गुरुवार, ५ जून, २०१४

हे "ट्रेक" म्हणजे नक्की काय रे भाऊ ?

हे "ट्रेक" म्हणजे नक्की काय रे भाऊ ?

कधी कधी आपल्याच नातेवाईकांपैकी अथवा मित्र परीवारांपैकी कुणीतरी बोलून जातं. ज्याचा ट्रेक विषयी काहीही संबंध नसतो .
काय रे , नुसतेच आपले डोंगर चढता उतरता ?काय मिळतं त्यातून तुम्हाला ?
उगाच वेळ वाया , पैसे वाया ? नीट घरी बसा ना ?
एक दिवस मिळतो कुठे आठवड्यातून सुट्टीचा ..तो देखील असा उनाडायला घालवता . ?
दर शनिवार रविवार बघावं तर हा बाहेर ? कुठे तर ट्रेक ला म्हणे ? काय मिळतं त्यातून ..देव जाणे ?
असे वाक्य आपल्या आप्त मंडळीकडून हमखास ऐकायला मिळतात .
अन आपण ते वाक्य ह्या कानाकडून त्या कानाकडे अगदी सहजतेने भिरकावून मोकळे हि होतो .
कारण त्यांना सांगून समजावून हि काहीहि उपयोग नसतो. पण समजणारे समजतात .
आपला मुलगा /मुलगी इतर मुलांसारखा वाईट मार्गाला तर नाही ना हे त्यांना पटलेले असतं .
शिवरायांबद्दल प्रेम अन आदर हा असतोच त्यांच्या हृदयी , आणि तो असलाच पाहिजे.
महाराष्ट्रात ह्या तपोभूमीत जो जन्म झाला आहे आपला , हेच मोठं भाग्य आपलं !

तर ट्रेक म्हणजे नक्की काय?
ट्रेक म्हणजे नुसतंच डोंगर चढणं - उतरणं नाही .
ट्रेक म्हणजेच नुसतंच काही मौज मजा हि नाही .
ट्रेक म्हणजे मनाने मनाला दिलेली हाक
ट्रेक म्हणजे शिवतेजाची प्रेरणादायी आग

ट्रेक म्हणजे आडवाटेची नुसतीच पायपीट न्हवे
ट्रेक म्हणजे निथल्या घामाचे थकवे थेंब न्हवे
ट्रेक म्हणजे चैतन्याची नवी उमेदी लाट
टेक म्हणजे अभिमानाची सह्याद्रीची साद

ट्रेक म्हणजे नुसतंच सैरवैर भटकणं - पाहाणं न्हवे
ट्रेक म्हणजेच नुसतंच आभाळाची व्याप्ती मोजणं हि न्हवे
ट्रेक म्हणजे गड-किल्ले अन शौर्याचा इतिहास
ट्रेक म्हणजे चिराचीरातुनी घूमघुमलेला आवाज

इतकंच न्हवे ..
तर ट्रेक म्हणजे निसर्गातल्या हरएक घटकांशी
अगदी मुक्तपणे केलेला संवाद .
ट्रेक म्हणजे साऱ्यांशी जुळवून घेतलेला हर एक श्वास.
ट्रेक म्हणजे गती
ट्रेक म्हणजे योग्य दिशा .
ट्रेक म्हणजे जीवनाची शिस्तबद्ध हालचाल
ट्रेक म्हणजे प्रेम
जीवनावर , जगण्यावर , इथल्या माणसां माणसांनवर
ट्रेक म्हणजे बरंच काही ...
खेड्या खेड्यातुनी पाहिलेली जीवनाची विविधरंगी रहाट गाडी..!

असा हा 'ट्रेक' करतेवेळी सृष्टी सौंदर्याची ....विविध मनवेडी रूपं पाहता येतात.
सह्याद्री असा भुरळ घालतो , वेड लावतो मनाला !ते वेगळंच ..!

संकेत य पाटेकर
०५.०६.२०१४

शनिवार, १२ एप्रिल, २०१४

भटकंती सिंधूदुर्ग जिल्ह्याची - भाग ३

प्रवासातील ठळक गमती जमती :-

२१ तारखेची ती रात्र ,वार गुरुवार , घरातून बाहेर पडलो, ते तीन चार दिवसाचं संसारिक ओझं पाठीशी बळकावतच . ठाणे ते सिंधुदुर्ग ह्या दूरच्या प्रवासासाठी . ठराविक रसरसत्या , घुमशान अश्या मित्रांच्या सोबतीनं . निलेश, राज , हेमंत , स्नेहल, सुशांत , स्वप्नील आणि अभिजीत अश्या ह्या मित्रजोडीन सोबत .
ऐरवी स्वताच्या कामात गुंतलेली पण तरीही अधून मधून केंव्हातरी वेळेत वेळ काढून भेटणारी ,भेटता गप्पांच्या ओघात वाहून घेणारी . ध्येयाने पछाडलेली . भटकंतीची ओढ असलेली . प्रेमाने एकजूटलेली हि मित्र मंडळी पुन्हा एकत्रित आली ३-४ दिवसाच्या ह्या आनंदमयी यात्रेसाठी .

निसर्गाच्या सानिध्यात स्वतःला हरवून घेण्यासाठी , ऐतिहासिक बळकट अश्या स्वराज्यातील किल्ल्यांचा इतिहास जवळून अनुभवण्यसाठी , मालवणी भाषेची चव चाखन्यासाठी ,कोकणातली मनाला भुलवणारी हिरवळ पाहण्यासाठी (माझ्या प्रिय मित्रांनो कृपया इथे वेगळा अर्थ धरू नये ) . ह्या सर्वातून आनंद अन प्रेरणेच नवं अंकुर तना मनात रुजविण्यासाठी .

तर आम्ही निघालो ...चार पायी वाहनातून, ८ +१ ( वाहन चालक ) मित्रांच्या समूहाने ... कोकणातून कोकणाकडे ...
सारे मित्र एकत्रित जमले कि गप्पांना , थट्टा मस्करीला कसा अधिक उत येतो . त्याने प्रवासाला एक वेगळीच रंगत चढते हे म्हणायला हरकत नाही . संपूर्ण प्रवास तो आठवणीत राहतो तरीही त्यातल्या त्यात काही रोचक असे क्षण ठळक पद्धतीने आपल्या स्मृतीशी जोडले जातात ते कायमच ... .

कालांतराने त्यातून हास्य विनोद घडतात काय ...नि त्या आठवणीने अंगाला शहारे येतात काय ....

असो ..तर आमचा हा प्रवास हि असाच झाला आठवणीचा झुल्यात झुलान्याजोग .

काही मोजके क्षण :-

पहिला दिवस -
कणकवली पासून ...आमची गाडी पुढे धावू लागली आणि धावता धावता तिला पोलिसांची धाप लागली.
तब्बल एक नाही दोन नाही तर सहा वेळा पोलिसांनी जागोजागी अडवलं . कुठून आलात ? कुठे निघालात ? हे ते चौकशीचा अन तपासणीचा सत्र, .. आचारसंहिता लागू ना, निवडणुका ज्या जवळ आल्या आहेत . ह्यातच आमचा अधिक वेळ गेला . काका , मामा करून वेळ काढून घेतला , तरीही आखलेल्या पुढच्या प्रवासीवेळेचा खोळंबा व्हायचा तो झालाच .

* भोगावेच्या नितळ सागरी किनार्याकडून होणारा मावळता सुर्यकिरणोत्सव , त्याच्या विविध नयनरम्य रंगीत छटा. ना ना म्हणता , अवघ्या काही मिनिटासाठीपूर्वी .
धावत पळत आलो म्हणून पाहता आल्या. हे त्यातल्या त्यात विशेष....

पण त्या आधी आम्ही उतरलो होतो ते मित्राच्या काकांच्या घरी ...झारप ह्या ठिकाणी ..
नारली पोफळींच्या बागेत , विवध वृक्ष वेलींच्या छायेत, रस्त्याच्या अगदी कडेला निवांतपणे विसावलेल ते टुमदार छोटस पण प्रशस्त अस एकुलत एक घर , आणि घराला घरपण देणारी ती गोड माणस.
वर्षातून दोन वेळा पिक देणारी भातशेतीची जमीन , गाई वासरं , दगडांच्या अनेक चीरांनी गोलाकार होतं. पाण्याचा नितळ फुगवटा पियासाठी खणलेली ती विहीर .
सारच रम्य ...

ह्यात विशेष सांगायचं तर दोन गोष्टी :-
१) - हि आमुच्या पुरत सीमित ठेवतो
२) काकांनी - काकींनी आमच्यासाठी बनवलेली रुचकर , चवदार अशी मिसळ . त्यांचा आदरतिथ्य .

* तेरेखोल चा किल्ला ..., किल्याचा केलेला हॉटेल ...
किल्ल्याला भेट देणारे तिथले विदेशी पर्यटक ( कपड्यांचा ह्यांना नेहमीच तोटा असतो बहुतेक, कमीत कमी कपड्यात वावरत असतात इथे ....गोव्याची हद्द जी सुरु होते ). असो अतिथी देवो भव !

