शनिवार, १२ एप्रिल, २०१४

भटकंती सिंधू दुर्ग जिल्ह्याची - भाग १

ती रात्र ....सागरी किनारयावरची ...

दाट काळोख्या रात्री , पाखरांच्या किर्र किर्रात , नारळी पोफळींच्या बागेतून मार्ग काढत , हळूच पाउला पाउलांनी गोऱ्या दामट्या रुपेरी वाळूत , पायांचे ठसे उमटवत ..अंगा खांद्यावरून वाळूचे कण कण साठवत, फेसाळणार्या किनार्यावरून पुढे मागे होतं. नजरेच्या चोर पावलांनी हर एक दिशा धुंडाळत , सागरी लाटेची ती मनवेडी, तना मनाला धडाडनारी, हृदयी स्पर्शनारी , भयाचे सावट पसरवणारी ती लहरी गाज कानी घेत , असंख्य तारकांच्या दिपोस्त्वात ..लुकलुकत्या नजरेनी निसर्गाचे ते वेगळेपण अनुभव होतो.
खरच आयुष्यातला माझां हा पहिलाच क्षण असा असेल ...जो ह्यापूर्वी मी कधी अनुभवला न्हवता.
चांदण्या रात्री साडे दहा ते बारा दरम्यान निर्जन समुद्र किनारी फेरफटका मारणं ..निवांत एके ठिकाणी बसून , गहिऱ्या हसऱ्या डोळ्यांनी निसर्गाचं ते वेगळेपण अनुभवणं .खरंच एक वेगळा अनुभव ठरतो .

निसर्गाच हे रूप नक्की पहायला हव ...कुणा सोबतीनं ..कधी एकट्यानं..
अथांग पसरलेल्या ह्या सागराचं विशाल रूप दिवसा अन रात्री खरंच वेगवेगळ असतं.
कितीसाऱ्या गोष्टी तो सांगू इच्छितो ...एकदा का त्याच्याशी समरस झाल्यावर ..
मी हि त्या रात्री निसर्गाच्या त्या रूपाशी समरस झालो होतो .

सागराची ती विशाल ' लाट' जणू आपल्याशी काही सांगण्याचा प्रयत्न करत आहे . असा भास प्रत्येकवेळेस होत होता .पण दरवेळेस तिचा हात माझ्या पर्यंत पोहोचत न्हवता . हृदयी धडाडी भरवनारा आवाज तो काय कानी गुंजत होता तीतकाच ?
काय बर सांगायचा असेल तिला ? इतके वर्षी ना वर्षो सोबत राहून ..
सागराच्या अंतकरणाच्या , मनाला पिळवनारया गोष्टी तर नाही ना ?
विशाल म्हणून घेताना स्वतःच्या अंत करणात कितीसार्या गोष्टी तश्याच दडपून राहिल्या असतील ?
त्या उघड करायच्या तर नसतील ना
?
हे मानवांनो सागराला हि अंतकरण आहे ......ह्याची कुणी दखल का घेत नाही . हे तर ओरडून सांगायचं नसेल ना ?
प्रश्ना वर प्रश्न पडत होते . पण उत्तर मिळत न्हवती .
सागराचं अं:तकरण जाणण्याइतपतं माझं मन विशाल नाही . मोठं नाही. त्याच्या सारख वीशालत्व येण्यासाठी बरंच काही सहन कराव लागेल. प्रसंगी कठोर राहावं लागेल.
वर्षो न वर्षो तो सार काही पाहत अनुभवत स्वतःला तो घडवत आला आहे.
मला हि अनुभवाचे दाखले घेत असंच मनाचं विशालत्व प्राप्त करून घ्यावं लागेल. तेंव्हा कुठे काही कललेल. उमगेल .
मी स्तब्ध झालो. ....प्रश्नाची घडी हळुवार निस्तरत होती.

सागरी लाटांची ती आगेकूच सोडली तर सारच शांत होतं .
घोंगावनारा वारा काय तो अधून मधून स्पर्शून जाई . त्यात वेळ हि अशीच पुढे सरकून जाई .
नजर अशीच एका दिशेला वळली .
पूर्वेकडून दाट झाडीमागून चंद्र अलगद वर डोकावतं सृष्टीच ते चांदणं रूप आपल्याच शितलमय प्रकाशाने अधिक तेजोमय करत . इथलं जीवन चक्र जणू न्हाहाळत होतं.
त्याच साजिर गोजिर रूप मनाला प्रसन्नता बहाल करत ..मनाला एक प्रकारे चकाकी आणू पाहतं.

