काही वेळेतच रात्रीचा उरलेला भाताचे फोडणी भात करून नि चहा पाणी घेऊन आम्ही सगळे संजीवनी माचीकडे निघालो.

संजीवनी माचीकडून मग पाली दरवाज्याकडे , अन तिथून पुन्हा पद्मावती मंदिराकडे ,
प्रत्येक ठिकाणी रश्मी , संपदा , यतीन , प्रीतम , आपल्याजवळील असलेली माहिती, लहान मुलांपर्यंत पोहोचवत, त्यांना ते समजावून सांगत ....माझाही त्यात थोडाफार हातभार असे ,
मन तेंव्हा साहजिकच अधिक फुलत, कारण आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्यांना देण्यात जो आनंद असतो , त्याच काय नि कसं वर्णन करावं  ....असो

दुपारचे २ वाजले होते. परतीचा मार्ग जवळ येत होता , वेळ हि अशी गोष्ट आहे कि कधी कुणासाठी थांबत नाही. 
झाली परतीची वेळ झाली , निघण्याची घाई झाली , राजगड , राजगड , राजगड ...
 हे २ दिवस कसे त्वरित निघून गेले , कसे भुर्रकन उडाले ते कळलेच नाही , राजगडचं ते राजवैभव , तिथल्या प्रत्येक वास्तूतलं सौंदर्य नजरेत बंदिस्त करून आम्ही निघालो पुन्हा परतीच्या वाटेला ...

पण खरंच राहवत न्हवतं ..' कुणीतरी माझ्या पायाला साखलदंड बांधा रे '  
म्हणजे मी इथला जागचा हलणार नाही. 
मनात एकप्रकारे अशी आरडाओरड सुरु होती. 
पण त्यावर इलाज न्हवता. चोर दरवाज्याने आलो तसंच पुन्हा त्याच वाटेने गुंजवणे कडे निघालो. 
काही तासातच गुंजवणे गावात पोहोचलो हि ...

गावात पोहोचताच  तिथल्या हापशी वर हातपाय धुतले  नि पुढे शिवरायांच्या प्रतिमेचे मनोमन दर्शन घेतले आणि शाळेजवळील पटांगणात उभा राहिलो .
तेवढ्यात समोरून एक आजीबाई काठी टेकवत टेकवत हळुवार थरथरत्या अंगांनी माझ्या बाजूला येउन बसली.चेहर्यावर असंख्य त्रयस्त छटा , सुरकुत्या लांबूनच दिसत होत्या.

तुम्ही ह्याच गावाचे का ? ह्या प्रश्नाने मी बोलण्यास सुरवात केली.

हो रे बाबा, इथलेच..
काय सांगू , दोन तीन दिवसापासून  ताप थंडी , उलट्या चालू आहेत.
डॉक्टर कडे गेले होते.  २०० रुपये घेतले.
आपला हातावरची पट्टी दाखवत थकल्या आवजात त्या आजीबाई बोलत होत्या.

मरण पण येत नाही रे बाबा , सुनेकडे लाह्या मागितल्या दिल्या नाही.
मुलाकडे पैसे मागितले दव्यासाठी ते दिले नाही.  मरण पण येत नाही रे.. नाही येत...
स्वतःशीच बोलल्यागत हळुवार थरथरत्या ओठाशी त्या पुटपुटत होत्या.

बाबा दहा रुपये मिळतील का ?
त्यांनी माझ्याकडे वळून पाहिलं , मिळतील ह्या अपेक्षेने ,
पाकिटात किती पैसे शिल्लक होते हे मलाच ठाऊक न्हवतं.
मी  माझं पाकीट बाहेर काढलं नि जी नोट हाती आली ती देऊ केली.
ते देताना त्यांच्या चेहऱ्यावरील ते भाव बघण्यासारखे होते.
त्यांनी मला मनोमन आशीर्वाद दिला.  त्यांचे चरणस्पर्श करून त्यांचा निरोप घेऊन मी आमच्या टीम सोबत चार चाकी वाहनाने परतीच्या मार्गी लागलो.

मनात तेंव्हा एकाच विचार घोळत होता.
का म्हणून अशी वागतात लोक ? आपल्या आई - वडलांशी ?
म्हातारपणं हेही देवानेच दिलेली देणगी , ती पुढे आपल्यालाही मिळणारच ?
काही क्षण विचारांचं चक्र तेजीत चालू होतं.

एका क्षणी मन म्हणालं , परिस्थिती नि वेळ हीच मुळात माणसाला त्याच्या सहनशक्तीला , त्याच्या विचार वृत्तीवर , त्याच्या तना मनावर , आघात करत असते ...अन त्यानुसार बदल हा घडत असतो.
हाच निसर्ग नियम ............
गाडी ने वेग घेतला तसा राजगड नि त्या सगळ्यां आठवणी मनाच्या एकां कप्यात बंदिस्त झाल्या.....

संकेत य पाटेकर
२९.०१.२०१३
मंगळवार