* तेरेखोल च्या आसपासच्या वृक्ष दाटीत दर्शन देणारा होर्न बिल .

* रेडीचा गणपती मंदिर , गणेशाची भव्य दिव्य सुबक अशी मूर्ती
* आरवली चा वेतोबा मंदिर, त्याला देत असलेला चपलेचा नवस

आणि माझा बंगला - मधील चविष्ट रुचकर अस पोटतृप्तीचं ढेकर देणार जेवण . विशेष करून सोलकढी...

* आठवणीत राहणार अस खास :-
पहिल्या दिवसाचं पहिल्या रात्रीच झणझणीत खमंग अस जेवण .
आमटी भात स्पेश्यल ..
जे आमुच्या प्रिय मित्रांनी बनवल होतं . प्रेमाने बनविलेल जेवण होतं खर ..पण नाका तोंडातून , कानातून , कानामागून गरम पाण्याच्या वाहत्या धारा वाहू लागल्या होत्या. (मित्रांनी हे मनावर घेऊ नये, नाहीतर माझ्या मनावरची पकड ढिली व्हयाची .)
पण तरीही रेन्गालेली ती चव काही जिभेवरून हटत नाही आहे .

दुसरा दिवस ....
लक्षात राहील अस
१) मालवणचा परतीतला नौकेतला तरंगमय प्रवास आणि आया मावशींच्या जपमाला .
त्यात सागरी जलधारांनी भिजलेला मी ...अन त्यातून घडलेला विनोद .
२) सिंधू दुर्ग किल्यातील शिवरायांच्या बोटा पायंचे ठसे . जे पहिल्यांदा पहिले . दुसर्या भेटीत .
(किल्यांवर एक वेगळा भाग लिहिणारच आहे . तेंव्हा सांगेन )

३)देवबाग मधली - WATER SPROTS ACTIVITY
जेट स्की राईड , बनाना राईड , बम्पर राईड...
ह्यात बनाना राईड...मध्ये साफ पाण्यात बुडालो . नाका तोंडात ते खारं पाणी गेल .
वाचवायला हि कुणी आले नाही . फार उशिरा कुणा एकाच लक्ष गेल . म्हणून नशीब ...
कुणा एकाच म्हणजे निलेश ह्याच .......
नाका तोंडात पाणी गेल्यावर मदतीचा हात द्यायला आला. मित्र मित्र राहिला नाही तो तेंव्हा . दगा दिला त्याने .त्यामुळे ....माझा त्याच्यावरचा रोष कायम राहील .
हा रोष जाण्यासाठी त्याने पुढील ट्रेक चा अथवा पिकनिक चा माझा खर्च स्वतः हा करावा .

* WATER SPROTS नन्तर ....भानजी पडा ह्या निवास स्थानी ..रात्री
अचानक वीज गेल्यावर ..होणारी धीर गंभीर शांतात आणि त्या शांततेच भंग करणारी
कंठेतली ती स्वर किंकाळी...संकेत संकेत संकेत ..संकेत ...

अजून बर्याच गोष्टी आहेत ..लिहित राहिलो तर लेख बरंच मोठा होईल . त्यामुळे इथेच संपवतो .
एक झोप उडवणारी आठवण सांगत...

*पहिल्याच रात्री ठाण्यातून ..प्रवास सुरु झाल्यावर गाडी पनवेल च्या पुढे आली . आणि
गाडी च्या POWER स्टेरिंग चा ताबा गाडीच्या DRIVER कडून आमच्या मित्राकडे आला . स्वताहून तो ताबा घेतला त्याने .
आणि गाडी क्षणातच रस्त्याने धावू लागली . अशी धावू लागली .. .....कि झोपी गेलेल्याचा डोळा नन्तर उघडा तो उघडाच राहिला . पार झोपच उडाली साऱ्यांची...
नंतर रीतसर त्याने ताबा होता त्याला दिला . तेंव्हा कुठे सारे निवांत झाले.

असो तर ह्या झाल्या गमती जमती..... कुणी हि मनावर घेऊ नये . मी हि घेत नाही .
आता भेटू पुढच्या भागात ...


आपलच संकेत उर्फ संकु .
०४.०४.२०१४
भटकंती सिंधू दुर्ग जिल्ह्याची - भाग ३






























*हि सर्व क्षणचित्रे माझ्या मोबाईल द्वारे टिपलेली आहेत.