खरचं हि सृष्टी किती अद्भुत अन रहस्यमय आहे न्हाई . तितकीच त्याची सौन्दर्याता हि ..
मनाला भुलवणारी ...हर्षनारी...रोमांचित करणारी ...

विचारांचे पडघम चालूच होते .

ह्या चंद्रासारख शांत , पण तरीही आपल्या सौम्य शीतल प्रकाशानं , इतरांच्या आयुष्य उजळणार काळोखपण दूर सारणार , त्याच करुणामय तेज मला हि प्राप्त करून घेता येईल ?
मी हसलो .....स्वतःशीच ..........क्षणभर ..

बरंच काही करायचं आहे आयुष्यात . चांगल जे काही दिसेल ते घ्यायचं. स्वतःला घडवायचं ..आणि आपल्या सोबत इतरांना हि घडवत जायचं .
निसर्गाने भरभरून दिले आहे . निसर्गच खरचं एक आगल वेगळं रूप आहे . काही समजण्या इतपत तर काही समजण्या बाहेर .जे समजतंय ते घ्यायचं . अन चालू पडायचं आपल्या मार्गाने ....

भटकंती सिंधू दुर्ग जिल्ह्याची - भाग १
- संकेत य पाटेकर
२९.०३.२०१४
__________________________________________________________________________

भटकंती सिंधूदुर्ग जिल्ह्याची - भाग २

' येवा कोकण आपलाचं असा' ......

नारळी पोफल्यांच्या सुंदर बागा, काजू - आमराईच्या वनात वसलेलं प्रशस्त टुमदार अस देखणं कौलारू घर. मोकळ्या अंगणी वर्षो न वर्षी खितपत पडलेली तरीही कोरडा घसा आजहि तितक्याच चवीनं ओलावणारी विहीर , फणसाच्या गरया वाणिक गोड कोकणी माणसं , त्यांचे रसाळ मालवणी शब्द ...,
आणि जेवणात असेलली , जिभेवर तासंतास रेंगाळणारी , पोट तृप्तीचा ढेकर देणारी चविष्ट अशी सोलकढी.

' येवा कोकण आपलाच असा' ....हे ब्रीद वाक्य खरंच इथे आल्यावर सार्थकी ठरत .

निसर्ग देवतेच वरदहस्त लाभलेला हा सिंधूदुर्ग जिल्हा..
पावला पावला नजीक त्याच्या अलौकिक सौंदर्याचा - ऐतिहासिक घडामोडींचा प्रत्यय घडवून देतो.

नितल स्वच्छ , मानवी वर्दळ नसणारे , निवांत असे सागरी किनारे.. .... तना मनात चैतन्याचा नवा साज फुलवणारे गतीवान वारे ,

पाहताच क्षणी छाती अभिमानाने प्रेरित ह्वोउन फुलुनी यावी असे ऐतिहासिक बळभक्कम जलदुर्ग.

श्रद्धेच्या अथांगतेने दोन्ही कर एकत्रित जुळुनी यावे अन माथा नकळत देव देवितांच्या चरणी झुकुनी जावे असे सुरेख- सुबक - प्रशस्त , अशी कलात्मक मंदिरे ..

एकीकडे अथांग पसरलेला सागर दुसर्या बाजूला कर्ली खाडीचा संथ प्रवाह आणि त्या दोहांचा चंद्र सूर्य ताऱ्यांच्या साक्षीने नित्य नेमाने होणारा सुरेख संगम .
सृष्टी सौंदर्याचा अनोखा मिलाफच म्हणावा असा हा देवबाग .

कोकणातील विविध पारंपारिक अशी संस्कृती...

काय काय पहिल आम्ही .. त्यापेक्षा काय नाही पहिल आम्ही ....
कोकण मनी भावला तो असा ...................येवा कोकण आपलाच असा.

भटकंती सिंधूदुर्ग जिल्ह्याची - भाग २
- संकेत य पाटेकर
०१.०४.२०१४

तांबरडेगचा नितळ समुद्र किनारा ..



भटकंती सिंधूदुर्ग जिल्ह्याची - भाग ३ साठी येथे क्लिक करा

http://sanketpatekar.blogspot.in/2014/04/blog-post_6680.html

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: